AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘क्या तुमने कभी किसी से प्यार किया?’ हिंगोलीतील प्रेमवेड्या तरुण शेतकऱ्याचं थेट उद्धव ठाकरेंना पत्र

हिंगोली जिल्ह्यातील एका प्रेमवेड्या तरुणाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भावनिक पत्र लिहिलं आहे. या पत्रात मुख्यमंत्रीसाहेब, तुम्ही कधी प्रेम केलं आहे का? असा सवाल त्याने मुख्यमंत्र्यांना केलाय.

'क्या तुमने कभी किसी से प्यार किया?' हिंगोलीतील प्रेमवेड्या तरुण शेतकऱ्याचं थेट उद्धव ठाकरेंना पत्र
उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री
| Updated on: Apr 08, 2022 | 5:35 PM
Share

मुंबई : हिंगोली जिल्ह्यातील एका प्रेमवेड्या तरुणाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना भावनिक पत्र (Emotional letter) लिहिलं आहे. या पत्रात मुख्यमंत्रीसाहेब, तुम्ही कधी प्रेम केलं आहे का? असा सवाल त्याने मुख्यमंत्र्यांना केलाय. शेतकरी असल्याने प्रेम करण चुकीचं आहे का? असा सवाल त्याने या पत्रातून विचारला आहे. हे पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Latter) होतंय. हिंगोलीतील व्हायरल होणाऱ्या या पत्रात कुणाचंही नाव नाहीये. पण हे पत्र हिंगोली जिल्ह्यातील एक तरुण शेतकऱ्याने लिहिलं असल्याचं या पत्रातील मजकुरावरून लक्षात येतंय. त्याने थेट मुख्यमंत्र्यांना तुम्ही कुणावर प्रेम केलंय का असा प्रश्न विचारलाय. हे पत्र सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे

पत्रातील मजकूर काय आहे?

cm latter

“उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब, पत्र लिहितांना खुप दुःख होत आहे. प्रेम धन दौलतीवर अवलंबून आहे का…? मी प्रेम केलं पण मला शेतजमीन कमी आहे म्हूणन माझ्या प्रेमाला विरोध होत आहे. तुम्ही जनतेचे प्रश्न सोडवता. तुम्ही ही कधी तरी प्रेम केलं आहे का? केलं असेल तर उत्तर दया…” असं म्हणत या तरूणाने थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सवाल विचारलाय. हिर-रांझा, लैला -मजनु, सोनी-महिवाल यांनी प्रेम केलं तर त्यांना मृत्यू का? प्रेमात विरह का? साहेब शेतकरी होऊन प्रेम करणं चुकीचं आहे का? खरं तर तुम्हाला भेटून खुप रडाव वाटतंय कारण आजपर्यंत तुम्ही सगळ्यांचे प्रश्न सोडवले. तुम्ही सगळ्यांचं ऐकून घेता मग माझं का नाही?” असा प्रश्न या तरुणाने उद्धव ठाकरे यांना केलाय.

“या पुरोगामी महाराष्ट्रात प्रेमात आत्महत्या करावी लागत असेल तर मी अशा प्रेमाचा धिक्कार करतो. माझ्या प्रश्नांची उत्तरं दया… मी तुमच्या उत्तराची वाट पाहात आहे. अन्यथा माझ्याकडे आत्महत्या करण्यापलीकडे दुसरा पर्याय नाहीये… “, असा या पत्रातील मजकूर आहे.

हिंगोलीतील व्हायरल होणाऱ्या या पत्रात कुणाचंही नाव नाहीये. पण हे पत्र हिंगोली जिल्ह्यातील एक तरुण शेतकऱ्याने लिहिलं असल्याचं या पत्रातील मजकुरावरून लक्षात येतंय. त्याने थेट मुख्यमंत्र्यांना तुम्ही कुणावर प्रेम केलंय का असा प्रश्न विचारलाय. हे पत्र सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.

संबंधित बातम्या

Social Media Trending : वधू-वराला लग्नात पेट्रोल-डिझेल गिफ्ट! सोशल मीडियावर चर्चाच चर्चा…

Video : एमर्जंन्सी लॅंडिंगच्यावेळी विमानाला मोठी दुर्घटना, भीषण आग, विमानाचे जागीच तुकडे

Pushpa Song : पुष्पाचं परदेशी व्हर्जन!, सामी-सामी गाण्यावर पॅरिसमधल्या नागरिकांचा कमाल डान्स, पाहा व्हीडिओ…

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.