AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘बाळासाहेब असते तर यांना चाबकानं फटकारलं असतं’, नाव न घेता शिंदेंचा पुन्हा ठाकरेंवर हल्लाबोल

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी नाव न घेता निशाणा साधला.

'बाळासाहेब असते तर यांना चाबकानं फटकारलं असतं', नाव न घेता शिंदेंचा पुन्हा ठाकरेंवर हल्लाबोल
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 17, 2025 | 9:00 PM
Share

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते त्यांच्या मुळगावी दरेगाव येथे बोलत होते. इतिहास गद्दारांना कधीच माफ करणार नाही, हे बरोबर आहे. ज्यांनी बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली. ज्यांनी बाळासाहेबांशी बेमानी केली, गद्दारी केली त्यांना इतिहास कधीच माफ करणार नाही. साहेबांनी सांगितलं होतं काँग्रेससोबत जायचं नाही हे काँग्रेससोबत गेले, असं हल्लाबोल यावेळी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता केला आहे.

नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे? 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोले केला आहे. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकांनी शिक्कामोर्तब केलं, नकली लोकांना नाकारलं आणि बाळासाहेबांचे विचार पुढे नेणाऱ्यांना स्विकारलं.  इतिहास गद्दारांना कधीच माफ करणार नाही हे बरोबर आहे, ज्यांनी बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली, ज्यांनी बाळासाहेबांशी बेमानी केली गद्दारी केली त्यांना इतिहास कधीच माफ करणार नाही. साहेबांनी सांगितलं होतं काँग्रेस सोबत जायचं नाही हे काँग्रेस सोबत गेले, असा हल्लाबोल एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की,  साहेबांचे नकली खोटे आवाज काढून कोणी लोक यांच्याकडे येणार नाहीत.  जर असली असाल तर तुम्हाला नकली आवाज काढण्याची गरज काय?  हा पोरकटपणा आहे, हा थिल्लार पणा आहे. बाळासाहेबांना वेदना देण्याचं, बाळासाहेबांचा अपमान करण्याचं हे काम आहे. साहेब असते तर त्यांनी त्यांना चाबकाने फटकारलं असतं, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

गावाकडे आलो की वृक्ष लागवडीचा माझा कार्यक्रम असतो. गावकऱ्यांना माझं आव्हान आहे शेती भाती वरती अवलंबून न राहता फळझाडे लावली पाहिजेत. एकत्रित येऊन समूह शेती केली तर लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळेल. नागरिकांनी निसर्गाला सांभाळलं पाहिजे निसर्गाचे रक्षण केलं पाहिजे. ती संकल्पनाच आहे, नवीन महाबळेश्वर या ठिकाणी पर्यटन मोठ्या प्रमाणात वाढेल, असंही यावेळी शिंदे यांनी म्हटलं आहे.

तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश करण्याचं थेट सांगितलं कारण
तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश करण्याचं थेट सांगितलं कारण.
मनपा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार? आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद
मनपा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार? आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद.
ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक, ठाकरे बंधूंच्या युतीवर आठवलेंचं मोठं विधान
ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक, ठाकरे बंधूंच्या युतीवर आठवलेंचं मोठं विधान.
मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर... एकनाथ शिंदेंचा बाण उद्धव ठाकरेंवर
मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर... एकनाथ शिंदेंचा बाण उद्धव ठाकरेंवर.
तयारीत राहा...राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, निवडणुकांच्या तयारीला वेग
तयारीत राहा...राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, निवडणुकांच्या तयारीला वेग.
अ‍ॅनाकोंडा ते गांडुळाची औलाद...ठाकरेंची पुन्हा शाहांसह शिंदेंवर टीका
अ‍ॅनाकोंडा ते गांडुळाची औलाद...ठाकरेंची पुन्हा शाहांसह शिंदेंवर टीका.
पालिका निवडणुकीपूर्वी तेजस्वी घोसाळकरंचा ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र!
पालिका निवडणुकीपूर्वी तेजस्वी घोसाळकरंचा ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र!.
ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या कारवर बीडमध्ये हल्ला, विधानसभेत पडसाद
ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या कारवर बीडमध्ये हल्ला, विधानसभेत पडसाद.
शालेय पोषण आहारात 1800 कोटीचा घोटाळा? ठाकरेगटाच्या आमदाराचा गंभीर आरोप
शालेय पोषण आहारात 1800 कोटीचा घोटाळा? ठाकरेगटाच्या आमदाराचा गंभीर आरोप.
नागपूर अधिवेशनात अजित दादांच्या NCP ची संघाच्या बौद्धिकाकडे यंदाही पाठ
नागपूर अधिवेशनात अजित दादांच्या NCP ची संघाच्या बौद्धिकाकडे यंदाही पाठ.