AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईकरांनो सावध व्हा… पुढील दोन दिवस हवामान विभागाचा अंदाज काय?

राज्यात अनियमित पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मुंबईत उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज आहे. कोकणातही उष्णता जाणवेल. विदर्भात मात्र, चंद्रपूर, अकोला आणि अमरावती जिल्ह्यांना वादळी वाऱ्यांसह गारपीटीचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी हवामानातील बदलांची दक्षता घेणे आवश्यक आहे.

मुंबईकरांनो सावध व्हा... पुढील दोन दिवस हवामान विभागाचा अंदाज काय?
Follow us
| Updated on: Apr 04, 2025 | 11:12 AM

राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत आहे. यामुळे पिकांचे, फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यातच मुंबईतील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. मागील काही दिवसांपासून पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. पण आता हवामान विभागाने शनिवारपासून पुढील दोन दिवस उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज व्यक्त केला आहे. यामुळे तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता नसली तरी, मुंबईकरांना उकाड्याचा त्रास जाणवू शकतो.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी कुलाबा येथे कमाल तापमान ३३.९ अंश सेल्सिअस आणि सांताक्रुझ येथे ३४.५ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि ठाणे परिसरात पावसाळ्याचे वातावरण पाहायला मिळत आहे. उच्च आर्द्रतेमुळे लोकांना तीव्र उकाड्याचा अनुभव येत आहे.

कोकणात दमट हवामान

कोकण विभागात मागील दोन-तीन दिवसांपासून चांगला पाऊस झाला. हवामान विभागाने येत्या रविवारपासून कोकण विभागात उष्ण आणि दमट हवामान राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. यामुळे कोकणातील नागरिकांनाही उकाड्याचा सामना करावा लागू शकतो.

राज्यातील इतर भागांची स्थिती पाहिल्यास, काही ठिकाणी प्रचंड उकाडा पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे विदर्भात गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, विदर्भातील चंद्रपूर, अकोला आणि अमरावती जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता आहे. या काळात वाऱ्यांचा वेग ताशी ४० ते ५० किलोमीटर इतका असू शकतो. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

विदर्भात गारपिटीचा इशारा

यामुळे मुंबई आणि कोकण विभागात उष्ण आणि दमट हवामान राहील असा अंदाज आहे. यामुळे उकाडा जाणवेल. तर, विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. हवामानातील या बदलांमुळे नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.

ऑपरेशन सिंदूरनंतर आता पाकिस्तानला POK खाली करण्यासाठी थेट वॉर्निंग
ऑपरेशन सिंदूरनंतर आता पाकिस्तानला POK खाली करण्यासाठी थेट वॉर्निंग.
राज्यात मान्सून कधी? IMDकडून मोठी अपडेट अन् पावसासंदर्भात इशारा काय?
राज्यात मान्सून कधी? IMDकडून मोठी अपडेट अन् पावसासंदर्भात इशारा काय?.
ऑपरेशन सिंदूरनं पाकला लोळवलं आता पुढची स्ट्रेटजी काय? सरकारनं सांगितलं
ऑपरेशन सिंदूरनं पाकला लोळवलं आता पुढची स्ट्रेटजी काय? सरकारनं सांगितलं.
भारताचं ट्रम्पला थेट उत्तर, काश्मीरच्या मुद्द्यावर मध्यस्थी मान्य नाही
भारताचं ट्रम्पला थेट उत्तर, काश्मीरच्या मुद्द्यावर मध्यस्थी मान्य नाही.
नालेसफाईची पोलखोल, मनसे कार्यकर्ते उतरले नाल्यात अन् खेळले हॉलीबॉल
नालेसफाईची पोलखोल, मनसे कार्यकर्ते उतरले नाल्यात अन् खेळले हॉलीबॉल.
शुकशुकाट.. युद्धाच्या भितीनं अटारी सीमेवर राहणाऱ्या लोकांनी गाव सोडलं
शुकशुकाट.. युद्धाच्या भितीनं अटारी सीमेवर राहणाऱ्या लोकांनी गाव सोडलं.
युद्धविरामानंतर जैसलमेरमध्ये जनजीवन पूर्वपदावर यायला सुरुवात
युद्धविरामानंतर जैसलमेरमध्ये जनजीवन पूर्वपदावर यायला सुरुवात.
ओवैसींचं पाकला चॅलेंज, चीनचा उल्लेख करत PM शरीफ अन् मुनीरलाच डिवचलं
ओवैसींचं पाकला चॅलेंज, चीनचा उल्लेख करत PM शरीफ अन् मुनीरलाच डिवचलं.
भाकरी फिरली! भाजपकडून राज्यात मोठे संघटनात्मक बदल
भाकरी फिरली! भाजपकडून राज्यात मोठे संघटनात्मक बदल.
तर आम्ही जशात तसं उत्तर देऊ; मोदींचा पाकला करड्या शब्दांत इशारा
तर आम्ही जशात तसं उत्तर देऊ; मोदींचा पाकला करड्या शब्दांत इशारा.