AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Wardha Rain | वर्ध्यात पुरात वाहून गेल्याने चौघांचा मृत्यू, 12 वर्षीय नातू आणि आजोबाही बुडाले

वर्ध्यात पुरात वाहून गेल्याने चौघांचा मृत्यू झाला आहे. नाल्याला आलेल्या पुरात दोन महिला, एक बारा वर्षीय मुलगा आणि एक पुरुष वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला.

Wardha Rain | वर्ध्यात पुरात वाहून गेल्याने चौघांचा मृत्यू, 12 वर्षीय नातू आणि आजोबाही बुडाले
| Updated on: Jul 04, 2020 | 5:45 PM
Share

वर्धा : वर्ध्यात पुरात वाहून गेल्याने चौघांचा मृत्यू झाला (Four Died In Wardha Flood) आहे. नाल्याला आलेल्या पुरात दोन महिला, बारा वर्षीय मुलगा आणि त्याचे आजोबा वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. यातील एक घटना सोनेगाव (आष्टी) येथे शुक्रवारी (3 जुलै) रात्री उघडकीस आली. तर, दुसरी घटना गोजी येथे शनिवारी (4 जुलै) सकाळी उघडकीस आली. चारही मृतदेहांची ओळख पटली आहे (Four Died In Wardha Flood).

वर्ध्याच्या सोनेगाव (स्टेशन) शिवारात काही महिला आणि पुरुष शेतात गेले होते. दरम्यान, पाऊस आला. कामे आटोपून घरी जात असताना ते बैलगाडीच्या साहाय्याने नाला पार करत होते. यावेळी दोन महिला बैलगाडीला पकडून नाला पार करण्याचा प्रयत्न करत होत्या.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

मात्र, अचानक बैल फसल्याने बैलगाडी थांबली आणि पाण्याच्या प्रवाहात दोन्ही महिला वाहून गेल्या. यावेळी इतरांनी धडपड करत कसाबसा स्वतःचा जीव वाचवला. महिलांचा शोध घ्यायला सुरुवात केली असता दोघींचेही मृतदेह उशिरा नाल्याच्या पुढील भागात आढळून आले. रात्री उशिरा त्यांचे मृतदेह सेवाग्राम येथे आणण्यात आले. चंद्रकला लोटे आणि बेबी भोयर अशी मृतक महिलांची नावे आहे (Four Died In Wardha Flood).

दुसरी घटना ही गोजी शिवारातील येरणगाव गोजी मार्गावरील नाल्यात घडली. धोत्रा येथून आजोबा आणि नातू बैलगाडी नेऊन देण्यासाठी सावली (सास्ताबाद) येथे जात होते. पण, पुलावर असलेल्या पाण्यात बैलगाडीसह आजोबा आणि नातू दोघेही वाहून गेले. सुरुवातीला 12 वर्षीय मंगेशचा आणि नंतर आजोबांचा मृतदेह आढळून आला. नारायण पोहाणे असं या आजोबाचं नाव आहे. मंगेश हा त्यांच्या मुलीचा मुलगा होता.

Four Died In Wardha Flood

संबंधित बातम्या :

Mumbai Rains Live | मुंबई, ठाण्यात जोरदार पाऊस, समुद्रात उंच लाटा

Maharashtra Rainfall | बळीराजाला समाधानकारक पावसाने दिलासा, राज्यात सरासरीच्या 112 टक्के पाऊस, कोणत्या विभागात किती?

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.