AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

60 वर्षीय आजोबा, 59 वर्षीय आजी; असे जुळून आले तार

या दोघांनीही विवाह करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे या विवाहासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी ही पुढाकार घेतला. मोठ्या थाटात हा विवाह सोहळा संपन्न झाला.

60 वर्षीय आजोबा, 59 वर्षीय आजी; असे जुळून आले तार
| Edited By: | Updated on: Mar 03, 2023 | 5:10 PM
Share

जळगाव : एका लग्नाची दुसरी गोष्ट, असा काहीसा अनोखा विवाह सोहळा झाला आहे. या विवाह सोहळ्यात 60 वर्षीय आजोबांनी बेघर निवारा केंद्रातील 59 वर्षीय आजी सोबत लग्नगाठ बांधली. एकमेकांना आधार देण्यासाठी नव्या संसाराला सुरुवात केली आहे. धरणगाव येथील एडवोकेट हरिहर पाटील यांच्या पत्नीचे डिसेंबरमध्ये निधन झाले. हरिहर पाटील हे स्वतः दृष्टी दोषामुळे त्रस्त आहेत. त्यामुळे मुलींच्या विवाहानंतर पुढील आयुष्यासाठी हरिअर पाटील यांना आधाराची गरज होती. यातूनच बेघर किंवा अनाथ महिलेशी विवाह करण्याचा निर्णय घेतला. हरिहर पाटील यांनी जळगाव महापालिकेच्या बेघर निवारा केंद्रातील मीना चौधरी या आजीशी भेट घेतली. त्यानंतर दोघांचीही मनं जुळून आली. त्यामुळे त्यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला.

एकमेकांच्या आधारासाठी

या दोघांनीही विवाह करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे या विवाहासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी ही पुढाकार घेतला. मोठ्या थाटात हा विवाह सोहळा संपन्न झाला. या विवाह सोहळ्यासाठी महापौर जयश्री महाजन यांच्यासह महापालिकेचे अधिकारी कर्मचारी देखील उपस्थित होते. एकमेकांना आधार देण्यासाठी आपण विवाह बंधनात अडकले असल्याची प्रतिक्रिया यावी या नवविवाहित आजी-आजोबांनी दिली आहे.

समाजाची भीती मागे पडते

ज्येष्ठ झाल्यानंतर खऱ्या अर्थानं साथीदाराची गरज पडते. सुख-दुःख समजून घेण्यासाठी कुणीतरी पाहिजे असते. पती किंवा पत्नी गेल्यानंतर ज्येष्ठ नागरिक एकाकी पडतात. पण, या वयात लग्न केल्यास समाज काय म्हणेल अशी भीती असते. मात्र, या सर्व बाबी आता मागे पडत आहेत. सुशिक्षितच नव्हे तर काही कमी शिकलेले लोकंही एकत्र येण्याचा प्रयत्न करतात. असंच काहीस या नवदाम्पत्याबाबत घडलं.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.