Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बीड जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचं थैमान, एकट्या अंबाजोगाईत 86 रुग्ण, आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू

बीड जिल्ह्यातही म्युकरमायकोसिसने थैमान घातलंय. बीड जिल्ह्यातील एकट्या अंबाजोगाई (Ambajogai)मध्ये 86 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

बीड जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचं थैमान, एकट्या अंबाजोगाईत 86 रुग्ण, आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू
म्युकरमायकोसिस
Follow us
| Updated on: May 29, 2021 | 8:50 PM

बीड : राज्यात म्युकरमायकोसिस (Mucormycosis)चा फैलाव वेगानं होत असल्याचं पाहायला मिळतंय. बीड जिल्ह्यातही म्युकरमायकोसिसने थैमान घातलंय. बीड जिल्ह्यातील एकट्या अंबाजोगाई (Ambajogai)मध्ये 86 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात (Swami Ramanand Teerth Medical Collage) या रुग्णांवर उपचार केले जात आहेत. उपचार सुरु असलेल्या 86 रुग्णांपैकी 15 जणांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती बीड जिल्हा आरोग्य विभागाकडून देण्यात आलीय. (86 patients of Mukarmycosis in Ambajogai taluka of Beed district, 10 deaths so far)

एकट्या अंबाजोगाई तालुक्यात इतक्या मोठ्या प्रमाणात म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळून आल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु असलेल्या 86 रुग्णांपैरी 61 रुग्ण अद्याप शस्त्रक्रियेच्या प्रतिक्षेत आहेत. आतापर्यंत 15 जणांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. तर 10 जणांचा म्युकरमायकोसिसमुळे मृत्यू झालाय. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना म्युकरमायकोसिसची लागण होत आहे. बीड जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचा वेगान फैलाव होत असल्याचं दिसून येत आहे.

‘म्युकरमायकोसिसची लक्षण आढळल्यानंतर तातडीने उपचार घ्या’

दरम्यान, अंबाजोगाईतील स्वामी रामांनंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयासह आता बीड जिल्हा रुग्णालय, तालुका उपजिल्हा रुग्णालय, त्याचबरोबर खासगी रुग्णालयातही म्युकरमायकोसिसचे रुग्ण दाखल होत आहेत. म्युकरमायकोसिसची लक्षण आढळल्यानंतर तातडीने योग्य उपचार घेतल्यानंतर या आजारातून रुग्ण बरा होता. मात्र, कोरोना रुग्णांनी कोरोनामुक्त झाल्यानंतरही योग्य काळजी घेणं गरजेचं असल्याचं मत ‘स्वाराती’ वैद्यकीय महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक वैद्यकीय अधिकारी सिद्धेश्वर बिराजदार यांनी म्हटलंय.

औरंगाबादेत ‘म्युकरमायकोसिस’चा विस्फोट, आतापर्यंत 53 बळी

औरंगाबादेत म्युकरमायकोसिसचा विस्फोट झालाय. म्युकरमायकोसिसने आतापर्यंत 53 जणांचे प्राण गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर म्युकरसायकोसिस रुग्णांची संख्याही तब्बल पावणे सहाशेवर जाऊन पोहोचलीय. खाजगी रुग्णालयांकडून आतापर्यंत रुग्ण आणि मृतांच्या आकड्यांची लपवाछपवी सुरु होती. मात्र आरोग्य यंत्रणेला मिळालेल्या माहितीनुसार म्युकरमायकोसिसने 53 व्यक्तींना आपला जीव गमवावा लागलाय. म्युकरमायकोसिसच्या नव्या माहितीने औरंगाबादेत एकच खळबळ उडाली आहे.

उपचारासाठी लागणारी इंजेक्शन अपुरी

औरंगाबादेत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने अनेकांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. परंतु आता म्युकरमायकोसिसचा घट्ट विळखा पाहता औरंगाबादमधील नागरिकांच्या पुन्हा चिंता वाढल्या आहेत. त्यात भरीस भर म्हणजे म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर उचपार करणाऱ्यासाठी लागणारी इंजेक्शनची वाणवा भासू लागली आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना प्रचंड हेळसांड आणि मनस्तापाला सामोरे जावं लागतंय.

संबंधित बातम्या :

Mucormycosis : म्युकरमायकोसिसची भीती वाटतेय? मग ICMR ने सुचवलेल्या ‘या’ गोष्टी कराच…

कोरोनामुक्त मधुमेहींना म्युकोरमायकोसिसचा धोका, लक्षणं कोणती? आजार टाळण्याचे उपाय काय?

86 patients of Mukarmycosis in Ambajogai taluka of Beed district, 10 deaths so far

नागपुरातील हिंसाचाराला जबाबदार कोण? राड्यातील मास्टरमाईंडचे नाव समोर
नागपुरातील हिंसाचाराला जबाबदार कोण? राड्यातील मास्टरमाईंडचे नाव समोर.
कामावरून घरी निघाले, रस्त्यातच अघटित घडलं अन्.. चौघांचा होरपळून मृत्यू
कामावरून घरी निघाले, रस्त्यातच अघटित घडलं अन्.. चौघांचा होरपळून मृत्यू.
'गाडलेला औरंग्या पुन्हा जिवंत, कारण भाजपच्या 'पोटात' नवा शिवाजी...'
'गाडलेला औरंग्या पुन्हा जिवंत, कारण भाजपच्या 'पोटात' नवा शिवाजी...'.
छावा कादंबरी 60 वर्षांपूर्वी आली पण.., कबरीवरून राज यांचा भाजपला टोला
छावा कादंबरी 60 वर्षांपूर्वी आली पण.., कबरीवरून राज यांचा भाजपला टोला.
संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना शिक्षा होणार नाही?
संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना शिक्षा होणार नाही?.
'औरंगजेब एक राजा, त्याच्यावर मीच का बोलावं?', जलील यांचं जनतेला पत्र
'औरंगजेब एक राजा, त्याच्यावर मीच का बोलावं?', जलील यांचं जनतेला पत्र.
नागपूर राड्यादरम्यान महिला पोलिसाचा विनयभंग, अंधाराचा फायदा घेतला अन्
नागपूर राड्यादरम्यान महिला पोलिसाचा विनयभंग, अंधाराचा फायदा घेतला अन्.
९ महिने, माणसांपासून दूर,असा होता सुनीता विल्यम्सचा ग्रहवापसीचा प्रवास
९ महिने, माणसांपासून दूर,असा होता सुनीता विल्यम्सचा ग्रहवापसीचा प्रवास.
सुनीता विल्यम्स 'ग्रह'वापसी, बघा अवकाशातून पृथ्वीवर परण्याचा प्रवास
सुनीता विल्यम्स 'ग्रह'वापसी, बघा अवकाशातून पृथ्वीवर परण्याचा प्रवास.
संभाजीनगरचे जिल्हाधिकारी औरंगजेबच्या कबरीजवळ दाखल
संभाजीनगरचे जिल्हाधिकारी औरंगजेबच्या कबरीजवळ दाखल.