AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आरेच्या नावानं बोंब मारता मग आरेतला बलात्कार दिसला नाही का? : आशिष शेलार

भाजप नेते आशिष शेलार यांच्यासह चित्रा वाघ आणि प्रसाद लाड यांनी महिला अत्याचाराच्या मुद्द्यावर ठाकरे सरकारवर सडकून टीका केली आहे (Ashish Shelar criticize Thackeray Government over Violence against Women).

आरेच्या नावानं बोंब मारता मग आरेतला बलात्कार दिसला नाही का? : आशिष शेलार
| Updated on: Oct 12, 2020 | 6:51 PM
Share

मुंबई : भाजप नेते आशिष शेलार यांच्यासह चित्रा वाघ आणि प्रसाद लाड यांनी महिला अत्याचाराच्या मुद्द्यावर ठाकरे सरकारवर सडकून टीका केली आहे (Ashish Shelar criticize Thackeray Government over Violence against Women). या सरकारला कसलीही लाज वाटत नाही. एवढं सगळं होतंय, पण यांना फक्त राजकारण करता येतंय, असा आरोप आशिष शेलार यांनी केला आहे. प्रसाद लाड यांनी मुंबईतील वीजेच्या प्रश्नावरुन सरकारवर निशाणा साधला. भाजपच्या महिला मोर्चाचा धसका घेतल्यानेच मुंबईची लाईट घालवल्याचा आरोप प्रसाद लाड यांनी केला.

आशिष शेलार म्हणाले, “ठाकरे सरकार हे फक्त झोपलेलं सरकार आहे. त्यांना आता जागं करण्यासाठी हा मोर्चा काढला आहे. याची दखल घेतली नाही, तर देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात हाच आक्रोश रस्त्यावर उतरेल. दोन महिन्याच्या आत महिला अत्याचार प्रकरणाचा तपास पूर्ण केलाच पाहिजे अशा केंद्र सरकारच्या गाईडलाईन्स आहेत. मात्र, महाराष्ट्रात तसं होताना दिसत नाही.”

“या सरकारला विद्यार्थी, शेतकरी, महिलांबद्दल काहीच पडलेलं नाही. मुख्यमंत्र्यांना बाकीचं काहीच देणं घेणं नाही. आरेच्या नावानं बोंब मारता मग आरेतला बलात्कार दिसला नाही का? रिहा चक्रवर्तीची चिंता आहे, तिची काळजी कराच, पण बाकीच्यांच काय?” असेही सवाल आशिष शेलार यांनी विचारले.

प्रसाद लाड म्हणाले, “कायदा आणि सुव्यवस्थेचे रोज धिंडवडे निघत आहेत. महिलांवरील अत्याचार शिगेला पोहोचलेले आहेत. असं असताना निष्क्रीय बसून राहणाऱ्या सरकारच्या निषेधात शिवाजी पार्कवर जनतेचा प्रचंड आक्रोश दिसून आला. सरकार विरोधात भाजपने काढलेल्या मोर्चाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.” यावेळी लाड यांनी सरकारने भाजप महिला मोर्चाचा धसका घेतला म्हणूनच मुंबईची लाईट घालवल्याचाही आरोप केला.

चित्रा वाघ यांनी देखील हे सरकार लाज आणणारं बेशरम सरकार असल्याची घणाघाती टीका केली.

संबंधित बातम्या :

‘राज्यात दिशा कायदा तात्काळ लागू करा’, भाजपचं राज्यभरात महिला अत्याचारविरोधात आक्रोश मोर्चे

संबंधित व्हिडीओ :

Ashish Shelar criticize Thackeray Government over Violence against Women

ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.