AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धक्कादायक: पुण्यात शिकत असलेल्या तरुणीचा जीबीएसमुळे मृत्यू, पाणीपुरी खाल्ल्यानंतर त्रास सुरु

पुण्यात शिक्षणासाठी आलेल्या एका तरुणीचा जीबीएस या विचित्र आजाराने बळी गेला आहे. त्यामुळे जीबीएस आजाराविषयी घबराट निर्माण झाली आहे. या आजाराचा वृद्ध आणि लहान मुलांना त्रास होतो असे म्हटले जात होते. परंतू आता तरुण मुलीचा बळी गेल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.

धक्कादायक: पुण्यात शिकत असलेल्या तरुणीचा जीबीएसमुळे मृत्यू, पाणीपुरी खाल्ल्यानंतर त्रास सुरु
| Updated on: Feb 19, 2025 | 5:04 PM
Share

जीबीएस या गुढ आजारामुळे राज्यात घबराट पसरली असताना आता या आजाराचे बळी वाढत चालले आहेत. या आजाराने पुण्यात शिकत असलेल्या एका विद्यार्थींनीचा बळी गेला आहे. या विद्यार्थीनी पुण्यात सिंहगड परिसरात शिकत होती. तिला पाणीपुरी खाल्यानंतर त्रास होऊ लागला होता. त्यानंतर तिची तब्येत खालावली तिच्यावर बारामतीत रुग्णालयात उपचार सुरु होते. काल तिचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.

तीन आठवड्यापूर्वी पुण्यातील सिंहगड परिसरात शिकत असलेल्या बारामतीतील तरुणीला पाणीपुरी खाल्ल्यानंतर त्रास सुरू झाला होता. ही तरुणी बारामतीत पोहोचल्यानंतर तिला जुलाब आणि अशक्तपणा जाणवू लागला होता. बारामतीतील रुग्णालयात उपचारासाठी गेल्यानंतर डॉक्टरांना तपासणी केली. त्यानंतर लगेच डॉक्टरांनी तिला पुण्याला उपचारासाठी घेऊन जाण्याचा सल्ला तिच्या नातेवाईकांना सल्ला दिला. गेली तीन आठवडे तिची सुरु असलेली झुंज अखेर संपली आहे.पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असतानाही तिचा काल अचानक मृत्यू झाला. किरण राजेंद्र देशमुख असे या दुदर्वी युवतीचे नाव आहे.

अमरावतीत जीबीएसचा शिरकाव..

सध्या राज्यात सर्वत्र धुमाकूळ घालत असलेला जीबीएस या आजाराचा रुग्ण अमरावती जिल्ह्यात देखील आढळून आला आहे. 65 वर्षीय या रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसीयूमध्ये दाखल केले आहे. अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील अष्टगाव येथील ही व्यक्ती १२ दिवसापूर्वी पुण्याहून प्रवास करून आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. मात्र या पहिल्या जीबीएस रुग्णामुळे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

जळगावात तीन वर्षीय बालकाला ‘जीबीएस’

जळगावात तीन वर्षीय बालकाला ‘जीबीएस’ आजार झाल्याचे उघडकीस आले आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील बालरोग विभागातील अतिदक्षता वॉर्डात या बालकावर उपचार सुरू आहेत.या बालकाला गेल्याकाही दिवसांपासून पायदुखीचा त्रास झाल्याने रक्ताची तपासणी केली असता त्याला जीबीएस आजार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. ‘जीबीएस’ या आजाराचे जिल्ह्यात आतापर्यंत तीन रुग्ण आढळून आले असून एका महिला रुग्णाला नुकताच डिस्चार्ज दिला आहे. तर एका तरुणासह बालकावर उपचार सुरू आहेत.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.