AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Prithviraj Chavan: पृथ्वीराज चव्हाणांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना स्थिर सरकारसाठी मोलाचा सल्ला, खातेवाटपाबाबत नेमकं काय म्हणाले चव्हाण?

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले आहे की, खातेवाटप करताना फक्त एकनाथ शिंदेच एकटे नसून त्यांच्यासोबत असलेले भाजपचे आमदार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत हा निर्णय घ्यावा लागणार आहे.

Prithviraj Chavan: पृथ्वीराज चव्हाणांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना स्थिर सरकारसाठी मोलाचा सल्ला, खातेवाटपाबाबत नेमकं काय म्हणाले चव्हाण?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खाते वाटप करताना माजी मुख्यमंत्र्यांनी दिला सबुरीचा सल्लाImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 01, 2022 | 8:13 PM

मुंबईः देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथ विधीनंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण  (Former Chief Minister Prithviraj Chavan) यांनी एकनाथ शिंदे यांना एक सबुरीचा सल्ला दिला आहे. पृथ्वीराज चव्हाण म्हणतात की, एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shide ) सरकारमध्ये आता जेव्हा खाते वाटप होईल त्यावेळी मात्र त्यांच्या आमदारांना नाराजीचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी खाते वाटप करताना काळजी घेणे गरजेचे असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

राज्याच्या राजकारणात ज्या एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करून सत्ता बदल घडवून आणला त्या मुख्यमंत्री शिंदे यांनाचा आता खातेवाटप करताना मोठी कसरत करावी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्या काटेरी मुकुटापाठीमागचा संघर्ष कसा करावा लागणार हे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितला.

एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदावर बसवण्यात आले असले तरी त्या पाठीमागे असलेले राजकारण, भाजपची ध्येयधोरणं आणि देवेंद्र फडणवीस यांचे उपमुख्यमंत्री होणे या निर्णयावर मत व्यक्त करताना त्यांनी सांगितले की, एकनाथ शिंदे यांनी आता स्थिर सरकार आणण्यासाठी, खातेवाटपबाबत काळजी घ्यावी असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

सहकारी आमदारांना नाराजीचा सामना

एकनाथ शिंदे यांच्याबरोबर असलेल्या बंडखोर आमदारांचे नाराजी नाट्य आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर राहणार की जाणार याकडे सगळ्यांचे लक्ष असले तरी त्या आमदारांना नाराजीचा सामना हा करावाच लागणार असल्याचेही पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

खातेवाटप करताना काळजी घ्या

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले आहे की, खातेवाटप करताना फक्त एकनाथ शिंदेच एकटे नसून त्यांच्यासोबत असलेले भाजपचे आमदार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत हा निर्णय घ्यावा लागणार आहे. त्यामुळे ज्या बंडखोर आमदारांनी शिवसेनेतून बंड केले आहे, त्या आमदारांना आता खातेवाटप करताना नाराजीचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी खातेवाटप करताना काळजी घ्या असा सल्लाही त्यानी त्यांना दिला आहे. महाविकास आघाडीतीलच काही मंत्री आता बंडखोरी करून एकनाथ शिंदे यांच्या गटात गेले आहेत. त्यामुळे त्यांचे मंत्री पद आणि एकाच भागात द्यावं लागणाऱ्या मंत्रिपदामुळेही वाद होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

हल्ल्यातील महाराष्ट्रातील पीडित कुटुंबाला 50 लाख, CM यांचा मोठा निर्णय
हल्ल्यातील महाराष्ट्रातील पीडित कुटुंबाला 50 लाख, CM यांचा मोठा निर्णय.
तर 2 मिनिटांत.. LOC वर हालचाली वाढल्या? सैन्यातील विमानांना मोठा आदेश
तर 2 मिनिटांत.. LOC वर हालचाली वाढल्या? सैन्यातील विमानांना मोठा आदेश.
अणुबॉम्बची धमकी देणं सोप्प आहे, पण.. ; पाकिस्तानबद्दल जी. डी. बक्षी या
अणुबॉम्बची धमकी देणं सोप्प आहे, पण.. ; पाकिस्तानबद्दल जी. डी. बक्षी या.
घोडा आणि खेचर पुरवणाऱ्यांचेही जबाब नोंदवणार
घोडा आणि खेचर पुरवणाऱ्यांचेही जबाब नोंदवणार.
पाकिस्तानी पत्रकारांवर कारवाई, आता भारतात टिव-टिव बंद, कारण नेमकं काय?
पाकिस्तानी पत्रकारांवर कारवाई, आता भारतात टिव-टिव बंद, कारण नेमकं काय?.
देशातील काही यूट्यूब चॅनेल बंद करण्याचे केंद्राचे आदेश
देशातील काही यूट्यूब चॅनेल बंद करण्याचे केंद्राचे आदेश.
Pahalgam Attack : संयुक्त राष्ट्रसंघात भारतानं केली पाकिस्तानची पोलखोल
Pahalgam Attack : संयुक्त राष्ट्रसंघात भारतानं केली पाकिस्तानची पोलखोल.
भारतीय फोन नंबर वापरून आयएसआय काढतंय लष्कराची माहिती
भारतीय फोन नंबर वापरून आयएसआय काढतंय लष्कराची माहिती.
नाक दाबलं की तोंड उघडतं.,'सिंधू जल' स्थगितीवर काय म्हणाले अण्णा हजारे?
नाक दाबलं की तोंड उघडतं.,'सिंधू जल' स्थगितीवर काय म्हणाले अण्णा हजारे?.
1 हजार भारतीय नागरिक मायदेशी परतले, 800 पाकिस्तान्यांनी भारत सोडला
1 हजार भारतीय नागरिक मायदेशी परतले, 800 पाकिस्तान्यांनी भारत सोडला.