AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

” मुख्यमंत्री हा शेतकऱ्याचा मुलगा”; शेताच्या बांधावरून एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना सुनावलं

सध्या त्यांच्याबरोबर कोणी फोटो काढायलाही तयार नाही. आपल्या सोबत फोटो काढायलादेखील लोकांना आवडायला लागते. त्यामुळे फोटो कोणाबरोबर काढायचे हे लोक ठरवतात असा घणाघातही त्यांनी ठाकरे गटावर केला आहे.

 मुख्यमंत्री हा शेतकऱ्याचा मुलगा; शेताच्या बांधावरून एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना सुनावलं
| Updated on: Apr 11, 2023 | 8:24 PM
Share

धाराशिव : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही जिल्ह्यांमधून जोरदार अवकाळी आणि गारपीट झाल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. गेल्या दोन दिवसांपासून नाशिक, अहमदनगर, जळगाव, धाराशिव भागातही शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाल्याने आज तातडीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धाराशिवमधील शेतकऱ्यांची जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी सांगितले की हे सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. अवकाळी पावसात नुकसान झालं तरी सरकारकडून त्यांना तात्काळ मदत करण्यासाठी हे सरकार कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना मदत देणार असल्याचे सांगत त्यांनी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर निशाणा साधताना म्हणाले की, घरात बसून लोकांचे प्रश्न सुटत नाहीत. त्यासाठी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरावं लागते.

शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले झाल्यामुळे मी शेताच्या बांधावर शेतकऱ्यांचे नुकसान पाहायला आलो असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

तसेच यावेळी त्यांनी सांगितले की, शेतकरी हा प्रचंड उद्ध्वस्त झाला आहे. नुकसान भरपाईपासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही असंही त्यांनी यावेळी अश्वासन दिले आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये हे सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. तसेच या आमच्या सरकारने जे निर्णय घेतले आहेत ते शेतकऱ्यांच्या हिताचे असल्याचेही त्यांनी बोलून दाखवले.

आमच्या सरकारने एनडीआरएफचे नियम बदलून डबल मदत केली असून नुकसान भरपाईचे क्षेत्रही वाढवले असल्याचे त्यांनी यावेली सांगितले. त्याचबरोबर सततच्या अवकाळी पावसामुळे होणारे नुकसानही आम्ही नैसर्गिक आपत्तीमध्ये ग्राह्य धरले आहे असं जाहीर अश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अयोध्या दौऱ्यावरून विरोधकांनी टीका केली होती. आमदार आदित्य ठाकरे यांनी त्यांच्यावर अयोध्या आणि शेतकऱ्यांच्या नुकसानीवरून टीका करण्यात आली होती.

त्यावर बोलताना एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, मला शेतकऱ्यांबद्दल आस्था आहे म्हणून मी स्वतः मुख्यमंत्री म्हणून शेतकऱ्यांच्या बांधावर नव्हे तर शेतात आलो आहे असा टोलाही त्यांनी आदित्य ठाकरे यांना लगावला आहे. मंत्रालयात किंवा घरात बसून आदेश देणारा हा मुख्यमंत्री नाही या शब्दात त्यांनी उद्धव ठाकरे यांचा समाचार घेतला आहे.

विरोधक जे आज बोलत आहेत त्यांनी एवढे तरी करून दाखवावे.मात्र सध्या त्यांच्याबरोबर कोणी फोटो काढायलाही तयार नाही. आपल्या सोबत फोटो काढायलादेखील लोकांना आवडायला लागते. त्यामुळे फोटो कोणाबरोबर काढायचे हे लोक ठरवतात असा घणाघातही त्यांनी ठाकरे गटावर केला आहे.

तसेच मुख्यमंत्री हा शेतकऱ्याचा मुलगा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आयुष्यात जे काही संकट येत आहेत त्यामागे सरकार पाठीशी उभा राहील अशा शब्दात घणाघात केला आहे.

तसेच एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, काल आयोध्येत रामाकडे मी हेच मागितलं की बळीराजाचं संकट दूर होऊ दे मात्र आम्ही आमच्यासाठी काही मागितलं नाही अशी भावनाही त्यांनी यावेळी शेतकऱ्यांसमोर व्यक्त केली.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.