AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रेणुका देवी यात्रेला सुरुवात, लहान मुलांना वगदी लावण्याचा परंपरा; समजून घ्या नेमकी परंपरा काय?

अशा परंपरा कायम ठेवतात. त्यापैकी ही एक परंपरा. मुलं झालं की ते वगदीला लटकवले जाते. याचा अर्थ संबंधित देवीचे आशीर्वाद घेतले जातात.

रेणुका देवी यात्रेला सुरुवात, लहान मुलांना वगदी लावण्याचा परंपरा; समजून घ्या नेमकी परंपरा काय?
| Edited By: | Updated on: Apr 06, 2023 | 9:05 AM
Share

बुलढाणा : समाजात अनेक परंपरा आहेत. काही वाईट तर काही चांगल्या. वाईट काय आणि चांगल्या काय हे प्रत्येकजण आपआपल्या मताने ठरवत असतो. चिखली येथेही एक परंपरा आहे. ही परंपरा गेल्या साडेतीनशे वर्षांपासून जपले जाते. भाविकांना या परंपरेमुळे फायदा होतो. त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात. त्यामुळे ते अशा परंपरा कायम ठेवतात. त्यापैकी ही एक परंपरा. मुलं झालं की ते वगदीला लटकवले जाते. याचा अर्थ संबंधित देवीचे आशीर्वाद घेतले जातात.

मुल वगदीला लटकवले जाते

साडेतीनशे वर्षांची परंपरा असलेली चिखली येथील रेणुका मातेची यात्रा महोत्सवाला सुरुवात झालीय. यात्रेनिमित्त मातेच्या वगदीला नवसाची लहान मुले लटकवण्याची परंपरा आहे. भाविकांचा अशी मनोकामना आहे की, जर महिलेला मुल झाले तर ते झाल्यानंतर वगदीला लटकवले जाते.

CHIKHALI 2 N

साडेतीनशे वर्षांची परंपरा

बुलढाणा जिल्ह्यातील चिखली हे रेणुका मातेचे जागृत देवस्थान आहे. मातेचा यात्रा महोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. दरवर्षी प्रमाणे रेणुका मातेची शोभायात्रा काढण्यात येते. मातेच्या दर्शनासाठी परिसरातील नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातील भाविक दर्शनासाठी येतात. या यात्रेचे महत्वाचे आकर्षण आहे ते ३ ५ ० वर्षांची परंपरा असलेली पारंपरिक पद्धतीची लाकडाची वगदी. यात्रेच्या दिवशी सकाळी रेणुका मातेची बहीण असलेली ग्राम शेलूद येथून ही वगदी काढण्यात येते.

असा केला जातो नवस

भाविकांचा असा समज आहे की, जर कुणाला मुल-बाळ होत नसेल तर त्या महिलेने मातेला नवस करायचा. जर मला मुल झाले तर हे लहान मुल तुझ्या वगदीला ५ वर्षे किंवा ७ वर्षी, १ ० वर्षे, २ ० वर्षे लावीन. मुलाचे आई-वडील हे देवीला नवस करतात. तो फेडण्यासाठी आपल्या मुलाला वगदीला लटकावून मातेची साडी चोळी देवून ओटी सुद्धा भरतात. त्यानंतर तो नवस पूर्ण होतो असा समज परिसरातील भाविकांचा आहे.

(टीप – टीव्ही ९ मराठी या गोष्टींना दुजोरा देत नाही. फक्त परंपरा काय आहे हे माहितीच्या आधारे दिलेले आहे)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.