AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मतदान सक्तीचे होणार, सरकार कायदा करणार? केंद्रातील बड्या नेत्याचा दावा काय

Maharashatra Vidhansabha Election 2024 Compulsory Voting : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा शहरी भागात निराशाजनक चित्र दिसले. तर आदिवासी बहुल भागात मतदानाचा आकड्याने सर्वांचाच उत्साह वाढवला. गेल्या काही वर्षांपासून शहरी मतदार सातत्याने लोकशाहीच्या उत्सवापासून दूर जात आहे. त्यावर तोडगा काढणे गरजेचे झाले आहे.

मतदान सक्तीचे होणार, सरकार कायदा करणार? केंद्रातील बड्या नेत्याचा दावा काय
मतदान सक्तीचे करा
| Updated on: Nov 20, 2024 | 10:04 PM
Share

राज्यात उशीरा ग्रामीण भागात मतदान सुरू असल्याचे दिसून आले. ज्या भागात तांत्रिक अडचणी आल्या अथवा मोठ्या प्रमाणात नागरिकांनी मतदानासाठी गर्दी केली तिथे हे चित्र दिसून आले. तर मेट्रो आणि मोठ्या शहरात मात्र मतदारांनी पुन्हा घोर निराशा केली. आदिवासी बहुल जिल्ह्यातील मतदानाने लोकशाहीचा उत्सव उत्साहाने साजरा झाल्याचे दिसले. तर सुट्टी मिळून सुद्धा शहरी मतदारांनी निवडणुकीकडे पाठ फिरवल्याचे आकडेवारीवरून दिसून आले. त्यामुळे आता देशात मतदान सक्तीचे करण्याची गरज व्यक्त होत आहे. त्यात केंद्रातील या बड्या नेत्याने सुद्धा लोकसभेत यासाठी आवाज उठवण्याचे जाहीर केले आहे. सक्तीच्या मतदानासाठी त्यांनी कायदा करण्याची आवश्यकता वर्तवली आहे.

कमी मतदानाने चिंता

राज्यात शहरी आणि काही निम शहरात कमी मतदानाने निवडणूक आयोगाच्या उपायांवर पाणी फेरले गेले. यावेळी निवडणूक आयोगाने शहरांमधील काही सोसायट्यांमध्ये सुद्धा निवडणुकीची व्यवस्था केली होती. मतदानाचा टक्का वाढण्यासाठी सेल्फी पॉईंटपासून ते विविध रंगाचे बुथ, मतदान करण्याचे आवाहन केले होते. पण तरीही शहरी भागात मतदानाचा टक्का कमी असल्याचे दिसून आले. उलट ग्रामीण आणि दुर्गम भागात मतदानाचा टक्का अधिक असल्याचे दिसून आले.

सक्तीचा कायदा आणा

कमी मतदानावर अनेक नेत्यांनी उपाय योजना करण्याचा मार्ग सुचवला आहे. तर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी हे चित्र बदलण्यासाठी सक्तीचे मतदान करण्याचा कायदा आणण्याचे मत व्यक्त केले आहे. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार असल्याची माहिती त्यांनी दिली. रामदास आठवले यांनी पत्नीसह वांद्रे पूर्व मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. सुट्टी असताना तरी मतदारांनी मतदानासाठी बाहेर पडणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

मतदान वाढीसाठी सूचवले उपाय

मतदानाचा टक्का वाढीसाठी आठवले यांनी सक्तीचा मतदान कायदा करण्याची वकिली केली. मतदान 90 टक्क्यांहून अधिक व्हावे यासाठी पावलं टाकणं गरजेचे असल्याचे ते म्हणाले. मतदानाची कमी टक्केवारी ही लोकशाहीसाठी शोकांतिका असल्याचे ते म्हणाले. त्यांनी यावेळी निवडणूक आयोगाला काही उपाय पण सुचवले. मतदानाचा टक्का वाढीसाठी एका बुथवर 500 मतदारांची व्यवस्था करण्याची मागणी त्यांनी केली. याविषयी ते निवडणूक आयोगाला पत्र लिहिणार आहेत.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.