AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jalgaon Shivsainik : गुलाबराव पाटलांनी जनतेची माफी मागावी, जळगावातले शिवसैनिक आक्रमक; महापुरुषांच्या पुतळ्याचं केलं शुद्धीकरण

गुलाबराव पाटील गद्दार आहेत. अशा बेईमान आणि संविधान पायदळी तुडवणाऱ्यांचा निषेध असो, असे म्हणत शिवसैनिकांनी गुलाबराव पाटील आणि बंडखोर आमदारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

Jalgaon Shivsainik : गुलाबराव पाटलांनी जनतेची माफी मागावी, जळगावातले शिवसैनिक आक्रमक; महापुरुषांच्या पुतळ्याचं केलं शुद्धीकरण
महापुरुषांच्या पुतळ्याचे शुद्धीकरण करताना जळगावातले शिवसैनिकImage Credit source: tv9
| Updated on: Aug 14, 2022 | 1:48 PM
Share

जळगाव : शिवसेनेसोबत बंडखोरी करणारे गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी संविधानाची पायमल्ली केली आहे. त्यामुळे त्यांना महापुरुषांच्या पुतळ्याला अभिवादन करण्याचा नैतिक अधिकार नाही, त्यांनी जनतेची माफी मागायला हवी, अशा संतप्त भावना जळगावातील शिवसैनिकांनी (Jalgaon Shivsainik) व्यक्त केल्या आहेत. कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर गुलाबराव पाटील यांनी भव्य कार रॅली काढून आपल्या धरणगाव मतदारसंघात जोरदार शक्तिप्रदर्शन केले होते. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना अभिवादन करत पुष्पहार अर्पण केले होते. तसेच शिवसेना आणि आपल्या विरोधकांना टोलेही लगावले होते. आज धरणगावातील निष्ठावान शिवसैनिकांनी या गोष्टीला आक्षेप घेत छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना दुग्धाभिषेक करत त्यांचे शुद्धीकरण (Purification) केले.

जोरदार घोषणाबाजी

जळगावात शिवसैनिक गुलाबराव पाटलांच्या विरोधात आक्रमक झाले आहेत. गुलाबराव पाटील काल जिल्ह्यात आले होते. यावेळी त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. हजारो कार्यकर्ते त्यांच्या स्वागताला हजर होते. या शक्तीप्रदर्शनानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना अभिवादन करत पुष्पहार अर्पण केला होता. याचवरून येथील शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. गुलाबराव पाटील गद्दार आहेत. अशा बेईमान आणि संविधान पायदळी तुडवणाऱ्यांचा निषेध असो, असे म्हणत शिवसैनिकांनी गुलाबराव पाटील आणि बंडखोर आमदारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

टीका नाही मात्र विरोधकांना लगावला होता टोला

आपल्या स्वागताला आलेली गर्दी ही जनतेचे प्रेम आणि आशीर्वाद आहेत, असे काल गुलाबराव पाटील म्हणाले होते. मंत्री झाल्यावर पहिल्यांदा आलो आहे. गेली अनेक वर्षे लोकांची कामे केली. आज कोणावर काही बोलणार नाही. कोणाला उत्तर आज देण्याचा विषय नाही. जनता माझ्यासोबत आहे. गुलाबराव संपला म्हणणाऱ्यांनी हे पाहावे, असा टोला काल त्यांनी शिवसैनिकांना लगावला होता. यावरून आता आगामी काळात गुलाबराव आणि शिवसैनिक यांच्यातील संघर्ष वाढणार असल्याचे दिसत आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.