Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde : ‘संजय राऊतांच्या बोलण्याने आग लागते’, शिंदे गटाकडून संजय राऊतांबाबत उघड नाराजी व्यक्त

शिंदे गटातील नेते माजी गृह राज्यमंत्री केसरकर यांनी आपल्या मनातील खदखद आज बोलून दाखवली. ते यावेळी म्हणाले, संजय राऊत यांचा आम्हाला आदर आहे. मात्र त्यांच्याबद्दल तक्रारही आहे. याबाबत आम्ही आधी बोललो नाही. राऊत हे फायर आहेत. त्यांच्या बोलण्यामुळे आग लागते.

Eknath Shinde : 'संजय राऊतांच्या बोलण्याने आग लागते', शिंदे गटाकडून संजय राऊतांबाबत उघड नाराजी व्यक्त
दिपक केसरकर आणि खासदार संजय राऊतImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 25, 2022 | 5:49 PM

मुंबई : गेली पाच एक दिवस राज्यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यामुळे राजकारण चांगलेच तापलेलं आहे. शिंदे यांनी बंडाळी करत ही महाविकास आघाडी सरकार आम्हाला मान्य नसल्याचे सांगितले. तसेच शिवसेने यातील बाहेर पडावे आणि भाजपशी घरोबा करावा असे म्हटलं होतं. त्यानंतर शिवसेनेकडून हा बंडनिकाली काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तर दुसरीकडे शिवसैनिकांकडून फुटीर आमदार आणि नेत्याविरोधात निर्दशने केली जात आहेत. तर फुटलेल्या शिंदे गटावर शिवसेने नेते आणि खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) हे टीका करताना हल्ला करत आहेत. यावर शिंदे गटातील अनेक नेत्यांनी राऊत यांच्यावर आरोप केले आहेत. तर त्यांच्यावर आक्षेपही नोंदवले आहेत. असाच आक्षेप शिंदे गटात गेलेले माजी गृह राज्यमंत्री दिपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी राऊत यांच्यावर केला आहे. राऊतांवर आक्षेप करत केसरकर म्हणाले, राऊत्यांच्या बोलण्याने आग लागते. त्यामुळे आम्ही त्यांच्याशी संवाद करत नाही.

त्यांच्याशी थेट कधी संबंध येत नाही

एकनाथ शिंदे यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकार खाळी खेचण्याची पुर्ण तयारी केली आहे. शिंदे यांनी आपल्या सोबत तब्बल 40 ते 45 आमदार नेले आहेत. ज्यात शिवसेनेचेही आमदारही आहेत. ज्यामुळे सनेनेला खिंडार पडले आहे. तर हा पडलेला खड्डा भरून काढण्यासाठी शिवसेनेकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत. मात्र या प्रयत्नांना कुठेतरी सुरूंग लागण्याचे काम सुरू असल्याचे दिसत आहे. याचबाबतीत शिंदे गटातील नेते माजी गृह राज्यमंत्री केसरकर यांनी आपल्या मनातील खदखद आज बोलून दाखवली. ते यावेळी म्हणाले, संजय राऊत यांचा आम्हाला आदर आहे. मात्र त्यांच्याबद्दल तक्रारही आहे. याबाबत आम्ही आधी बोललो नाही. राऊत हे फायर आहेत. त्यांच्या बोलण्यामुळे आग लागते. त्यांच्या याच बोलण्यामुळे मार्गी लागणारे विषय ही संकटात सापडतात. तसेच ते विधीमंडळाचे सदस्यही नाहीत. त्यामुळे आमचा त्यांच्याशी थेट कधी संबंध येत नाही. तसेच मी त्यांनी त्यांचा स्वभाव बदला असेही बोलू शकत नाही. त्यामुळे त्यांच्याबाबत अधिक बोलणं योग्य नसल्याचेही केसरकर म्हणाले.

आम्ही विरोध करणारच

तसेच यावेळी केसरकर यांनी अनेक विषयांना हात घालताना, शिवसेनेच्या नावाचा वापर करू नका असे ते म्हणत असतील तर आम्ही तसे करू असे म्हटलं आहे. तसेच त्यांनी असही म्हटलं की, आजच्या घडीला असे अनेक नेते आहेत जे पक्षाच्या चिन्हा शिवाय निवडूण येऊ शकतात. तर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपद घेण्यावर बोलताना, मुख्यमंत्रिपद घेऊन जर शिवसेना संपणार असेल, तर आम्ही विरोध करणारच असल्याचे सांगितले. विकासाची काम करुन शिवसेना मोठी होईल. जेव्हा विरोधात शिवसेना होती तेव्हा त्यांच्याकडून अपेक्षा नव्हती, मात्र आता शिवसेना सत्तेत आहे. जनतेच्या आपल्याकडून या अपेक्षा वाढल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.

शिवसेनेकडे बोट दाखवत होते

तसेच त्यांनी हे जे काही आता सुरू झाले नसल्याचे म्हणत याची ठिणगी ही राज्यसभेवेळीच पडल्याचे म्हटलं आहे. तर ज्यावेळी मतं फुटली होती. ती काही शिवसेनेची नव्हती. मात्र लोक शिवसेनेकडे बोट दाखवत होते, शिवसेनेच्या लोकांनी वेगळीकडे मतदान केलं, त्यानंतरच ही वेळ आल्याचेही केसरकर म्हणाले.

महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.