Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vijay Wadettiwar : सरकार अजून अस्तित्वात, कुणाच्या हस्तक्षेपाची गरज नाही; भाजपाच्या राजकारणावरून विजय वडेट्टीवार यांचा टोला

भाजपावर टीका करताना आणि सरकारची भूमिका स्पष्ट करताना विजय वडेट्टीवार म्हणाले, की कोणत्या पक्षाने काय मागणी करायची हा त्यांचा प्रश्न आहे. जोपर्यंत सरकार अल्पमतात आहे, हे सिद्ध होत नाही, तो सरकार अस्तित्वात आहे, हेच सिद्ध होते.

Vijay Wadettiwar : सरकार अजून अस्तित्वात, कुणाच्या हस्तक्षेपाची गरज नाही; भाजपाच्या राजकारणावरून विजय वडेट्टीवार यांचा टोला
विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूरात झालेल्या पीक नुकासनीची पाहणी केली.Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 24, 2022 | 1:45 PM

मुंबई : सरकार अडचणीत नाही, सरकार भक्कम आहे. राज्यात सरकार अस्तित्वात आहे अजून. त्यामुळे कुणाला हस्तक्षेप करण्याची गरज नाही, असे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले आहेत. ते मुंबईत बोलत होते. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केले. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) कोसळण्याच्या स्थितीत आहे. या राजकीय प्रसंगाचा भाजपा पुरेपूर फायदा घेत असून अॅक्टिव्ह मोडमध्ये दिसत आहे. त्यांनी आता राज्यपालांना पत्र पाठवले असून राज्यात अंदाधूंद कारभार सुरू आहे. तेव्हा लक्ष घालण्याची मागणी या पत्राद्वारे भाजपाने केली आहे. यावर विजय वडेट्टीवार यांनी भाजपावर (Maharashtra BJP) टीकास्त्र सोडले आहे. राज्यात अजून सरकार आहे. त्यामुळे राज्यपालांच्या हस्तक्षेपाचा प्रश्नच नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

‘कामे थांबली नाहीत’

भाजपावर टीका करताना आणि सरकारची भूमिका स्पष्ट करताना विजय वडेट्टीवार म्हणाले, की कोणत्या पक्षाने काय मागणी करायची हा त्यांचा प्रश्न आहे. जोपर्यंत सरकार अल्पमतात आहे, हे सिद्ध होत नाही, तो सरकार अस्तित्वात आहे, हेच सिद्ध होते. अशास्थितीत कामे थांबली जात नाहीत. जनतेच्या हिताची कामे करताना दे निर्णय सरकारला घ्यावे लागतात, ते निर्णय घेण्याची प्रक्रिया तर सुरूच आहे. शासन कधी बंद पडतात काय, असा सवाल करत पक्षाच्या सत्ता बदलू शकतात. मात्र शासन, सरकार म्हणून जनतेची जी रुटीन कामे आहेत, ती सरकारला, प्रशासनाला करावीच लागतात.

हे सुद्धा वाचा

‘शरद पवारांच्या भूमिकेला काँग्रेसचे समर्थन’

शरद पवार यांचा राजकीय प्रवास, प्रदीर्घ राजकीय अनुभव असल्यामुळे ते आता मैदानात उतरले आहेत. त्यामुळे त्याविषयी चर्चा करण्याचा हा विषयच नाही. त्यांची आज जी भूमिका आहे, त्याला काँग्रेसचे पूर्ण समर्थन आहे, असे ते म्हणाले. संख्याबळ आणि बहुमत याविषयी आत्ता काहीच सांगू शकत नाही. त्याचा निर्णय वरिष्ठ घेतील. मात्र काँग्रेस म्हणून हे सरकार टिकवणे, लोकहिताची कामे करणे आणि राज्याला दिशा देणे ही काँग्रेसची भूमिका आहे. तर बहुमत गमावले, सरकार गेले तर आमची विरोधी बाकावर बसण्याची तयारी आहे, असे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

काय म्हणाले विजय वडेट्टीवार?

साडीवाली दीदी..शिंदेंनंतर भाजपच्या बड्या महिला नेत्यावर कामराचा निशाणा
साडीवाली दीदी..शिंदेंनंतर भाजपच्या बड्या महिला नेत्यावर कामराचा निशाणा.
पत्रकार परिषदेत उज्वल निकम यांचा मोठा दावा
पत्रकार परिषदेत उज्वल निकम यांचा मोठा दावा.
संभाजीराजे 'वाघ्या'बाबत म्हणाले, 'महाराजांना अग्नि दिला त्यावेळी...'
संभाजीराजे 'वाघ्या'बाबत म्हणाले, 'महाराजांना अग्नि दिला त्यावेळी...'.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला.
'तुम्ही मुसलमांनाना का डॉमिनेट करता?,'शिरसाट आणि आव्हाडांमध्ये खडाजंगी
'तुम्ही मुसलमांनाना का डॉमिनेट करता?,'शिरसाट आणि आव्हाडांमध्ये खडाजंगी.
संतोष देशमुख हत्या प्रकरण; काय आहे सुनावणीचे अपडेट्स? इनसाईड स्टोरी
संतोष देशमुख हत्या प्रकरण; काय आहे सुनावणीचे अपडेट्स? इनसाईड स्टोरी.
पवारच आता दादांसोबत जातील... बच्चू कडूंच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण
पवारच आता दादांसोबत जातील... बच्चू कडूंच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण.
माझ्यावरचा हल्ला रोहित पवारांनीच केला; पडळकरांचा खळबळजनक आरोप
माझ्यावरचा हल्ला रोहित पवारांनीच केला; पडळकरांचा खळबळजनक आरोप.
'रात्री एक्स्प्रेस हायवेवर बोलवलं अन्...' दादांनी सांगितला 'तो' किस्सा
'रात्री एक्स्प्रेस हायवेवर बोलवलं अन्...' दादांनी सांगितला 'तो' किस्सा.
रायगडावरील वाघ्या कुत्र्यावरून वाद कायम, सरकार सोक्षमोक्ष करणार?
रायगडावरील वाघ्या कुत्र्यावरून वाद कायम, सरकार सोक्षमोक्ष करणार?.