AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ज्यांच्या मनात करुणा, त्यांना कोरोना होणार नाही : राज्यपाल कोश्यारी

मनात करुणा आहे त्यांना कोरोना कधीही होणार नाही, असे वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. (Governor bhagat singh koshyari on corona)

ज्यांच्या मनात करुणा, त्यांना कोरोना होणार नाही : राज्यपाल कोश्यारी
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
| Updated on: Mar 01, 2021 | 7:26 PM
Share

मुंबई : राज्यात कोरोना विषाणूचे रुग्ण पुन्हा वाढू लागले आहेत. राज्यात दरदिवशी 8 हजारांहून अधिक रुग्ण आढळत आहेत. कोरोनाच्या महामारीचा लोकांनी मोठा धसका घेतला होता. मात्र मी कधीही कोरोनाला घाबरलो नाही. ज्यांच्या मनात करुणा आहे त्यांना कोरोना कधीही होणार नाही, असे वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. (Governor bhagat singh koshyari on corona)

राजभवनात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राष्ट्रीय पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्याला राज्यपाल कोश्यारी आणि रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी हजेरी लावली. यावेळी कोश्यारी आणि आठवलेंच्या खुमासदार भाषणाची जुगलबंदी रंगली.

“कोरोनाला घाबरु नका तर काळजी घ्या”

“कोरोनाच्या महामारीचा लोकांनी मोठा धसका घेतला होता. मात्र मी कधीही कोरोनाला घाबरलो नाही. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी गो कोरोनाचा नारा दिला होता. या नाऱ्याचा उल्लेख राज्यपालांनी भाषणादरम्यान केला. मी कोरोनाला कधीही घाबरलो नाही. राजभवनमध्ये सतत लोक मला भेटत राहिले. टाळेबंदीच्या काळात ही मी लोकांना भेटणे सोडले नाही. आता तर राजभवन हे लोकभवन झाले आहे. मला लोक विचारतात की तुम्ही किती लोकांना राजभवन मध्ये भेटता, तुम्हाला कोरोना होण्याची भीती वाटत नाही का? त्यांना मी उत्तर देतो की ज्यांच्या मनात करुणा आहे त्यांना कोरोना कधीही होणार नाही,” असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले.

“कोरोनाला घाबरु नका तर काळजी घ्या, खबरदारी घ्या, हात स्वच्छ धुवा, मास्क वापरा आणि फिजिकल डिस्टन्सचा नियम पाळा,” असे आवाहन भगतसिंह कोश्यारी यांनी केले.

“पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य ऐतिहासिक क्रांतिकारी आहे. त्या अत्यंत शूर पराक्रमी होत्या. त्याच प्रमाणे तत्वज्ञानी न्यायदान करणाऱ्या लोककल्याण करणाऱ्या प्रजाहितदक्ष राज्यकर्त्या राणी होत्या. मनापासून त्यांनी जनतेची सेवा केल्याने लोककल्याणकारी राज्य केल्याने त्यांना लोकांनीच देवी उपाधी दिली. पुण्यश्लोक अहिल्यादेविंचा मराठी जनतेला अभिमान आहे. धनगर समाजाचे त्या दैवत आहेत. त्यांचा आदर्श घेऊन आपण काम केले पाहिजे,” असेही राज्यपाल म्हणाले.

“जे वाईफसाठी काम करतात, त्यांना पुरस्कार मिळत नाही”

“जे लोक लाईफमध्ये फक्त वाईफसाठी काम करतात त्यांना पुरस्कार मिळत नाही तर जे लोक वाईफला सांभाळून लाईफ मध्ये गरिबांची गरजूंची सेवा करतात. समाजसेवेत स्वतःला वाहून घेतात. त्यांचा समाज पुरस्कार देऊन गौरव करते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राष्ट्रीय पुरस्कार ज्यांना लाभला त्यांचे यावेळी रामदास आठवले यांनी अभिनंदन केले.”

यावेळी खासदार छत्रपती उदयन राजे यांनी पुण्यश्लोक अहिक्यादेवी होळकर यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव केला. यावेळी उदयनराजे महाराज यांनी रामदास आठवले यांचा आपले मोठे भाऊ असा उल्लेख करत आदरभाव व्यक्त केला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राष्ट्रीय पुरस्कार दिवंगत भय्युजी महाराज यांना देण्यात आला. तो पुरस्कार त्यांची कन्या कुहू यांनी स्वीकारला. (Governor bhagat singh koshyari on corona)

संबंधित बातम्या : 

‘मोदी हिंदू निष्ठेचे ढोल बडवतात, पण हिंदू नर्सेसवर त्यांचा विश्वास नाही’, लसीकरणावरुन आंबेडकरांची खोचक टीका

कायदे मंत्री मराठा आरक्षणाच्या बैठकीला गैरहजर का राहिले?, या मागे फडणवीस तर नाहीत?: काँग्रेस

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.