AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्य सरकारकडून लोकलचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे, विजय वडेट्टीवारांची माहिती, 15 ऑगस्टपासून सामान्यांसाठी लोकल सुरु!

लोकल प्रवासाबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारनं रेल्वे बोर्डाकडे पाठवल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी दिली आहे. ते यवतमाळमध्ये बोलत होते. त्यामुळे आता रेल्वे बोर्ड राज्याच्या या प्रस्तावाला कसा प्रतिसाद देतं हे पाहावं लागणार आहे.

राज्य सरकारकडून लोकलचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे, विजय वडेट्टीवारांची माहिती, 15 ऑगस्टपासून सामान्यांसाठी लोकल सुरु!
मंत्री विजय वडेट्टीवार
| Edited By: | Updated on: Aug 09, 2021 | 5:06 PM
Share

यवतमाळ : विरोधकांसह सर्वसामान्य नागरिक आणि प्रवासी संघटनांच्या आक्रमक पवित्र्यानंतर अखेर राज्य सरकारनं सर्वसामान्य नागरिकांना लोकल (Mumbai Local) प्रवासाची मुभा दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काल त्याबाबत घोषणा केली आहे. मात्र, या लोकल प्रवासाबाबत राज्य सरकारनं काही अटी घातल्या आहेत. दरम्यान, लोकल प्रवासाबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारनं रेल्वे बोर्डाकडे पाठवल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी दिली आहे. ते यवतमाळमध्ये बोलत होते. त्यामुळे आता रेल्वे बोर्ड राज्याच्या या प्रस्तावाला कसा प्रतिसाद देतं हे पाहावं लागणार आहे. (State Government’s proposal to Railway Board regarding Mumbai local travel)

राज्याची रेल्वेमंत्र्यांशी चर्चा नाही?

राज्य सरकारनं दोन डोस घेतलेल्या नागरिकांना 15 ऑगस्टपासून लोकल प्रवास करण्यास मुभा दिली आहे. मात्र, हा निर्णय जाहीर करण्यापूर्वी राज्य सरकारने रेल्वे मंत्रालयाशी चर्चाच केली नसल्याचं उघड झालं आहे. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी तसे सुतोवाचही केलं आहे. रावसाहेब दानवे यांनी टीव्ही 9 मराठीशा संवाद साधताना हे स्पष्ट केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकलबाबत जो निर्णय घेतला आहे. त्याचं स्वागतच आहे. राज्य सरकारच्या सूचनेप्रमाणे येत्या 15 ऑगस्टपासून आम्ही काही प्रमाणात लोकल सुरू करू. कोरोनाची स्थितीही आता आटोक्यात आली आहे. पण निर्णय घेण्यापूर्वी राज्य सरकारने रेल्वेशी थोडी चर्चा केली असती तर बरं झालं असतं. पण तरीही सरकारच्या या निर्णयाला रेल्वे प्रतिसाद देईल, असं दानवे यांनी म्हटलं आहे.

राज्याने यंत्रणा उभारावी

रेल्वेची भूमिका स्पष्ट आहे. प्रवासी तपासून आत सोडण्यात येईल. आम्ही लोकल सुरू करण्यास सज्ज आहोत. मात्र, प्रवाशांचे प्रमाणपत्रं तपासण्यासाठी राज्य सरकारनेही स्वत:ची यंत्रणा उभी केली पाहिजे. ही राज्याचीही जबाबदारी आहे, असं ते म्हणाले. आमची कसली नाराजी नाही. उलट आम्ही खूश आहोत. ज्या अडचणी येतील त्या चर्चेतून सोडवता आल्या असत्या, असंही ते म्हणाले.

लोकल प्रवासासाठी दोन डोससह अजून एक अट पूर्ण करावी लागणार

लोकल प्रवासासाठी दोन डोस घेतलेल्यांना महापालिका किंवा राज्य सरकारकडून फोटो पास देण्यात येईल. हे एकप्रकारचे इम्युनिटी सर्टिफिकेट असेल, या फोटो पासच्या आधारावरच तुम्हाला रेल्वेचा पास मिळेल, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिली. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते. महत्त्वाचं म्हणजे जरी दुसरा डोस घेतला असला, तरी डोस घेऊन 14 दिवस झाल्यानंतरच ओळखपत्र दिलं जाईल. त्यानंतरच लोकल प्रवासाचा पास मिळणार आहे. म्हणेज 14 दिवसांची अट पूर्ण करावी लागणार आहे.

संबंधित बातम्या :

मुख्यमंत्र्यांनी लोकलचा सोपा प्रश्न अवघड केला, परवानगी देताना नवे अडथळे निर्माण केल्याचा भाजपचा आरोप

उद्धव ठाकरेंकडून मुंबई लोकल सुरु करण्याची घोषणा, नितेश राणे म्हणतात, ‘दुनिया झुकती हैं, झुकानेवाला चाहिए!’

State Government’s proposal to Railway Board regarding Mumbai local travel

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.