AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SARTHI | मराठा समाजात एकी हवी, विजय आपलाच : छत्रपती संभाजीराजे

बैठकीनंतर अवघ्या 2 तासात सारथी संस्थेला 8 कोटी रुपये देण्याचं सरकारी परिपत्रक जारी करण्यात आलं. त्यावर ट्विट करत छत्रपती संभाजीराजेंनी समाधान व्यक्त केलं

SARTHI | मराठा समाजात एकी हवी, विजय आपलाच : छत्रपती संभाजीराजे
| Updated on: Jul 09, 2020 | 9:45 PM
Share

मुंबई : मराठा समाजात एकी हवी, समाजात एकी असली की सर्व काही करुन घेता येतं (Chhatrapati Sambhajiraje Tweet), असं ट्विट छत्रपती संभाजीराजे यांनी केलं आहे. सारथी संस्थेच्या बैठकीनंतर अजित पवारांनी सारथी संस्थेसाठी 8 कोटी रुपयांची मदत जाहीर केली. या बैठकीनंतर अवघ्या 2 तासात सारथी संस्थेला 8 कोटी रुपये देण्याचं सरकारी परिपत्रक जारी करण्यात आलं. त्यावर ट्विट करत छत्रपती संभाजीराजेंनी समाधान व्यक्त केलं (Chhatrapati Sambhajiraje Tweet) आहे.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज

मराठा समाजात एकी हवी : छत्रपती संभाजीराजे

“सारथी! दोन तासात 8 कोटी रुपयाचा निधी मिळवता आला. सर्व मागण्या मान्य करुन घेता आल्या. ही समाजाची ताकद आहे. हा मराठा समाजाचा विजय आहे. समाजात एकी असली की सर्व काही करुन घेता येतं. स्वायत्त आणि सक्षम सारथी गरीब मराठा समाजातील गुणवंत युवकांच्या जीवनात क्रांती घडवेल”, असं ट्विट छत्रपती संभाजीराजे यांनी केलं.

दोन तासात सारथी संस्थेला 8 कोटी, परिपत्रक जारी

मराठा समाज समन्वयकांसोबतच्या बैठकीत वाद झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार संभाजीराजे छत्रपती यांना आपल्या दालनात बोलावून बैठक घेतली. यावेळी अजित पवार यांनी संभाजीराजे यांना आपल्यासोबत समोर मंचावर बसवले. या बैठकीत मंत्री विजय वडेट्टीवार, नवाब मलिक, सचिन सावंत हे देखील उपस्थित होते.

“सारथी संस्था बंद होणार नाही. कुणीही अफवा पसरवू नका. मराठा समाजात गैरसमज पसरवू नका, सारथीचं काम पारदर्शी व्हावं”, असं अजित पवार या बैठकीदरम्यान म्हणाले. तसेच, सारथीला 8 कोटी उद्याच दिले जातील, असं अजित पवार म्हणाले होते. मात्र, बैठकीनंतर अवघ्या दोन तासांच्या आत सारथीला 8 कोटी देण्याचं सरकारी परिपत्रक जारी करण्यात आलं आहे.

Chhatrapati Sambhajiraje Tweet

बैठकीत गदारोळ

अजित पवार यांनी सारथीच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आयोजित बैठकीत खासदार संभाजीराजेंना स्वतः फोन करुन बोलावलं होतं. मात्र, बैठकीत संभाजीराजे यांना खाली बसवल्याचा मुद्दा उपस्थित करत संभाजीराजेंच्या समर्थकांनी गोंधळ घातला. त्यामुळे मराठा समन्वयकांसोबत सुरु झालेली बैठक लगेचच आटोपली. विशेष म्हणजे यावेळी संभाजीराजे छत्रपती यांनी बोलण्यास सुरुवात केली. मात्र, अजित पवार यांनी आपण दालनात बोलू असं म्हणत बैठक सोडली. यानंतर मराठा समाजाच्या समन्वयकांनी जाणून बुजून छत्रपती संभाजीराजेंचा अपमान केल्याचा आरोप केला.

यावेळी संभाजीराजे म्हणाले, “मी समाजासाठी आलोय. मला खाली बसण्यात कसलाही अपमान वाटत नाही. आपल्याला समाज महत्वाचा आहे. समाजासाठी आपण मान अपमान न मानता बैठक करु. निर्णय महत्वाचा आहे. सारथी महत्वाची आहे.”

संभाजीराजे यांनी आवाहन करुनही त्यांच्या समर्थकांनी मोठा गोंधळ घातला. यानंतर अजित पवारांनी चूक सुधारत संभाजीराजेंना वरती येण्याचा आग्रह केला. परंतु संभाजी राजे तिसऱ्या ओळीत बसले. त्यांनी कार्यकर्त्यांना न गोंधळ घालण्याचं आवाहन केलं. आपल्याला समाज महत्वाचा आहे. समाजासाठी आपण मान अपमान न मानता बैठक करु. निर्णय महत्वाचा आहे. सारथी महत्वाची आहे, असं मत त्यांनी व्यक्त केलं.

Chhatrapati Sambhajiraje Tweet

संबंधित बातम्या :

सारथीच्या बैठकीत मराठा समाज समन्वयकांचा गोंधळ, संभाजीराजेंना मंचाखाली बसवल्याने वाद

SARTHI Meeting: सारथी संस्थेला 8 कोटींची मदत, अजित पवारांची घोषणा, वादावर पडदा

अजित पवारांचा छत्रपती संभाजीराजेंना फोन, ‘सारथी’ प्रश्नी बैठकीला येण्याची विनंती

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.