AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्लास्टिकच्या घोड्यावर बसून सिनेमा करणाऱ्या नटीला पद्मश्री देणे हिंदुस्थानचा अपमान; कारवाई करून विषय संपवा, मुंबईच्या महापौरांची मागणी

‘१९४७ चे स्वातंत्र्य भीक मागून मिळाले होते, खरे स्वातंत्र्य २०१४ मध्ये मिळाले,’ या कंगना राणावतने केलेल्या वक्तव्याचा सोमवारी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी खरमरीत समाचार घेतला.

प्लास्टिकच्या घोड्यावर बसून सिनेमा करणाऱ्या नटीला पद्मश्री देणे हिंदुस्थानचा अपमान; कारवाई करून विषय संपवा, मुंबईच्या महापौरांची मागणी
कंगना राणावत आणि किशोरी पेडणेकर.
Follow us
| Updated on: Nov 15, 2021 | 4:11 PM

मुंबईः ‘१९४७ चे स्वातंत्र्य भीक मागून मिळाले होते, खरे स्वातंत्र्य २०१४ मध्ये मिळाले,’ या कंगना राणावतने केलेल्या वक्तव्याचा सोमवारी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी खरमरीत समाचार घेतला. प्लास्टिकच्या घोड्यावर बसून झाशीची राणी सिनेमा करणाऱ्या नटीला पद्मश्री पुरस्कार देणे हा अखंड हिंदुस्थानचा अपमान आहे. तिच्यावर कारवाई करून विषय संपवा, अशी मागणी करत त्यांनी एकाचवेळी कंगना राणावत आणि केंद्र सरकारवर शरसंधान साधले. कंगना दर तीन महिन्यांनी प्रसिद्धीच्या झोतात यायला बघते. ती जन्मली कुठे, रोजीरोटी कमवायला येथे कुठे आणि येथे येऊन माझ्या मुंबईची आणि महाराष्ट्राची पाकिस्तानशी बरोबरी काय करते, अशा शब्दांत त्यांनी कंगनाला फटकारले. सोबतच बेस्टचे महापालिकेत विलीनीकरण करावे असा प्रस्ताव आहे. त्याच्यावर आणि त्यामुळे बसणाऱ्या आर्थिक फटक्यावर आम्ही नक्कीच सकारात्मक विचार करू, असे आश्वासनही दिले.

हिच्यात काय टॅलेंट बघितलं?

किशोरी पेडणेकर यांनी सोमवारी खरमरीत टीका केली. त्या म्हणाल्या, आपल्या देशासाठी, महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी ज्यांनी हौतात्म्य पत्करलं ते एका समाजाचे नव्हते. सर्व जाती-धर्माचे होते. कंगनाचे बेताल वक्तव्य म्हणजे या साऱ्या आहुती दिलेल्या लोकांचा अपमान आहे. आपल्या देशात अनेक लोक आहेत. ते अतिशय चांगलं काम करतात. मात्र, हिच्यात काय टॅलेंट बघून पद्मश्री पुरस्कार दिला, हे मला समजत नाही. अशा नटीला पद्मश्री देणे हा अखंड हिंदुस्तानचा अपमान आहे.

अशा बेताल मुलीवर लक्ष द्या

महापौर पेडणेकर म्हणाल्या, कंगनाचा राजकीय, अराजकीय, सामाजिक सर्व स्तरातून निषेध होत आहे. माझी गृह राज्य विभागाला हात जोडून विनंती आहे की, त्यांनी अशा बेताल मुलीवर लक्ष द्यावे. जी संपूर्ण संपूर्ण हिंदुस्थानचा अपमान करते. सर्व लोकांमध्ये फूट पाडते. ती नको त्या विषयात उगीच ढवळाढवळ करत असेल आणि आमच्या हुतात्म्यांचा अपमान करत असेल तर तिचा निषेध आपल्याया न्यायिक बाजूनं करावा लागेल. तिच्यावर कारवाई करून विषय संपवून टाकावा.

त्यांनी काहीही बोलू नये

पेडणेकर यांनी विक्रम गोखले यांच्या वक्तव्यावर बोलणे टाळले. त्या म्हणाल्या, अनेक बुद्धिजीवी आहेत. ते जसे म्हणतात ना नो कमेंट. तसंच माझंही म्हणणं आहे. हे म्हणणं त्यांना घाबरून नाही. मात्र, काय प्रतिक्रिया देणार. ते मानाने आणि सन्मानाने मोठे आहेत. त्यामुळे मी प्रतिक्रिया देणार नाही. मात्र, अशा बुद्धिजीवींनी कुठंही बोलावे, असं चालणार नाही. अटलबिहारी वाजपेयी, आडवाणी, मुंडे अशा अनेक नेत्यांनी आमच्या पक्षासोबत छान काम केलं. आमच्या कामाचा इम्पॅक्ट देशात, मुंबईत दिसला. मात्र, आता कोणीही येणार आणि सूचवणार, असं होणार नाही, असं म्हणत त्यांनी गोखले यांनी केलेल्या शिवसेना-भाजप युती भाष्यावर ताशेरे ओढले.

इतर बातम्याः

शेतकऱ्यांसाठी विशेष टास्क फोर्स, 1 हजार प्रकल्पांना देणार मान्यता, कृषिमंत्री भुसे यांची नाशिकमध्ये घोषणा; असा होणार फायदा

विक्रम गोखले म्हणाले, कंगना खरंच बोलली; शरद पवारांनी लावला गोखलेंच्या विधानाचा एका वाक्यात निक्काल

पहलगाम हल्ल्यात केंद्रीय सरकारने मान्य केली चूक
पहलगाम हल्ल्यात केंद्रीय सरकारने मान्य केली चूक.
पाणी रोखल्यानं पाकची तडफड का? सिंधू पाणी करार स्थगित, नेमकं काय होणार?
पाणी रोखल्यानं पाकची तडफड का? सिंधू पाणी करार स्थगित, नेमकं काय होणार?.
काश्मीरातून रुपाली ठोंबरे पुण्यात,अंधारेंनी मारली मिठी अन् अश्रू अनावर
काश्मीरातून रुपाली ठोंबरे पुण्यात,अंधारेंनी मारली मिठी अन् अश्रू अनावर.
भारताकडून पाकची कोंडी, तब्बल 20 देशांना..आता पाकिस्तान 'चेकमेट' होणार?
भारताकडून पाकची कोंडी, तब्बल 20 देशांना..आता पाकिस्तान 'चेकमेट' होणार?.
पाकसोबतचा सिंधू पाणी करार स्थगित, मोदींचा पाकवर 'कायदेशीर स्ट्राईक'
पाकसोबतचा सिंधू पाणी करार स्थगित, मोदींचा पाकवर 'कायदेशीर स्ट्राईक'.
पहलगाम हल्ल्यानंतर देश हळहळला, आता BSF जवान पाकिस्तानात गेला, घडल काय?
पहलगाम हल्ल्यानंतर देश हळहळला, आता BSF जवान पाकिस्तानात गेला, घडल काय?.
पाकच्या उलट्या बोंबा... भारताविरोधात पाकिस्तानं घेतले 'हे' मोठे निर्णय
पाकच्या उलट्या बोंबा... भारताविरोधात पाकिस्तानं घेतले 'हे' मोठे निर्णय.
तर रक्ताचे पाट वाहतील, भारताच्या निर्णयानंतर सईदचा तो व्हिडिओ व्हायरल
तर रक्ताचे पाट वाहतील, भारताच्या निर्णयानंतर सईदचा तो व्हिडिओ व्हायरल.
'जे कधीही विमानात बसले नाही, त्यांना..' नरेश म्हस्केंचं वादग्रस्त वधान
'जे कधीही विमानात बसले नाही, त्यांना..' नरेश म्हस्केंचं वादग्रस्त वधान.
दिल्लीच्या पाकिस्तानी उच्चायुक्तालयात केक? पहलगाम हल्ल्याचं दुःख नाही?
दिल्लीच्या पाकिस्तानी उच्चायुक्तालयात केक? पहलगाम हल्ल्याचं दुःख नाही?.