AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! ‘राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना तातडीने पदावरुन दूर करा’, उदयनराजे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाचं प्रकरण आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत गेलंय.

मोठी बातमी! 'राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना तातडीने पदावरुन दूर करा', उदयनराजे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार
उदयनराजे भोसले Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Nov 23, 2022 | 9:18 PM

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाचं प्रकरण आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत गेलंय. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि भाजप खासदार उदयनराजे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना याबाबत पत्र लिहिलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबतीत अवमानकारक वक्तव्य करणाऱ्यांवर ठोस कारवाई करा, अशी मागणी उदयनराजे यांनी केलीय. उदयनराजे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांचीदेखील पत्राद्वारे पंतप्रधान मोदींकडे तक्रार केलीय. याप्रकरणी नरेंद्र मोदी काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

‘राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना तातडीने पदावरुन दूर करा’, अशी मागणी उदयनराजे भोसले यांनी पत्राद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केलीय. तसेच “महाराष्ट्रात अडीच वर्षे होऊनही त्यांना शिवराय समजले नाहीत. ही बाब अत्यंत दुर्देवी आहे”, असा खेद त्यांनी व्यक्त केलाय.

उदयनराजे भोसले पत्रात नेमकं काय म्हणाले आहेत?

“काही व्यक्तींकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी जाणीवपूर्वक वादग्रस्त वक्तव्ये करुन सामाजिक सलोखा बिघडवला जात आहे. ही बाब आपल्या देशाच्या अस्मितेसाठी अतिशय दुर्देवी आहे. याकडे अतिशय गांभीर्याने पाहण्याची गरज आहे”, असं उदयनराजे आपल्या पत्रात पंतप्रधानांना उद्देशून म्हणतात.

“२० नोव्हेंबर २०२२ रोजी आलेल्या दोन वक्तव्यांनी महाराष्ट्राचे समाजमन संतप्त बनले आहे. त्यातील पहिले वक्तव्य महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे आहे. आणि दुसरे वक्तव्य हे भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांचे आहे. त्यांची ही वक्तव्ये निषेधार्ह आहेत. मी त्यांचा तीव्र शब्दांत निषेध करतो”, असं उदयनराजे म्हणाले आहेत.

“राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराजांचा अपमान केलाच आहे. पण यापूर्वीही त्यांनी समर्थ रामदास गुरु होते म्हणून महाराजांना स्वराज्य स्थापन करता आले, रामदास नसते तर ते शक्य झाले नसते, या आशयाचे विधान केले होते. शिवाजी महाराजांचे महत्त्व कमी करण्याचा हा प्रयत्न आहे”, अशी तक्रार उदयनराजे यांनी केलीय.

“राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी यापूर्वी महात्मा जोतीबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केले होते. हे सर्व वक्तव्ये त्यांनी जाहीर कार्यक्रमात केली आहेत. त्यांना जनमानसांतून निषेध होऊनही ते स्वत: बदलायला तयार नाहीत”, असं उदयनराजे म्हणाले आहेत.

“महाराष्ट्रात अडीच वर्षे होऊनही त्यांना शिवराय समजले नाहीत. ही बाब अत्यंत दुर्देवी आहे. राज्यपाल हे घटनात्मक पद असतानादेखील ते दिवसेंदिवस आपल्या पदाची प्रतिष्ठा रसातळाला नेत आहेत”, असं मत त्यांनी मांडलं.

“राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना तातडीने राज्यपाल पदावरुन दूर करावे, अशी आमची मागणी आहे. आपण यावर योग्य ती कारवाई कराल याची खात्री आहे”, असं उदयनराजे पंतप्रधान मोदींना पाठवलेल्या पत्रात म्हणाले आहेत.

पाकिस्तानचे धाबे दणाणले; आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील सुरक्षा वाढवली
पाकिस्तानचे धाबे दणाणले; आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील सुरक्षा वाढवली.
पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ स्थानिक रस्त्यावर अन् भारतीयांना आर्त हाक
पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ स्थानिक रस्त्यावर अन् भारतीयांना आर्त हाक.
पर्यटकांच्या तान्ह्या बाळाला वाचवण्यासाठी काश्मिरी चिमुकला सरसावला
पर्यटकांच्या तान्ह्या बाळाला वाचवण्यासाठी काश्मिरी चिमुकला सरसावला.
'मोदी, फक्त 1 तास...', पहलगाम हल्ल्यावरून बांगर भडकले अन् जीभही घसरली
'मोदी, फक्त 1 तास...', पहलगाम हल्ल्यावरून बांगर भडकले अन् जीभही घसरली.
राजस्थानजवळ पाकने जैश-ए-मोहम्मदचे 4 दहशतवादी तळ बांधले
राजस्थानजवळ पाकने जैश-ए-मोहम्मदचे 4 दहशतवादी तळ बांधले.
अतिरेक्यांची बंदूक हिसकवण्याच्या प्रयत्नात आदिलनं गमावला जीव, घडलं काय
अतिरेक्यांची बंदूक हिसकवण्याच्या प्रयत्नात आदिलनं गमावला जीव, घडलं काय.
'त्यानं जीवाची बाजी लावली अन्', भाजप नेत्याची नजाकत भाईंसाठी खास पोस्ट
'त्यानं जीवाची बाजी लावली अन्', भाजप नेत्याची नजाकत भाईंसाठी खास पोस्ट.
उधमपूरमध्ये दहशतवाद्यांशी चकमक; अली शेख यांना वीरमरण
उधमपूरमध्ये दहशतवाद्यांशी चकमक; अली शेख यांना वीरमरण.
'उर्दूही पहिलीपासून शिकवली पाहिजे', शिंदेंच्या नेत्यानं काय म्हटलं?
'उर्दूही पहिलीपासून शिकवली पाहिजे', शिंदेंच्या नेत्यानं काय म्हटलं?.
खळबळजनक! मालेगावमध्ये 9 ठिकाणी ईडीचे छापे
खळबळजनक! मालेगावमध्ये 9 ठिकाणी ईडीचे छापे.