AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vijay Wadettiwar : सरकार अजून अस्तित्वात, कुणाच्या हस्तक्षेपाची गरज नाही; भाजपाच्या राजकारणावरून विजय वडेट्टीवार यांचा टोला

भाजपावर टीका करताना आणि सरकारची भूमिका स्पष्ट करताना विजय वडेट्टीवार म्हणाले, की कोणत्या पक्षाने काय मागणी करायची हा त्यांचा प्रश्न आहे. जोपर्यंत सरकार अल्पमतात आहे, हे सिद्ध होत नाही, तो सरकार अस्तित्वात आहे, हेच सिद्ध होते.

Vijay Wadettiwar : सरकार अजून अस्तित्वात, कुणाच्या हस्तक्षेपाची गरज नाही; भाजपाच्या राजकारणावरून विजय वडेट्टीवार यांचा टोला
विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूरात झालेल्या पीक नुकासनीची पाहणी केली.Image Credit source: tv9
| Updated on: Jun 24, 2022 | 1:45 PM
Share

मुंबई : सरकार अडचणीत नाही, सरकार भक्कम आहे. राज्यात सरकार अस्तित्वात आहे अजून. त्यामुळे कुणाला हस्तक्षेप करण्याची गरज नाही, असे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले आहेत. ते मुंबईत बोलत होते. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केले. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) कोसळण्याच्या स्थितीत आहे. या राजकीय प्रसंगाचा भाजपा पुरेपूर फायदा घेत असून अॅक्टिव्ह मोडमध्ये दिसत आहे. त्यांनी आता राज्यपालांना पत्र पाठवले असून राज्यात अंदाधूंद कारभार सुरू आहे. तेव्हा लक्ष घालण्याची मागणी या पत्राद्वारे भाजपाने केली आहे. यावर विजय वडेट्टीवार यांनी भाजपावर (Maharashtra BJP) टीकास्त्र सोडले आहे. राज्यात अजून सरकार आहे. त्यामुळे राज्यपालांच्या हस्तक्षेपाचा प्रश्नच नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

‘कामे थांबली नाहीत’

भाजपावर टीका करताना आणि सरकारची भूमिका स्पष्ट करताना विजय वडेट्टीवार म्हणाले, की कोणत्या पक्षाने काय मागणी करायची हा त्यांचा प्रश्न आहे. जोपर्यंत सरकार अल्पमतात आहे, हे सिद्ध होत नाही, तो सरकार अस्तित्वात आहे, हेच सिद्ध होते. अशास्थितीत कामे थांबली जात नाहीत. जनतेच्या हिताची कामे करताना दे निर्णय सरकारला घ्यावे लागतात, ते निर्णय घेण्याची प्रक्रिया तर सुरूच आहे. शासन कधी बंद पडतात काय, असा सवाल करत पक्षाच्या सत्ता बदलू शकतात. मात्र शासन, सरकार म्हणून जनतेची जी रुटीन कामे आहेत, ती सरकारला, प्रशासनाला करावीच लागतात.

‘शरद पवारांच्या भूमिकेला काँग्रेसचे समर्थन’

शरद पवार यांचा राजकीय प्रवास, प्रदीर्घ राजकीय अनुभव असल्यामुळे ते आता मैदानात उतरले आहेत. त्यामुळे त्याविषयी चर्चा करण्याचा हा विषयच नाही. त्यांची आज जी भूमिका आहे, त्याला काँग्रेसचे पूर्ण समर्थन आहे, असे ते म्हणाले. संख्याबळ आणि बहुमत याविषयी आत्ता काहीच सांगू शकत नाही. त्याचा निर्णय वरिष्ठ घेतील. मात्र काँग्रेस म्हणून हे सरकार टिकवणे, लोकहिताची कामे करणे आणि राज्याला दिशा देणे ही काँग्रेसची भूमिका आहे. तर बहुमत गमावले, सरकार गेले तर आमची विरोधी बाकावर बसण्याची तयारी आहे, असे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

काय म्हणाले विजय वडेट्टीवार?

नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.