AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मराठा समाजाची शाळा असेल, तर त्यात..’, क्षीरसागर यांनी विधानसभेत सांगितलं बीडमधलं जाती-पातीच भयाण वास्तव

Sandeep Kshirsagar : संतोष देशमुख हत्या प्रकरणावर आज विधानसभेत चर्चा झाली. त्यावर बोलताना बीड जिल्ह्यातील आमदार संदीप क्षीरसागर यांनी बीड जिल्ह्यात जाती-पातीच राजकारण किती खोलवर रुजत चाललं आहे, ते भयाण वास्तव सांगितलं

'मराठा समाजाची शाळा असेल, तर त्यात..', क्षीरसागर यांनी विधानसभेत सांगितलं बीडमधलं जाती-पातीच भयाण वास्तव
mla sandeep kshirsagar
| Updated on: Dec 19, 2024 | 11:15 AM
Share

“संतोष देशमुख प्रकरणामुळे जिल्ह्यात ज्या पद्धतीच वातावरण झालं आहे. मी एक आमदार म्हणून जिल्ह्यात फिरत असताना गेल्या आठ दिवसापासून या प्रकरणाकडे एका वेगळ्या दिशेने पाहिल जात आहे. सत्तेत आपण सर्वजण आहोत. या प्रकरणात राजकारण मला आणयचं नाही. आमच्या जिल्ह्यात बीड मतदारसंघात गुन्हेगारी कशामुळे वाढली?” या मुद्याकडे आमदार संदीप क्षीरसागर यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. “बीड मतदारसंघात रस्ते आले, रेल्वे चालू होणार आहे. आमच्याकडे इंडस्ट्री नाही. त्यामुळे गुन्हेगारी वाढतेय, त्याचा उल्लेख जिल्ह्याच्या बाकीच्या आमदारांनी सुद्धा केला. वाळू असेल मटका, सट्टा, दारुची अवैध ठिकाणं याचा भरमार जिल्ह्यात आहे. यावर आळा घालण्यासाठी सरकारच्या माध्यमातून पावल उचलावी लागतील” असं आमदार संदीप क्षीरसागर म्हणाले.

“मी जातीचा जो विषय बोललो. आता परिस्थिती अशी आहे की आमच्या जिल्ह्यात दोन समाज आमच्याकडे जास्त आहेत. मराठा आणि वंजारा समाज. जर या विषयात आपण प्रामाणिकपणे लक्ष घातलं नाही तर परिस्थिती अशी आहे की, साधेसाधे व्यापारी एखादी गोष्ट घेत असताना समाज पाहिला जातो. एखादा अधिकारी जिल्ह्यात आला, तर त्याच्या नावापेक्षा आडनाव काय हे पाहिलं जातं. आमचा जिल्हा पुरोगामी जिल्हा आहे. महाराष्ट्र पुरोगामी विचाराचा आहे. आमचा जिल्हा खरच चांगला आहे. जातीपातीच हे राजकारण भोवल जातं. माझा उदहराण घेतलं तर माझ्या जातीचे लोक सुईच्या टाचाणीच्या टोकाएवढे सुद्धा नाही. तरीही बीड मतदारसंघाने दुसऱ्यांदा मला आमदार म्हणून निवडून दिलं” असं संदीप क्षीरसागर म्हणाले.

शाळेवरुन काय म्हणाले?

“शाळा एखाद्या समाजाची असली, मराठा आणि वंजारा समाज मी उल्लेख केला. मराठा समाजाच्या शाळेत वंजारी समाजाचा विद्यार्थी असला, तर प्रवेश काढून घेण्याचा प्रकार सुरु आहेत” असं संदीप क्षीरसागर म्हणाले.

पाटोद्याच्या कुटुंबाबद्दल काय सांगितलं?

“पाटोद्याच एक कुटुंब आहे, रामकृष्ण बांगर म्हणून, त्यांच्या कुटुंबाच्या विषयात अतिशय घाणेरडा प्रकार झाला आहे. त्यांच्या मुलावरती आपण समजू शकतो त्याने काही तरी केलं म्हणून 307 आपण दाखल केला. त्याचे आई-वडिल, मुलगा यांच्यावर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला. अजून तिसऱ्यांदा त्या कुटुंबावर आई-वडिल आणि मुलगा यांच्यावर 307 चा गुन्हा दाखल केला. असं काय केल होतं त्यांनी, जिल्ह्यात कुणावर काय गुन्हा दाखल होईल, कोण कधी काय करलं याचा भरवसा नाही” असं संदीप क्षीरसागर सभागृहात म्हणाले.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.