AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Corona effect : मुंबईत बालकांच्या मृत्यूदरात वाढ; जन्मदर घटला

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये बालकांच्या मृत्यूदरात वाढ झाल्याचे समोर आले आहे. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने नुकतीच याबाबत आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या आकडेवारीनुसार मुंबईत बालकांच्या मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे.

Corona effect : मुंबईत बालकांच्या मृत्यूदरात वाढ; जन्मदर घटला
मुंबई महापालिका
| Edited By: | Updated on: Dec 19, 2021 | 10:08 AM
Share

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये बालकांच्या मृत्यूदरात वाढ झाल्याचे समोर आले आहे. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने नुकतीच याबाबत आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या आकडेवारीनुसार मुंबईत बालकांच्या मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. मृत्यूंमध्ये वाढ होण्यामागे कोरोनाचा प्रादुर्भाव हे महत्त्वाचे कारण असू  शकते असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. एकीकडे बालकांचा मृत्यूदर वाढला असताना दुसरीकडे मात्र जन्मदर कमी झाला आहे. 2019 च्या तुलनेत 2020 मध्ये जन्मदरात सुमारे 20  टक्के घट झाली असून, मृत्यूदर 20 टक्क्यांनी वाढला आहे.

गेल्या तीन वर्षांपासून जन्मदरात घट

महापालिकेने सादर केलेल्या आकेडवारीनुसार 2018  मध्ये 1 लाख 51 हजार 187 बालकांचा, तर 2017 मध्ये 1 लाख 55 हजार 386 बालकांचा जन्म झाला. हे लक्षात घेता 2017 च्या तुलनेत 2018 मध्ये 4 हजार 199 बालकांचा जन्म कमी झाला आहे. 2019 मध्येही हीच परिस्थिती होती. 2019  मध्ये मुंबईत 1 लाख 48 हजार बालकांचा जन्म झाला. 2018 च्या तुलनेत 2019 मध्ये 2289 बालके कमी जन्माला आली. 2020 मध्ये कोरोना काळात देखील हीच परिस्थिती कायम राहिली.  या काळात मुंबईमध्ये केवळ 1 लाख 20 हजार 188 बालकांचा जन्म झाला. तर 2021 च्या ऑक्टोबरपर्यंत 89 हजार 292 बालके जन्माला आली.

स्थलांतरामुळे जन्मदरावर परिणाम

याबाबत बोलताना  पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले की, कोरोनाचा परिणाम हा जन्म, मृत्यूवर झाला आहे. मुंबईत जेव्हा कोरोनाचा प्रादुर्भाव खूप जास्त होता आणि कडक लॉकडाऊन होते, तेव्हा मोठ्या संख्येने लोक आपल्या कुटुंबासह शहराबाहेर गेले. मुंबईत दर वर्षी सुमारे दीड लाख बालके जन्माला येतात. मात्र लॉकडाऊनच्या काळात कामगारवर्ग आपल्या कुटुंबासह स्थलांतरित झाला होता. परिस्थिती सुधारल्यावर ते मुंबईला परतले, मात्र त्यांचे कुटुंब गावीच राहिल्याने जन्मदरात घट झाली आहे.

संबंधित बातम्या 

Sameer Wankhede : मुंबई NCB ला नवा प्रमुख मिळणार , समीर वानखेडेंचा कार्यकाळ संपणार, नेमकं कारण काय?

Omicron Variant : राज्यात ओमिक्रॉनचा फैलाव चिंताजनक, नवीन 8 रुग्ण आढळले, एकूण रुग्णांची संख्या 48 वर

Nawab Malik | मलिकांविरोधात आणखी एक अब्रू नुकसानीचा दावा, तर समीर वानखेडे मुदतवाढ नाकारणार?

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.