AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्घाटनाला अमित शाह, समारोपाला मोदी, फडणवीसांची महाजनादेश यात्रा

यात्रेच्या (BJP Mahajanadesh Yatra) उद्घाटनाला भाजपाध्यक्ष अमित शाह आणि समारोपाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आणण्याचा प्रयत्न असल्याचंही चंद्रकांत पाटील म्हणाले. दोन टप्प्यात होणाऱ्या या यात्रेत एकूण 4384 किमीचा प्रवास होईल.

उद्घाटनाला अमित शाह, समारोपाला मोदी, फडणवीसांची महाजनादेश यात्रा
| Edited By: | Updated on: Jul 24, 2019 | 5:02 PM
Share

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश (BJP Mahajanadesh Yatra) यात्रेला 1 ऑगस्टपासून अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथून सुरुवात होत आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी याबाबत माहिती दिली. यात्रेच्या (BJP Mahajanadesh Yatra) उद्घाटनाला भाजपाध्यक्ष अमित शाह आणि समारोपाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आणण्याचा प्रयत्न असल्याचंही चंद्रकांत पाटील म्हणाले. दोन टप्प्यात होणाऱ्या या यात्रेत एकूण 4384 किमीचा प्रवास होईल. यात्रेची जबाबदारी प्रदेश सरचिटणीस सुजितसिंग ठाकूर यांच्यावर देण्यात आली आहे.

उद्घाटनाला सर्व मंत्री उपस्थित असतील. पहिला टप्पा मोझरीतून 1 ऑगस्टपासून सुरु होईल आणि 9 ऑगस्ट रोजी समारोप होईल. पहिल्या टप्प्यात 14 जिल्ह्यातील 57 विधानसभा मतदारसंघातून 1639 किमीचा प्रवास केला जाईल. पहिल्या टप्प्याचा समारोप नंदुरबारमध्ये केला जाईल.

यात्रेचा दुसरा टप्पा 17 ऑगस्ट रोजी सुरु होईल. यात 18 जिल्हे आणि 93 विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. 2745 किमी प्रवास केल्यानंतर यात्रेचा समारोप नाशिकमध्ये 31 ऑगस्टला केला जाईल.

महाजनादेश यात्रेचं वैशिष्ट्य

पाच वर्षात केलेल्या कामाचा हिशोब जनतेसमोर मांडण्यासाठी मतदारांची भेट

या विधानसभा निवडणुकीत पुन्हा संधी देण्याचं आवाहन

एकूण 32 जिल्ह्यात 4384 किमी प्रवास, दोन्ही टप्प्यात मिळून 150 मतदारसंघांना भेट

या काळात 87 मोठ्या सभा, 57 स्वागत सभा आणि 238 गावांमध्ये स्वागत समारंभ होईल.

विदर्भात 1232 किमी (44 मतदारसंघ)

उत्तर महाराष्ट्रात 622 किमी (34मतदारसंघ)

मराठवाड्यात 1069 किमी (28 मतदारसंघ)

पश्चिम महाराष्ट्रात 812 किमी (29 मतदारसंघ)

कोकणात 638 किमी (15मतदारसंघ)

पाच वर्षातील काम सांगणारा एलईडी रथ सोबत असेल

ज्या जिल्ह्यात यात्रा जाईल तेथील सर्व मंत्री, आमदार आणि स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित असतील.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.