Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Lockdown: मुंबईतील दुकानं बंद ठेवायचेत, तर आर्थिक पॅकेज द्या; अन्यथा लॉकडाऊनला जुमानणार नाही: विरेन शाह

जर राज्यातील दुकानं बंद राहणार असतील तर ऑनलाईन डिलिव्हरीही बंद ठेवा. | Lockdown in Maharashtra

Maharashtra Lockdown: मुंबईतील दुकानं बंद ठेवायचेत, तर आर्थिक पॅकेज द्या; अन्यथा लॉकडाऊनला जुमानणार नाही: विरेन शाह
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Apr 11, 2021 | 9:59 AM

मुंबई: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या लॉकडाऊनच्या संभाव्य निर्णयाविरोधात मुंबईतील व्यापाऱ्यांनी पुन्हा एकदा बंडाचा झेंडा फडकावला आहे. राज्यात लॉकडाऊन करायचा असेल तर सरकार दुकानदार आणि व्यापाऱ्यांना (Traders) काय पॅकेज देणार, याबाबत घोषणा करावी. अन्यथा आम्ही लॉकडाऊनला जुमानणार नाही, असा इशारा फेडरेशन ऑफ रिटेल वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष विरेन शहा यांनी दिला आहे. (If lockdown happens then stop online delivery also demand by traders association in Mumbai)

जर राज्यातील दुकानं बंद राहणार असतील तर ऑनलाईन डिलिव्हरीही बंद ठेवा. ही सेवा सुरु राहिली तर आम्ही त्याला विरोध करु, असेही विरेन शाहा यांनी म्हटले. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबत काय निर्णय घेणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी सर्वपक्षीय नेत्यांशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी राज्यात कोरोनाला आवर घालायचा असेल तर लॉकडाऊन अपरिहार्य असल्याचे म्हटले होते. मात्र, भाजपने पूर्ण लॉकडाऊनला विरोध दर्शविला होता. लॉकडाऊन करायचा असेल राज्य सरकारने व्यापाऱ्यांना आर्थिक मदत द्यावी. त्यासाठी सरकारच्या डोक्यावर कर्ज झाले तरी चालेल, अशी भूमिका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मांडली होती.

तर दुसरीकडे साताऱ्यात भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनीही लॉकडाऊनविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. कोणत्याही परिस्थितीत आम्ही लॉकडाऊन लागू करून देणार नाही. त्यामुळे मारामारी किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्यासाठी प्रशासन जबाबदार असेल, असा इशारा उदयनराजे भोसले यांनी दिला होता.

‘निर्बंध हवे, पण जनतेचा उद्रेक लक्षात घ्या’

कोरोनाचा प्रादुर्भाव किती दिवस असेल हे सांगता येत नाही. त्यामुळे व्यवस्था तत्काळ उभ्या कराव्या लागतील. जनतेची, व्यापाऱ्यांची भावना लक्षात घ्यायला हवी. त्यांचं मागील वर्ष वाया गेले. कर, वीज बिल, कर्जाचे हप्ते भरावे लागले. त्यामुळे जीवन जगायचं कसं असा प्रश्न जनतेसमोर आहे, असं मत देवेंद्र फडणवीस यांनी सर्वपक्षीय बैठक मांडलं आहे. त्याचबरोबर कोरोना रिपोर्ट्स तात्काळ कसे मिळतील हे पाहावं लागेल. रेमडेसिव्हीर कसं उपलब्ध होतील हे पाहिलं पाहिजे, असंही फडणवीस म्हणाले.

संबंधित बातम्या:

Maharashtra Lockdown : आमदारांचा निधी 2 कोटीने कमी करा आणि कामगारांना द्या, चंद्रकांत पाटलांची दर्यादिली

मद्यप्रेमींना मुंबई महापालिकेचा दिलासा, घरपोच दारु मिळणार, पाहा काय आहेत नियम

Maharashtra Lockdown : फडणवीस म्हणाले, लॉकडाऊनमुळे उद्रेक होईल, पंकजा मुंडे म्हणतात, पर्याय काय?

(If lockdown happens then stop online delivery also demand by traders association in Mumbai)

'ज्याची जशी लायकी, तो तशी वक्तव्य करतो'.., चित्रा वाघ स्पष्टच बोलल्या
'ज्याची जशी लायकी, तो तशी वक्तव्य करतो'.., चित्रा वाघ स्पष्टच बोलल्या.
नागपूर राडा; चार आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
नागपूर राडा; चार आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी.
औरंगजेबाची कबर ही मराठ्यांच्या पराक्रमाचं स्मारक, राऊतांची प्रतिक्रिया
औरंगजेबाची कबर ही मराठ्यांच्या पराक्रमाचं स्मारक, राऊतांची प्रतिक्रिया.
तोंड उघडलं तरी घाणच बाहेर निघते; मेहबूब शेख यांची वाघ यांच्यावर टीका
तोंड उघडलं तरी घाणच बाहेर निघते; मेहबूब शेख यांची वाघ यांच्यावर टीका.
धार्मिक स्थळांना चोख बंदोबस्त; प्रार्थनेसाठी संचारबंदीतून शिथिलता
धार्मिक स्थळांना चोख बंदोबस्त; प्रार्थनेसाठी संचारबंदीतून शिथिलता.
सभागृहाची ऐसी तैसी करायचं काम सुरू आहे; जयंत पाटील संतापले
सभागृहाची ऐसी तैसी करायचं काम सुरू आहे; जयंत पाटील संतापले.
लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी, लाभार्थ्यांना कधी मिळणार 2100 रूपये?
लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी, लाभार्थ्यांना कधी मिळणार 2100 रूपये?.
'वा लगे रहो चित्रा ताई, तुमच्यासारख्या वाघिणींची गरज'; राणेंकडून कौतुक
'वा लगे रहो चित्रा ताई, तुमच्यासारख्या वाघिणींची गरज'; राणेंकडून कौतुक.
सरकारमधीलच कोणीतरी मुख्यमंत्र्यांना खाली ओढण्याचा प्रयत्न करतंय
सरकारमधीलच कोणीतरी मुख्यमंत्र्यांना खाली ओढण्याचा प्रयत्न करतंय.
असं बोलणं म्हणजे...,कडूंची चित्रा वाघ यांच्या त्या वक्तव्यानंतर नाराजी
असं बोलणं म्हणजे...,कडूंची चित्रा वाघ यांच्या त्या वक्तव्यानंतर नाराजी.