AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“भाजप मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी आम्ही एकत्र लढणार”; काँग्रेसचा थेट भाजपला इशारा…

भाजपकडून सातत्याने महाराष्ट्रातील फुले, शाहू आंबेडकर यांच्या विचारांना संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तत्कालीन राज्यपाल आणि भाजपच्या नेत्यांनी आणि मंत्र्यांकडून छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला आहे.

भाजप मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी आम्ही एकत्र लढणार; काँग्रेसचा थेट भाजपला इशारा...
| Updated on: Jun 13, 2023 | 10:39 PM
Share

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल भाजपच्या डझनभर मंत्र्यांकडून अपमान केला गेला आहे. तर कालच वारकरी संप्रदायावर या सरकारने अन्याय करुन त्यांनी आपली खरी वृत्ती दाखवली असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. महाराष्ट्रमध्ये फुले,शाहू, आंबेडकर यांचा विचार संपवाण्याचा काम हे सरकार करत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी भाजपवर केला आहे. राज्यातील हे सरकार मनुवादी विचारसरणीचे सरकार आहे. त्यामुळेच डझनभर भाजपचा नेत्यांनी महापुरुषांचा अपमान केला आहे. तर महाविकास आघाडी सरकारमध्ये आम्ही माऊलींचा आदर करत त्याचा सन्मान केला होता. तर सध्याचे सरकार मात्र जाणीवपूर्वक याविरोधात वर्तन करत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर टीका करताना त्यांनी भाजप मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी आम्ही सर्व एकत्रच निवडणुका लढविणार असून महाराष्ट्र हा भाजपमुक्त झालेला असेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

यानिमित्ताने कर्नाटकमधील नागरिकांचेही आभार मानत त्यांनी मातोश्रीचेही त्यांनी आभार मानले आहेत. ज्या प्रमाणे कर्नाटकात काँग्रेसने बाजी मारली आहे, तसाच परिणाम आता महाराष्ट्रातही दिसेल असं मत त्यांनी व्यक्त केले.

भाजपकडून सातत्याने महाराष्ट्रातील फुले, शाहू आंबेडकर यांच्या विचारांना संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तत्कालीन राज्यपाल आणि भाजपच्या नेत्यांनी आणि मंत्र्यांकडून छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला आहे.

तसेच महाराष्ट्रात वारकऱ्यांची प्रथा वर्षानुवर्षे चालत आली आहे, मात्र यावेळी नियोजनबद्ध पद्धतीने वारकरी संप्रदायावर लाठीचार्च करुन वारऱ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला गेला असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.

मनुस्मृतीला पुरोगामी संतांनी विरोध केला होता, त्यामुळे या प्रथेला कसे बंद करता येईल यासाठी लाठीचार्ज केला गेला असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी भाजपवर केला आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.