Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुख्यमंत्र्यांची मराठा आरक्षणावर मोठी घोषणा, जरांगे पाटील उपोषण मागे घेणार?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या मागणीवर अखेर मोठी घोषणा केली आहे. त्यामुळे जरांगे पाटील काय भूमिका घेतात? याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. विशेष म्हणजे जरांगे यांनी शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्यासमोर मुख्यमंत्र्यांच्या घोषणेवर महत्त्वाची प्रतिक्रिया दिली.

मुख्यमंत्र्यांची मराठा आरक्षणावर मोठी घोषणा, जरांगे पाटील उपोषण मागे घेणार?
Follow us
| Updated on: Sep 06, 2023 | 8:20 PM

मुंबई | 6 ऑगस्ट 2023 : मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांचा विचार करुन सरकारने मोठा निर्णय घेतलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज याबाबत मोठी घोषणा केलीय. ज्यांच्याकडे निजामकालीन जु्न्या शैक्षणिक आणि महसुलीच्या नोंदी असतील, त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलं जाईल, अशी घोषणा एकनाथ शिंदे यांनी दिली. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत निर्णय झालाय. तसेच निवृत्त न्यायाधीशाची समिती याबाबत एक महिन्यात जुन्या शैक्षणिक आणि महसुलीच्या नोंदीबाबात चाचपणी करुन अहवाल सादर करेल. ही समिती गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

मुख्यमंत्र्यांनी हे दोन निर्णय जाहीर करताना मनोज जरांगे पाटील यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. तसेच मुख्यमंत्र्यांचा निरोप घेऊन शिवसेना नेते अर्जुन खोतकर आणि माजी मंत्री राजेश टोपे जाल्यातील अंतरली सराटी गावात मनोज जरांगे यांच्या भेटीला गेले. त्यांनी सरकारच्या निर्णयाबाबत माहिती दिली. त्यानंतर मनोज जरांगे यांनी भूमिका मांडली.

मनोज जरांगे यांची भूमिका काय?

“महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला वंशवळी ज्यांच्याकडे असतील त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा जीआर सरकारने काढला, असं अर्जुन खोतकर यांनी सांगितलं. महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरकट कुणबी दाखला देण्यासाठी एक महिन्याचा वेळ द्या. त्यासाठी समिती नेमली गेली आहे, असा दुसरा निर्णय घेण्यात आलाय. निजामकालीन शैक्षणिक आणि महसुली नोंदी असतील त्यांना आरक्षण मिळेल, असा निर्णय घेतलाय. या तीन मुद्द्यांवर आम्ही चर्चा करु. याबाबत चर्चा करुन उद्या सकाळी 11 वाजता निर्णय घेऊ”, असं जरांगे पाटील म्हणाले.

‘सरकारने दिलेल्या आश्वासनांमध्ये एक शब्दही इकडे तिकडे नको’

“ज्यांच्याकडे महाराष्ट्रात वंशावळीचे पुरावे आहेत त्यांना उद्या सकाळपासून कुणबी प्रमाणपत्र दिलं जाईल. याचा जीआर निघाला आहे. ज्यांच्याकडे वंशावळी नाही, मग सरसकट आलं तेव्हा मिळेल. यासाठी समिती नेमली आहे. ही समिती एक महिन्यात अहवाल देणार आहे. सरकारने दिलेल्या आश्वासनांमध्ये एक शब्दही इकडे तिकडे नको”, असं मनोज जरांगे यांनी सरकारला बजावलं. “वंशावळ नसलेल्यांनाही दाखला द्यावा”, असंही जरांगे पाटील म्हणाले.

महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.