AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amol Mitkari : कोण हारतो, कोण जिंकतो, याची चिंता हवी कशाला? अमोल मिटकरी यांचा काँग्रेसला चिमटा, काँग्रेसच्या आमदाराचा शायरीतून भीमटोला

Amol Mitkari attack on Congress : अमोल मिटकरी सध्या अजित पवार गटाचा एकहाती किल्ला लढवताना दिसत आहे. भाजप, शिंदेसेना या महायुतीमधील स्व‍कीयांच्या हल्ल्यावर त्यांनी त्वेषाने किल्ला लढवला. आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी अजित पवार गोटातील वादळ समोर आले आहे.

Amol Mitkari : कोण हारतो, कोण जिंकतो, याची चिंता हवी कशाला? अमोल मिटकरी यांचा काँग्रेसला चिमटा, काँग्रेसच्या आमदाराचा शायरीतून भीमटोला
अमोल मिटकरी
| Edited By: | Updated on: Jun 28, 2024 | 4:27 PM
Share

अजित पवार यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. पण लोकसभा निकालानंतर महायुतीत अलबेल नसल्याचे दिसून आले. अमोल मिटकरी यांनी महायुतीतील हल्ल्यांना त्वेषाने तोंड दिले. भाजप आणि शिंदेसेना अजित पवार गटावर नाराज असल्याचे समोर आले. त्यावेळी अमोल मिटकरी यांनी थेट वेगळी चूल मांडण्याची भूमिका घेतली. अर्थात त्यांना पक्षातून कान टोचणी मिळाली. आता महायुतीच नाही तर काँग्रेसने पण त्यांची भूमिका मांडली. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी अजित पवार गोटातील वादळ समोर आले. टीव्ही ९ मराठी बोलताना अमोल मिटकरी आणि काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी अभंग, शायरीतून असे भीमटोले दिले.

मिटकरींचा भाजप-शिंदेसेनेला इशारा 

महायुतीमध्ये अजित दादांच्या बाबतीत कोणी दुर्भाष्य करण्याचा प्रयत्न करू नये. वारंवार बोलून महायुतीच्या दोन्ही घटक पक्षांनी आपली इमेज खराब करून घेऊ नयेत, असे अमोल मिटकरी यांनी स्पष्ट केले. यापूर्वी अमोल मिटकरी यांनी भाजप नेत्यांनी अजित पवार यांच्याबाबत केलेल्या विधानाचा समाचार घेतला होता. त्यावरुन त्यांनी आज हा इशारा दिला.

गोरंट्याल यांचा दिली ही धमकी

अमोल मिटकरी आणि काँग्रेसचे कैलास गोरंट्याल हे जवळच होते. अजितदादांविषयी काँग्रेसच्या गोटात काय चालले आहे, याची चुणूक यावेळी गोरंट्याल यांनी दाखवली. विधानसभेच्या अधिवेशनापूर्वी काँग्रेसच्या आमदारांची बैठक झाली. त्यात अजित पवार जर पुन्हा राष्ट्रवादीत परत आले तर त्यांना घेऊ नये, काँग्रेसच्या पक्ष प्रमुखांनी त्यांना विरोध करावा, अशी मागणी केल्याचे गोरंट्याल यांनी सांगितले. त्यामुळे राज्यातील राजकीय समीकरणं कशी वळण घेत आहेत, हे दिसून येत आहे.

अजित पवार हे राज्याचे गरुड

त्यावर लागलीच मिटकरी यांनी उत्तर दिले. काँग्रेसमधील ही खदखद समोर आल्याचे ते म्हणाले. पण एक गोष्ट त्यांनाही सांगतो की जे जो गरुड पक्षी असताना पक्षाचा राजा त्याला कोणाच्या कुबड्यांची गरज लागत नाही. शेवटी अजितदादा या महाराष्ट्राच्या गरुड पक्षासारखा व्यक्ती आहे. त्याच्यामुळे आमच्याकडे आल्यानंतरच त्यांचं भलं होईल किंवा आमच्याकडे त्यांना घेऊन येऊ नका ,असं जर कोणी करत असेल तर त्या त्यांच्या बाष्कळ गप्पा आहेत, असा टोला मिटकरी यांनी गोरंट्याल यांना लगावला.

कोण जिंकतो चिंता हवी कशाला

अजित दादा या महाराष्ट्राचा ब्रँड आहेत. महाविकास आघाडीच्या काळामध्ये काँग्रेस पक्षाला सर्वात जास्त फायदा अजित दादांमुळे झाला. उद्धव ठाकरे सुद्धा सदनामध्ये येत नव्हते. त्यावेळेस जीवाची परवाना करता अजितदादा मंत्रालयात बसत होते. यशोमती ताई त्यावेळेस महिला बालकल्याण मंत्री होते. त्याच्यामुळे मला असं वाटते काँग्रेस पक्षाने काँग्रेसची काळजी करावी. ‘कोण हार तो कोण जिंकतो चिंता हवी कशाला चिंता’ याची चिंता लढणाऱ्याला बघणाऱ्याला नाही असा चिमटा मिटकरी यांनी यावेळी काढला.

जिनके घरो मै मिठे गठ्ठे होते वो दिल से बडे होते है

जो मिठ्ठे होते है वो अंधर से सडे होते है,

अशा शायरीतून गोरंट्याल यांनी निशाणा साधला. तर ‘तुका म्हणे विंचवाची नांगी । तैसा दुर्जन सर्वांगीं’ असा टोला मिटकरी यांनी लगावला. या दोघांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला होता.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.