AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

न्यायमूर्ती वर्मा यांनी राजीनामा दिला पाहिजे, विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचे मत

मी सर्वात प्रथम सर्वोच्च न्यायालयाच्या या कृतीचा अभिनंदन करतो. त्यातून आमच्या न्याय व्यवस्थेचा आत्मा पारदर्शक असल्याचा संदेश जातो. न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांनी स्वतःहून राजीनामा दिला पाहिजे. अन्यथा आपल्या संसदेच्या सदस्यांनी याबाबत कृती केली पाहिजे, असे उज्जवल निकम यांनी म्हटले.

न्यायमूर्ती वर्मा यांनी राजीनामा दिला पाहिजे, विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचे मत
Ujjwal Nikam
Follow us
| Updated on: Mar 23, 2025 | 3:50 PM

Justice Yashwant Verma: न्यायमूर्ती यशवंत वर्मा प्रकरणावरुन देश हादरला आहे. त्यांच्या घरात मोठ्या प्रमाणावर रोकड मिळाल्याची बातमी आले. त्यानंतर त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. या प्रकरणात चौकशी सुरु झाली आहे. त्यांच्यावर महाभियोग चालवण्याची मागणीही संसदेत झाली होती. या प्रकरणावर राज्याचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनीही भूमिका मांडली आहे. त्यांनी न्यायमूर्ती वर्मा यांनी राजीनामा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी न्यायमूर्ती वर्मा यांच्या प्रकरणावर बोलताना सांगितले की, मी सर्वात प्रथम सर्वोच्च न्यायालयाच्या या कृतीचा अभिनंदन करतो. त्यातून आमच्या न्याय व्यवस्थेचा आत्मा पारदर्शक असल्याचा संदेश जातो. एखाद्या देशाची स्थिरता ही प्रामुख्याने दोन गोष्टींवर अवलंबून आहे. सामान्य माणसाचा त्या देशातील न्यायव्यवस्थाची विश्वास असला पाहिजे. हा विश्वास कमी झाला तर त्या देशात अरजागता येऊ शकते. यामुळे आजही लोकांच्या मनात शेवटचा आशेचा किरण न्यायपालिका म्हणजे न्यायव्यवस्था आहे.

न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांनी राजीनामा द्यावा

न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांनी स्वतःहून राजीनामा दिला पाहिजे. अन्यथा आपल्या संसदेच्या सदस्यांनी याबाबत कृती केली पाहिजे, असे उज्जवल निकम यांनी म्हटले. नागपूर दंगल आणि मालेगाव कनेक्शन यावर बोलताना ते म्हणाले, नागपूरचा झालेला हिंसाचाराबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट भूमिका जाहीर केली आहे. या हिंसाचार प्रकरणात ज्यांनी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केलेला आहे, त्यांच्याकडून ती नुकसान भरपाई वसूल करण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांची मालमत्तेची विक्री केली जाणार आहे. कायद्याने तसा अधिकार शासनाला दिला आहे. उच्च न्यायालयाने यापूर्वी देखील अशा प्रकारचे जिथे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होते, तेथे भरपाईचे आदेश दिले आहेत, असे निकम यांनी म्हटले.

हे सुद्धा वाचा

महाराष्ट्र हा एक चांगला राज्य म्हणून या देशात परिचित आहे. परंतु काही उपद्रवी माणसांच्या विधानांमुळे या प्रकारच्या गोष्टी होत असतील तर त्यांनी देखील हे प्रकार थांबवले पाहिजे. कारण यामुळे महाराष्ट्राच्या नावलौकिकाला गालबोट लागलेले आहे, असे उज्जवल निकम यांनी म्हटले.

'गोकुळ'च्या आघाडीत बिघाडी? अध्यक्ष अरुण डोंगळे बंडाच्या तयारीत
'गोकुळ'च्या आघाडीत बिघाडी? अध्यक्ष अरुण डोंगळे बंडाच्या तयारीत.
VIDEO भारताच्या एअर स्ट्राईकनं पाकच्या चिंध्या, लॉन्चपॅड बेचिराख अन्..
VIDEO भारताच्या एअर स्ट्राईकनं पाकच्या चिंध्या, लॉन्चपॅड बेचिराख अन्...
ऑपरेशन सिंदूरची अमेरिकेत वाह वाह...भारतीय सैन्याचं कौतुक करत म्हटलं...
ऑपरेशन सिंदूरची अमेरिकेत वाह वाह...भारतीय सैन्याचं कौतुक करत म्हटलं....
पाणी बंद करण्याचा विचार जरी.., शाहबाज शरीफ यांची फुसकी धमकी
पाणी बंद करण्याचा विचार जरी.., शाहबाज शरीफ यांची फुसकी धमकी.
पाकची अवस्था भेदरलेल्या कुत्र्यासारखी, शेपूट घालून पळापळ अन् याचना...
पाकची अवस्था भेदरलेल्या कुत्र्यासारखी, शेपूट घालून पळापळ अन् याचना....
पाकिस्तानने पत्र पाठवल्यानंतरही पाकची 'ती' विनंती भारतानं धुडकवली
पाकिस्तानने पत्र पाठवल्यानंतरही पाकची 'ती' विनंती भारतानं धुडकवली.
आम्ही पाकिस्तानी नाही, बलुचिस्तानी! बलुचिस्तानची स्वातंत्र्याची घोषणा
आम्ही पाकिस्तानी नाही, बलुचिस्तानी! बलुचिस्तानची स्वातंत्र्याची घोषणा.
सोफिया कुरेशींबद्दल वक्तव्य, भाजप मंत्र्यावर गुन्हा अन् कोर्टात धाव
सोफिया कुरेशींबद्दल वक्तव्य, भाजप मंत्र्यावर गुन्हा अन् कोर्टात धाव.
पाकिस्तानच्या विरोधात पाऊल उचला, आम्ही..; बलुचिस्तानची मोठी घोषणा
पाकिस्तानच्या विरोधात पाऊल उचला, आम्ही..; बलुचिस्तानची मोठी घोषणा.
वादळी वाऱ्यासह अवकाळीच्या सरी बरसणार, मुंबईसह राज्यात सतर्कतेचा इशारा
वादळी वाऱ्यासह अवकाळीच्या सरी बरसणार, मुंबईसह राज्यात सतर्कतेचा इशारा.