Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘आपण हरामखोर लोकांना निवडून देतो’, भालचंद्र नेमाडे राजकीय नेत्यांवर संतापले

"चांगल्या लोकांनी राजकारणात पडूच नये हे असं झालंय. कुठला चांगलं माणूस धजेल यात? खोक्यांची भाषा चालते का? आपल्या सारख्याला शक्य नाही", असं भालचंद्र नेमाडे म्हणाले.

'आपण हरामखोर लोकांना निवडून देतो', भालचंद्र नेमाडे राजकीय नेत्यांवर संतापले
Follow us
| Updated on: Dec 13, 2022 | 10:52 PM

अनिल केऱ्हाळे, जळगाव : ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर संताप व्यक्त केलाय. त्यांनी सध्याच्या राजकारण्यांवर खालच्या शब्दांत टीका केलीय. “आपण हरामखोर लोकांना निवडून देतो. त्याचे हे फळं आहेत. आपल्याला कळत नाही का कोण चांगलं आहे ते?”, असा घणाघात भालचंद्र नेमाडे यांनी केलाय. जळगावातील जैन हिल्स येथे जैन समूहाच्या वतीने साहित्यिकांसाठी साहित्य कला पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं होतं. या सोहळ्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

“चांगल्या लोकांनी राजकारणात पडूच नये हे असं झालंय. कुठला चांगलं माणूस धजेल यात? खोक्यांची भाषा चालते का? आपल्या सारख्याला शक्य नाही”, असं भालचंद्र नेमाडे म्हणाले.

“आपल्याला उद्याची काळजी असते. काय खावं काही नाही, अर्ध्या लोकांना अन्न मिळत नाही. हे सांगतात पण 60 टक्के लोकं अपुरे राहतात. त्यांना समतोल अन्न मिळत नाही. नीट सगळ्या गोष्टी मिळणं हे आपल्याकडे होत नाही’, असा दावा त्यांनी केला.

हे सुद्धा वाचा

“फार तर 10 ते 15 टक्के लोकांचं नीट चाललंय. अशा लोकांनी कुणाला निवडून द्यावं, हे तर कळलं पाहिजे. लोकशाहीचा काय उपयोग आहे ?”, असा प्रश्न नेमाडे यांनी उपस्थित केला.

“आपण कुणाला मत देतोय हे कळल्याशिवाय कसं सुधारणार आहे?”, असादेखील सवाल त्यांनी यावेळी केला.

संभाजीनगरचे जिल्हाधिकारी औरंगजेबच्या कबरीजवळ दाखल
संभाजीनगरचे जिल्हाधिकारी औरंगजेबच्या कबरीजवळ दाखल.
ते काही आक्रमक झाले नाही, भेदरले होते; ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका
ते काही आक्रमक झाले नाही, भेदरले होते; ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका.
अमरावतीत पोलीस अलर्ट मोडवर; संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला
अमरावतीत पोलीस अलर्ट मोडवर; संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला.
'...मोदींकडे मागणी करा', कबरीच्या वादावर ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य
'...मोदींकडे मागणी करा', कबरीच्या वादावर ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य.
डिसीपी निकेतन कदम यांनी सांगितला नागपूरचा थरार
डिसीपी निकेतन कदम यांनी सांगितला नागपूरचा थरार.
'अबू आझमी उद्धव ठाकरेंचा कोण लागतो?', भाजपच्या नेत्याचा आक्रमक सवाल
'अबू आझमी उद्धव ठाकरेंचा कोण लागतो?', भाजपच्या नेत्याचा आक्रमक सवाल.
मुख्यमंत्र्यांचा मी लाडका आहे, ते मला काय बोलतील? नितेश राणेंचं विधान
मुख्यमंत्र्यांचा मी लाडका आहे, ते मला काय बोलतील? नितेश राणेंचं विधान.
नागपुरच्या राड्यात 33 पोलिसांसह 4 DCP जखमी, हिंसेला सुरूवात कुठून ?
नागपुरच्या राड्यात 33 पोलिसांसह 4 DCP जखमी, हिंसेला सुरूवात कुठून ?.
नागपूरच्या राड्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केला 'छावा' चित्रपटाचा उल्लेख
नागपूरच्या राड्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केला 'छावा' चित्रपटाचा उल्लेख.
संतोष देशमुख प्रकरण; आरोपी विष्णु चाटेबद्दल मोठी अपडेट आली समोर
संतोष देशमुख प्रकरण; आरोपी विष्णु चाटेबद्दल मोठी अपडेट आली समोर.