AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रस्ता वाहून गेला, गाडी जाण्यास मार्ग नाही, चिखल-गाळ तुडवत फडणवीस नुकसानग्रस्तांच्या भेटीला

देवेंद्र फडणवीस यांनी गाडीला रस्ता नाही, गावाचा प्रमुख रस्ता वाहून गेला म्हणून भेटीसाठी ताटकळत बसलेल्या ग्रामस्थांशी ओढा ओलांडून संवाद साधला.

रस्ता वाहून गेला, गाडी जाण्यास मार्ग नाही, चिखल-गाळ तुडवत फडणवीस नुकसानग्रस्तांच्या भेटीला
| Updated on: Oct 19, 2020 | 1:32 PM
Share

बारामती : अतिवृष्टीमुळे रस्ता वाहून गेला, गाडी जाण्यास मार्ग नाही, अशी परिस्थिती असताना विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस चिखल-गाळ तुडवत ओढ्यातून वाट काढत नुकसानग्रस्तांच्या भेटीला गेले. फडणवीस हे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावात ओढा ओलांडून फडणवीसांनी गावकऱ्यांशी संवाद साधला. (Devendra Fadnavis visits Swami Chincholi village in Daund by crossing water flow)

एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दौऱ्यावर असताना गावकऱ्यांना प्रशासनाकडून रस्त्यावर बोलावून घेतलं जात आहे. तर दुसरीकडे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गाडीला रस्ता नाही, गावाचा प्रमुख रस्ता वाहून गेला म्हणून भेटीसाठी ताटकळत बसलेल्या ग्रामस्थांशी ओढा ओलांडून त्यांच्यापर्यंत पोहचून संवाद साधला.

फडणवीस आधी अलिकडे थांबून गावकऱ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत होते. मात्र आवाज पोहचत नव्हता. बराच वेळ गावकरी ताटकळत राहिल्याने त्यांनी ओढ्यातून पलिकडे जाण्याचा निर्णय धेतला.

दौंड तालुक्यातील शेवटच्या गावात म्हणजे स्वामी चिंचोलीत डांबरी रस्ता अतिवृष्टीत वाहून गेला. फडणवीसांनी ओढा पार करुन गावकऱ्यांशी संवाद साधला. गाडी जात नाही म्हणून मुख्यमंत्री गावकऱ्यांना रस्त्यावर बोलावून घेतात तर माजी मुख्यमंत्री गाडीला रस्ता नाही म्हणून नदी ओलांडून लोकांपर्यंत पोचतात, अशी चर्चा यावेळी गावकऱ्यांमध्ये रंगली होती.

दरम्यान, अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याचं गांभीर्य समजून घेतलं पाहिजे, असं सांगतानाच विरोधात असताना आणि आमच्यासोबत असताना उद्धव ठाकरे सतत शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी करायचे. आता ईश्वराने त्यांना मदत देण्याची शक्ती दिली आहे. त्यांनी तातडीने शेतकऱ्यांना मदत करावी, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

संबंधित बातम्या :

आता ईश्वराने मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांना मदत देण्याची शक्ती दिलीय, तातडीने मदत द्या: फडणवीस

राज्यपालांशी वाद घालण्याची ही वेळ आहे का?; फडणवीस संतापले

(Devendra Fadnavis visits Swami Chincholi village in Daund by crossing water flow)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.