AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विधान परिषद निवडणुकीत चुरस की विजय सोपा?; कसं आहे मुंबईतील गणित

विधान परिषदेसाठी मुंबई महानगर पालिका मतदारसंघातून दोन जागांसाठी निवडणूक होत आहे. या जागांसाठी शिवसेनेकडून सुनील शिंदे आणि भाजपकडून राजहंस सिंह यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

विधान परिषद निवडणुकीत चुरस की विजय सोपा?; कसं आहे मुंबईतील गणित
rajhans singh
Follow us
| Updated on: Dec 06, 2021 | 1:15 PM

मुंबई: विधान परिषदेसाठी मुंबई महानगर पालिका मतदारसंघातून दोन जागांसाठी निवडणूक होत आहे. या जागांसाठी शिवसेनेकडून सुनील शिंदे आणि भाजपकडून राजहंस सिंह यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दोन्ही पक्षांकडून तिसरा उमेदवार दिलेला नाही. त्यामुळे या दोन उमेदवारांमध्ये चुरशीची लढत होणार की दोघांचाही विजय सोपा होणार याची चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या राजकीय गणिताचा घेतलेला हा आढावा.

शिवसेनेकडून शिंदे मैदानात

मुंबई महानगर पालिका स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून माजी आमदार सुनील शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. सुनील शिंदे हे शिवसेनेचे माजी आमदार आहेत. ते मुंबई महापालिकेचे माजी नगरसेवकही आहेत. शिवाय बेस्ट समितीचे ते अध्यक्षही होते. पुढील वर्षी मुंबई महापालिकेच्या निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांना उमेदवारी देण्यात आल्याने शिवसेनेला पालिका निवडणुकीत बळ मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भाजपची निवडणुकीची तयारी, राजहंस लढणार

भाजपने माजी आमदार राजहंस सिंह यांना विधानपरिषदेची उमेदवारी दिली आहे. राजहंस सिंह हे पूर्वी काँग्रेसमध्ये होते. ते नगरसेवक ते आमदार असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. राजहंस सिंह यांच्या उमेदवारीकडे राजकीय अंगानेही पाहिले जात आहे. पुढील वर्षी महापालिकेच्या निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर उत्तर भारतीय व्होटबँक आपल्याकडे वळवण्यासाठी भाजपने राजहंस सिंह यांना उमेदवारी दिल्याचं सांगितलं जात आहे.

आकडा काय सांगतो?

मुंबई महानगरपालिकेचे 227 निर्वाचित नगरसेवक आणि 5 नामनिर्देशित नगरसेवक असे 232 नगरसेवक आहेत. त्यापैकी तीन जागा रिक्त असल्याने विद्यमान नगरसेवकांची संख्या 229 एवढी आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत पहिल्या फेरीत जिंकण्यासाठी उमेदवाराला किमान 77 मतांचा कोटा आवश्यक आहे. शिवसेनेकडे सध्या 99 नगरसेवक मतदार आहेत. तर भाजपकडे 83 नगरसेवक मतदार आहेत. त्याशिवाय काँग्रेस, राष्ट्रवादी व अन्य मिळून 47 नगरसेवक मतदार आहेत. त्यामुळे राजहंस सिंह आणि सुनील शिंदे यांचा विजय सोपा मानला जात आहे. त्यात जर काँग्रेसने तिसरा उमेदवार दिल्यास ही निवडणूक चुरशीची ठरण्याची शक्यता आहे. तिसरा उमेदवार मैदानात उतरल्यास मतांची फोडाफोडी होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचं राजकीय सूत्रांचं म्हणणं आहे.

संबंधित बातम्या:

‘बैल कितीही आडमुठा असला तरी शेतकरी आपलं शेत नांगरतोच’, संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींना जोरदार टोला

महाराष्ट्रालाही दोन वर्षापूर्वी स्वातंत्र्य मिळालं, आम्ही करेक्ट कार्यक्रम करून दाखवला; संजय राऊतांची जोरदार टोलेबाजी

शिवसेनेचा महापालिकेत 100 कोटींचा ट्रेंचिंग घोटाळा, भाजप आमदार कोटेचा यांची चौकशीची मागणी

मोठी बातमी, मोदींकडून सैन्याला ग्रीन सिग्नल; म्हणाले 'वेळ अन् टार्गेट'
मोठी बातमी, मोदींकडून सैन्याला ग्रीन सिग्नल; म्हणाले 'वेळ अन् टार्गेट'.
पहलगामचा मास्टमाईंड कॅमेऱ्यात कैद, पाक सैन्याची कनेक्शन, काय होता डाव?
पहलगामचा मास्टमाईंड कॅमेऱ्यात कैद, पाक सैन्याची कनेक्शन, काय होता डाव?.
'आपल्याकडे वेळ कमी', मोदींचं सूचक विधान, पाकने घेतला धसका; काय होणार?
'आपल्याकडे वेळ कमी', मोदींचं सूचक विधान, पाकने घेतला धसका; काय होणार?.
पाकने युद्धाची वेळ सांगितली अन् मोदींची दिल्लीत फायनल बैठक, पुढे काय?
पाकने युद्धाची वेळ सांगितली अन् मोदींची दिल्लीत फायनल बैठक, पुढे काय?.
पाकिस्तानची झोप उडाली, भारत बदला घेण्यासाठी ही रणनिती वापरण्याची भिती
पाकिस्तानची झोप उडाली, भारत बदला घेण्यासाठी ही रणनिती वापरण्याची भिती.
'त्या' झिपलाइन ऑपरेटवरील संशय खरा? NIA च्या चौकशीतून मोठी माहिती समोर
'त्या' झिपलाइन ऑपरेटवरील संशय खरा? NIA च्या चौकशीतून मोठी माहिती समोर.
भारतानं पाकला पाडलं उघडं, संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याचा दाखला अन्...
भारतानं पाकला पाडलं उघडं, संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याचा दाखला अन्....
पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या संरक्षण दलात मोठे बदल, 1 मे पासून...
पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या संरक्षण दलात मोठे बदल, 1 मे पासून....
गुजरात ड्रग्स प्रकरणाचा पहलगाम हल्ल्याशी थेट संबंध - एनआयएने
गुजरात ड्रग्स प्रकरणाचा पहलगाम हल्ल्याशी थेट संबंध - एनआयएने.
इलेक्ट्रिक वाहनांच्या पॉलिसीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी
इलेक्ट्रिक वाहनांच्या पॉलिसीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी.