AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिंमत असेल तर तुमच्या झेंड्यातील हिरवा काढून दाखवा, उद्धव ठाकरे यांचे थेट चॅलेंज

मी कधी ९२-९३च्या दंगलीची माफी मागितली नाही. परंतू तसे मी म्हटल्याचे मीडियाला हाताशी धरुन छापून आणले आहे. परंतू तुम्ही बाबरीपतन आणि दंगलीनंतर चिडीचूप झाला होता. वाजपेयींनी तर माफी मागितली होती असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला.

हिंमत असेल तर तुमच्या झेंड्यातील हिरवा काढून दाखवा, उद्धव ठाकरे यांचे थेट चॅलेंज
| Updated on: Jan 23, 2025 | 10:13 PM
Share

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंतीनिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचा मेळावा अंधेरी येथे आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी जोरदार भाषण केले. या भाषणात उद्धव ठाकरे यांचा सर्व रोख भाजपाचे नेते आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावरच होता. आम्ही कधीच ९२-९३ च्या दंगलीची माफी मागितली नाही, परंतू मीडियाला हाताशी धरुन यांनी हे छापून आणल्याचे यावेळी उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हटले. त्यानंतर त्यांनी भाजपाला चॅलेंजच दिले की भाजपाने हिंमत असेल तर त्यांच्या झेंड्यातील हिरवा रंग काढून दाखवावा असे चॅलेंजच ठाकरे यांनी यावेळी दिले.

त्याचा समाचार घेताना उद्धव ठाकरे यांनी वाजपेयी आणि आडवाणी मात्र बाबरी नंतर झालेल्या दंगलीनंतर माफी मागत होते. “इट वाज टेरिबल मिस्टेक” असं आडवाणी म्हणाले होते असा दाखला यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिला. अमित शाह यांनी आडवाणी आहेत अजून त्यांना जाऊन विचारावे. नवाज शरीफ यांच्या वाढदिवसाचा केक उद्धव ठाकरे यांनी नव्हे मोदींनी खाल्ला होता अशी आठवणी ठाकरे यांनी काढली होती. आमच्या बाजूला मुस्लिम राहायचे, ते ताजिया द्यायचे. मी खायचो, असं मी नाही मोदी म्हणाले होते. टोप्या घातलेले तुमचे फोटो प्रसिद्ध झाले आहेत आणि वर तुम्ही मी हिंदूत्व सोडलं म्हणता. देशाच्या तिरंग्यात हिरवा आहे. तो तिरंगा  स्वातंत्र्यानंतरही तुमच्याकडे फडकवत नव्हते. उलट आमच्या भगव्याला डाग लावण्याचा तुम्ही प्रयत्न केला आहे. हिंमत असेल तर तुमच्या झेंड्यातील हिरवा काढून दाखवा असे थेट आव्हानच उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिले.

“तुमची सालटी खूप काढता येईल”

आम्ही जी पहिली पोटनिवडणूक लढवली ती हिंदुत्वाच्या मुद्द्यावरच लढली होती. हिंदू जरी असला आणि कुरुलकर सारखा पाक धार्जिणा असेल तरी तो आमचा नाहीच… आम्ही ९७ ची निवडणूक लढवल्यानंतर महाजन वगैरे आले. तेव्हा मातोश्रीचे उंबरठे झिजवायचे. हे भाजप आणि संघवाले असेच आहेत. काड्या लावायच्या, पेटवायचे आणि बाजूला व्हायचे असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला आहे. बाबरीवरून वातावरण तापवले आणि बाबरी पडल्यावर आम्ही नाही केलं असं म्हणून नामानिराळे राहिले. हे तुमचं हिंदुत्व. हा तुमचा नामर्दपणा असा हल्लाबोल यावेळी उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.