AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तेव्हा कुठे गेली होती नैतिकता? सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर फडणवीस यांचा उद्धव ठाकरे यांना सवाल

devendra fadnavis on supreme court decision : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी न्यायालयाच्या निकालाची माहिती दिली. तसेच उद्धव ठाकरे यांच्या नैतिकतेवर प्रश्न उपस्थित केले.

तेव्हा कुठे गेली होती नैतिकता? सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर फडणवीस यांचा उद्धव ठाकरे यांना सवाल
Image Credit source: TV9 NETWORK
Follow us
| Updated on: May 11, 2023 | 2:38 PM

मुंबई : राज्याच्या सत्ता संघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. सुप्रीम कोर्टाने 16 आमदारांचा विषय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला. हा निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने अनेक निरीक्षणे नोंदवली. व्हीप, राज्यपालांची भूमिका आणि प्रतोद या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाच्या टिपण्या केल्या. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन निकाल नेमका काय आहे, यासंदर्भात माहिती दिली. तसेच आपण निकालाबाबत समाधानी असल्याचे त्यांनी म्हटले. सर्वोच्च न्यायालयाने शिंदे सरकार पूर्णपणे कायदेशीर असल्यावर न्यायालयाने शिक्कामोर्तब केला.

काय म्हणाले फडणवीस

  • उद्धव ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्री बनवले जाऊ शकत नाही. त्यांनी राजीनामा दिला आहे.
  • आमदार अपात्रतेसंदर्भात निर्णय विधानसभा अध्यक्ष घेणार आहे, हा सर्वोच्च न्यायालय घेणार नाही.
  • निवडणूक आयोग स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकतो, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.
  • राज्यपालांनी शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याचा जो निर्णय घेतला, तो योग्य आहे.

सरकार पूर्ण कायदेशीर

हे सुद्धा वाचा

सरकार पूर्णपणे कायदेशीर आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. अपात्रतेसंदर्भातील अधिकार अध्यक्षांना आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. राजकीय पक्ष ठरवण्याचा अधिकारीही अध्यक्षांना असल्याचे त्यांनी म्हटले आहे. जे लोक कालपर्यंत सरकार जाणार म्हणून उड्या मारत होते आता त्यांच्या मनसुब्यांवर पाणी फेरलं आहे. त्यांनी वेगवेगळ्या चर्चा केल्या त्या किती थोतांड होत्या हेही दिसून आलं असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे यांना टोला

उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, मी नैतिकतेच्या आधारे राजीनामा दिला. त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, भाजपसोबत निवडून आला आणि काँग्रेस राष्ट्रवादीसोबत गेला, तेव्हा नैतिकता कुठे गेली होती. तुम्ही नैतिकतेवर बोलण्याचा अधिकार नाही.

एकनाथ शिंदे यांनी राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही

एकनाथ शिंदे यांच्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट निर्णय दिला आहे. यामुळे एकनाथ शिंदे यांचा राजीनामा देण्याचा प्रश्नच नसल्याचे फडणवीस यांनी सांगितले. राज्यपालांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याचा जो निर्णय घेतला, तो सर्वोच्च न्यायालयाने योग्य ठरवला.

पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी आणि भारतीय लष्करात चकमक सुरू
पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी आणि भारतीय लष्करात चकमक सुरू.
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना लष्कराने घेरलं; सुत्रांची माहिती
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना लष्कराने घेरलं; सुत्रांची माहिती.
पर्यटकांच्या हत्येचा बदला कोणत्याही क्षणी? देशात हालचालींना वेग
पर्यटकांच्या हत्येचा बदला कोणत्याही क्षणी? देशात हालचालींना वेग.
पहलगाम हल्ल्यानंतर आज केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक
पहलगाम हल्ल्यानंतर आज केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक.
पाकिस्तान सुधरेना! कुरघोड्या सुरूच, सलग पाचव्या दिवशी गोळीबार
पाकिस्तान सुधरेना! कुरघोड्या सुरूच, सलग पाचव्या दिवशी गोळीबार.
532 भारतीय नागरिक मायदेशी परतले
532 भारतीय नागरिक मायदेशी परतले.
नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर
नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर.
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू.
पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर...
पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर....
सॅल्यूट...बघा भारतीय सैन्याची ताकद, त्रिशक्ती कॉर्प्सकडून व्हिडीओ शेअर
सॅल्यूट...बघा भारतीय सैन्याची ताकद, त्रिशक्ती कॉर्प्सकडून व्हिडीओ शेअर.