AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Andheri Accident: अंधेरीच्या नाल्यात कोसळलेल्या कारमधून कॉल सेंटरमधील कर्मचाऱ्यांची थरारक सुटका! पाचही जणांना वाचवण्यात यश

अंधेरी-एमआयडीसी परिसरात असलेल्या कॉल सेंटरची कार (Call center car accident) पश्चिम उपनगरातील कामगारांना कामाची वेळ संपवून घरी सोडण्यासाठी जात असताना पहाटे साडेचारच्या सुमारास ही घटना घडली.

Andheri Accident: अंधेरीच्या नाल्यात कोसळलेल्या कारमधून कॉल सेंटरमधील कर्मचाऱ्यांची थरारक सुटका! पाचही जणांना वाचवण्यात यश
अंधेरी कार अपघात
| Updated on: Aug 10, 2022 | 2:15 PM
Share

Andheri Accident: अंधेरी मेट्रोच्या मोगरा नाल्यात (Mogra Nala) कार कोसळून अपघात झाल्याची घटना आज पहाटे घडली.  कार पडल्यानंतर चार बीपीओ कर्मचारी आणि वाहन चालकाला वाचवण्यात यश आले आहे. अपघातानंतर  सुमारे पाच तासांनी अपघातग्रस्त कारला सकाळी 9 च्या सुमारास नाल्यातून बाहेर काढण्यात यश आले. प्रभाग अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार. मुसळधार पावसानंतर पाणी साचल्याने अंधेरी मेट्रो मंगळवारी सकाळी वाहतुकीसाठी बंद करण्यात आली होती. अंधेरी-एमआयडीसी परिसरात असलेल्या कॉल सेंटरची कार (Call center car accident) पश्चिम उपनगरातील कामगारांना कामाची वेळ संपवून घरी सोडण्यासाठी जात असताना पहाटे साडेचारच्या सुमारास ही घटना घडली.

वरिष्ठ निरीक्षक मिलिंद कुर्डे यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रत्येकी दोन महिला आणि तीन पुरुष असे पाचही जण या गंभीर अपघातातून थोडक्यात बचावले गेले. डीएन नगर पोलिस व्हॅन क्रमांक 1 ला परिसरातील एका गॅरेज मालकाकडून अपघाताची माहिती मिळाली आणि काही मिनिटांतच पोलीस घटनास्थळी पोहोचले.

मदत मिळण्यास विलंब झाला असता तर यात जीवित हानीची मोठी शक्यता होती असे प्रत्यदर्शींनी सांगितले. अपघातग्रस्तांना  बाहेर काढल्यानंतर त्यांना मानसिक धक्का बसला आहे. या सर्वांचे समुपदेशन करून त्यांना कूपर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आणि तपासणीनंतर डिस्चार्ज देण्यात आला. सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. डीएन नगर पोलिसांनी घटनेची  नोंद केली आहे.

मुसळधार पावसामुळे अपघाताची शक्यता वाढली

मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस सुरु आहे. गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे परिसरातले नद्या नाले तुडुंब भरून वाहत आहे. परिणामी शहातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. साचलेल्या पाण्यामुळे रत्यावरचे गड्डे अदृश्य झाल्याने अपघाताची शक्यता बळावली आहे. अशातच अनेक ठिकाणी सत्याची कामं अर्धवट झालेली आहे तर काही ठिकाणी बांधकाम साहित्य विखुरलेले असल्याने हे अपघाताला निमंत्रण ठरत आहे. स्थानिक प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष देणे आवश्यक आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.