AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गुजरातला जाणारं पाणी गोदावरी खोऱ्यात वळवणाऱ्या मांजरपाडा प्रकल्पाचं काम कुठपर्यंत झालं? वाचा सविस्तर

मांजरपाडा (देवसाने) प्रकल्पाचे काम मे अखेर पर्यंत पूर्ण होणार असून यंदाच्या पावसाळ्यात येवला, चांदवडला पूर्ण क्षमतेने पाणी उपलब्ध होणार आहे (Minister chhagan Bhujbal visit Manjarpada project).

गुजरातला जाणारं पाणी गोदावरी खोऱ्यात वळवणाऱ्या मांजरपाडा प्रकल्पाचं काम कुठपर्यंत झालं? वाचा सविस्तर
Follow us
| Updated on: Apr 02, 2021 | 7:51 PM

नाशिक : मांजरपाडा (देवसाने) प्रकल्पाचे काम मे अखेर पर्यंत पूर्ण होणार असून यंदाच्या पावसाळ्यात येवला, चांदवडला पूर्ण क्षमतेने पाणी उपलब्ध होणार आहे. तसेच भविष्यात या प्रकल्पाच्या माध्यमातून गुजरातकडे वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवून भविष्यात मराठवाड्यासह महाराष्ट्राची तहान भविण्यासाठी हा प्रकल्प अत्यंत उपयोगी ठरणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले. भुजबळ यांनी आज दिंडोरी येथील मांजरपाडा (देवसाने) प्रकल्पाच्या सुरु असलेल्या कामांची आज विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या समवेत पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत इतर अधिकारीवर्ग देखील होते (Minister chhagan Bhujbal visit Manjarpada project).

मांजरपाडा प्रकल्पाचे काम 80 टक्के पूर्ण

याअगोदरच मांजरपाडा प्रकल्पाचे काम 80 टक्के पूर्ण झाले आहे. दायित्वाला मंजुरी मिळाल्यानंतर मुख्य धरणाचे अपूर्ण असलेले काम गेल्या महिनाभरापूर्वी सुरु करण्यात आले आहे. सद्य स्थितीत प्रकल्पाचे काम 87 टक्क्यांपेक्षा जास्त काम झाले आहे. येत्या मे महिन्याच्या अखेरपर्यंत या प्रकल्पाचे उर्वरित काम पूर्ण केले जाणार आहे. काम सुरू झाल्यापासून 15 मीटर उंचीचे धरणाचे बांधकाम झाले असून आता केवळ 14 मीटर धरणाचे बांधकाम शिल्लक राहिले आहे. त्याचबरोबर धरणाचे मातीकाम 80 टक्के पूर्ण झाले आहे. मांजरपाडा (देवसाने) मुख्य धरणाच्या सांडव्याची घळभरणी सुरू असून हे काम 15 मे पर्यंत करण्याचे नियोजन असल्याने जलदगतीने काम करण्यात येत आहे.

26 गर्डरचे काम पूर्ण

या भागातील देवसाने ते गोगूळ हा रस्ता काही कालावधीसाठी बंद करण्यात आला आहे. देवसाने हे गाव दिंडोरी तालूक्यात असून ते पक्क्या डांबरी सडकेने दिंडोरीला जोडलेले आहे. गोगूळ हे सुरगाणा तालूक्यातील डांगराळे भागातील गाव आहे. घळभरणी पूर्ण झाल्यानंतर दोन्ही गावे पुन:श्च धरणमाथ्यावरील रस्त्याद्वारे एकमेकांशी जोडले जाणार आहे. या रस्त्यावर एकूण 33 गर्डर बसविण्यात येणार असून त्यापैकी 26 गर्डरचे काम पूर्ण झाले आहे. तर इतर गर्डर बसवण्याचे काम सुरु आहे. सर्व कामे मे अखेरपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

कॅनॉल आणि त्यावरील रेल्वे क्रॉसिंगचे काम देखील पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचं ध्येय

मांजरपाडा धरणाच्या कामासोबतच कॅनॉल आणि त्यावरील रेल्वे क्रॉसिंगचे काम देखील पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात येणार आहे. येवला तालुक्यातील डोंगरगाव पर्यंत हे पाणी पोहचणार आहे. विशेष म्हणजे 2019 पासून मुख्य वळण बोगद्याद्वारे पार नदीचे पाणी अंशत: वळविण्यास सुरुवात झाली आहे. धरणाचे काम मे अखेर पर्यंत पूर्ण झाल्यावर पाणी पूर्ण क्षमतेने गोदावरी खोऱ्यात वळविले जाणार आहे. तसेच येत्या पावसाळ्यात पूर्ण क्षमतेने येवला आणि चांडवड तालुक्याला पाणी उपलब्ध होणार आहे (Minister chhagan Bhujbal visit Manjarpada project).

संबंधित बातमी : Special Story | नारपार प्रकल्प : महाराष्ट्राचं पाणी गुजरातला जाणार ही काळ्या दगडावर कोरलेली रेघ

बदलापूर रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी! प्रवाशांचा संताप अन् एकच मागणी
बदलापूर रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी! प्रवाशांचा संताप अन् एकच मागणी.
पहलगाम हल्ल्यातल्या 'त्या' झिपलाइन ऑपरेटरला एनआयएने ताब्यात घेतलं
पहलगाम हल्ल्यातल्या 'त्या' झिपलाइन ऑपरेटरला एनआयएने ताब्यात घेतलं.
पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी आणि भारतीय लष्करात चकमक सुरू
पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी आणि भारतीय लष्करात चकमक सुरू.
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना लष्कराने घेरलं; सुत्रांची माहिती
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना लष्कराने घेरलं; सुत्रांची माहिती.
पर्यटकांच्या हत्येचा बदला कोणत्याही क्षणी? देशात हालचालींना वेग
पर्यटकांच्या हत्येचा बदला कोणत्याही क्षणी? देशात हालचालींना वेग.
पहलगाम हल्ल्यानंतर आज केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक
पहलगाम हल्ल्यानंतर आज केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक.
पाकिस्तान सुधरेना! कुरघोड्या सुरूच, सलग पाचव्या दिवशी गोळीबार
पाकिस्तान सुधरेना! कुरघोड्या सुरूच, सलग पाचव्या दिवशी गोळीबार.
532 भारतीय नागरिक मायदेशी परतले
532 भारतीय नागरिक मायदेशी परतले.
नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर
नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर.
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू.