AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mahavikas Aaghadi : मुख्यमंत्री पदावरुन महाविकास आघाडीत ठिणगी? CM पदासाठी राऊतांनी रेटले उद्धव ठाकरेंचे नाव, काँग्रेस, राष्ट्रवादीची प्रतिक्रिया काय?

Vidhansabha Election 2024 CM : विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना महाविकास आघाडीतच आतापासून मुख्यमंत्री पदावरुन कलगीतुरा रंगला आहे. बिन चेहरा घेऊन महाविकास आघाडीने विधानसभेत मतांचा जोगवा मागू नये, अशी भूमिका राऊतांना जाहीर केल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे.

Mahavikas Aaghadi : मुख्यमंत्री पदावरुन महाविकास आघाडीत ठिणगी? CM पदासाठी राऊतांनी रेटले उद्धव ठाकरेंचे नाव, काँग्रेस, राष्ट्रवादीची प्रतिक्रिया काय?
महाविकास आघाडी
| Updated on: Jun 27, 2024 | 11:12 AM
Share

विधानसभेचे मैदान आता महाविकास आघाडी आणि महायुतीला खुणावत आहे. लोकसभेतील दमदार कामगिरीने महाविकास आघाडीला शंभर हत्तीचे बळ आले आहे. विधानसभेत चमकदार कामगिरी करण्यासाठी आणि मतांचा कौल आपल्या पारड्यात टाकण्यासाठी आघाडी सज्ज झाली आहे. आजपासून पावसाळी अधिवेशनाचा बिगुल वाजला आहे. महायुती सरकारवर तुटून पडण्याची वेळ आली असतानाच खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरुन रान पेटवले आहे. मुख्यमंत्री पदाचा चेहरा न जाहीर करता, महाविकास आघाडीने मतदारांकडे मत मागू नये, अशी आग्रही भूमिका त्यांनी घेतली. त्यावरुन महाविकास आघाडीत आता कलगीतुरा रंगला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने त्यावर सावध भूमिका घेतली आहे. तर महायुतीने या आयत्या कोलतीवर चिमटे काढले आहेत.

तर निवडणुकीला सामोरे जाणे धोकादायक

खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे यांचे नाव रेटले आहे. बिन चेहऱ्याने विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने मतदान मागणे हे धोक्याचे असल्याचे राऊतांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणुकीला सामोरे जाणार हा धोका आहे. या महाराष्ट्र आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे साहेबांचे काम पाहिले आहे. लोकसभेला पण त्यांच्या चेहऱ्यामुळे मतदान झाल्याचा दावा राऊतांनी आज केला. त्यानंतर महाविकास आघाडीत आतापासूनच मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? यावरुन शीतयुद्ध सुरु असल्याचे दिसून आले.

अगोदर सत्ता तर मिळवू द्या

संजय राऊत यांच्या या विधानानंतर राजकीय वातावरण तापले आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी पण त्यावर तात्काळ प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री पदासाठी आताच महाविकास आघाडीतील कुठल्याही नेत्यांनी स्वारस्य दाखवू नये. आम्ही सत्तेवर पाहिजे हे स्वारस्य असले पाहिजे, अशी प्रतिक्रिया शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. निवडून आलेले आमदार त्यावेळी मुख्यमंत्री पदाचा निर्णय घेतली. त्यावर आताच भाष्य करणे टाळले पाहिजे अशी प्रतिक्रिया पाटील यांनी दिली.

राऊतांच्या दाव्यातील काढली हवा

काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत दमदार कामगिरी केली आहे. राऊतांच्या विधानावर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सध्या आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच एकत्र लढणार आहोत. मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा निवडणुकीनंतर आणि निकालानंतर ठरेल असे त्यांनी स्पष्ट केले.

संजय शिरसाट यांनी काढला चिमटा

संजय राऊत यांच्या मुख्यमंत्री पदाबाबतच्या विधानावर महायुतीचे नेते संजय शिरसाट यांनी चांगलाच चिमटा काढला. उद्धव ठाकरे यांना राऊतांनी पंतप्रधान पदाचे उमेदवार जाहीर केल्याची आठवण त्यांनी करुन दिली. पक्षाचा नेता म्हणून त्यांनी केलेली मागणी हे त्याच्यापूरती सीमित आहे. शरद पवार असतील किंवा इतर काँग्रेसचे नेते असतील हे कधी मान्य करतील असं मला वाटत नाही. त्यामुळे राऊत हे काडी लावत असल्याचा टोला त्यांनी हाणला. काँग्रेसचे लोकसभेतील स्ट्राईक रेट चांगला आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर शरद पवार यांची राष्ट्रवादी असल्याचे शिरसाट म्हणाले.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.