AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“आव्हाड, अंधारे यांच्या भाषणाची एसआयटी चौकशी व्हावी”; या व्यक्तीनं भाषणाचा थेट नक्षलवादाशीच संबंध जोडला…

जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका करताना गुणरत्न सदावर्ते यांनी त्यांच्या या वक्तव्याचा पाकिस्तानातील अतिरेकी संघटनेबरोबर आणि नक्षलवादाबरोबर जोडला आहे.

आव्हाड, अंधारे यांच्या भाषणाची एसआयटी चौकशी व्हावी; या व्यक्तीनं भाषणाचा थेट नक्षलवादाशीच संबंध जोडला...
| Updated on: Feb 06, 2023 | 11:25 PM
Share

मुंबईः “आवाज बहुजनांचा, सन्मान महाराष्ट्राचा” या अराजकीय कार्यक्रमाच्या माध्यमातून महापुरुषांचा इतिहास आणि वास्तव माहिती सांगण्यासाठी सुरु झालेल्या कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या एका वाक्यामुळे विरोधकांनी जोरदार हल्लाबोल चढविला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याची आणि शौर्याची तुलना करताना इतिहासातील संदर्भ देत इतिहास मांडला गेल्याने विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढविला.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास सांगतान औरंगजेब, अफजलखान आणि शाहिस्तखान या कट्टर विरोधकांबरोबर लढताना छत्रपती शिवाजी महाराज यांनी कोण कोणते डावपेच आखले, कोणत्या गनिमी काव्याने त्यांना जेरेले आणले.

या गोष्टी सांगितल्यानंतर त्यांच्या विरोधकांनी जोरदार हल्लाबोल चढवून जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात आंदोलन आणि पुतळ्याचे दहन करण्यात आले.

त्यामुळे आता या वादात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी उडी घेत जितेंद्र आव्हाड आणि सुषमा अंधारे ही दोन माणसं जाणीवपूर्वक आणि हेतूपुर्वक बोलत असतात अशी टीका सदावर्ते यांनी केली आहे. त्यांनी ही टीका करत असताना त्यांनी जितेंद्र आव्हाड आणि सुषमा अंधारे यांची एसआयटी चौकशी करावी अशी मागणी सदावर्ते यांनी केली आहे.

आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आवाज बहुजनांचा, सन्मान महाराष्टाचा या कार्यक्रमांतर्गत जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा खरा इतिहास त्यांनी सांगितला. त्यामुळे त्यांच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वक्तव्यावरून भाजपसह राष्ट्रवादीच्या विरोधकांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

त्यामुळेच गुणरत्न सदावर्ते यांनी त्यांच्यावर टीका करताना त्यांनी जितेंद्र आव्हाड यांनी जाणीवपूर्वक हे बोलले आहेत. त्यामुळे त्यांची एसआयटी चौकशी करावी अशी मागणीही सदावर्ते यांनी यावेळी केली आहे.

जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका करताना गुणरत्न सदावर्ते यांनी त्यांच्या या वक्तव्याचा पाकिस्तानातील अतिरेकी संघटनेबरोबर आणि नक्षलवादाबरोबर जोडला आहे.

तर जितेंद्र आव्हाड यांच्या या वक्तव्याचा संदर्भ त्यांनी अतिरेकी संघटनेबरोबरही केले आहे. त्यामुळे आगामी काळात जितेंद्र आव्हाड यांना हे प्रकरण जड जाणार असल्याचे दिसून येत आहे.

आमदार जितेंद्र आव्हाड आणि सुषमा अंधारे यांच्यावर टीका करताना गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, या सगळ्याला शरद पवार यांची साथ आहे. त्यामुळे जितेंद्र आव्हाड  आणि सुषमा अंधारे यांची एसआयटी चौकशी करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.