काऊंटडाऊन सुरु, काही तासांत देशात मान्सूनचा शंखनाद, या राज्यांमध्ये होणार आबादानी

Mansoon Alert : यंदा संपूर्ण देशाला मान्सूनची प्रतिक्षा लागलेली आहे. यंदा उन्हाळ्याच्या असह्य झळा देशाने सोसल्या. काही राज्यात पारा 50 अंशांच्या घरात पोहचला. आता मान्सूनने सांगावा धाडला आहे. या राज्यात पाऊस पहिली हजेरी लावणार आहे.

काऊंटडाऊन सुरु, काही तासांत देशात मान्सूनचा शंखनाद, या राज्यांमध्ये होणार आबादानी
मान्सूनचा मुक्काम वाढणार
Follow us
| Updated on: May 30, 2024 | 10:09 AM

India Monsoon : यंदा उन्हाळ्याने भल्याभल्यांचा घामाटा काढला. उन्हाचा कहर झाला. उष्ण वाऱ्याने कुलरला पण यंदा बाद केले. विदर्भ, खानदेश, मराठवाड्यात पाऱ्याने रेकॉर्ड मोडीत काढले. मुंबईसह आजुबाजूच्या परिसरात उकाड्याने नागरिक हैराण झाले. सर्वच जण मान्सूनची आतुरतेने वाट पाहत होते. आता मान्सूनने सांगावा धाडला आहे. अवघ्या काही तासांतच या राज्यांमध्ये पावसाची हजेरी लागणार आहे. दक्षिण पश्चिम मान्सूनच्या पूर्व अंदाजानुसार, गुरुवारी, 30 मे 2024 रोजी मान्सून केरळच्या किनारी आणि पूर्वोत्तर भागात दाखल होईल. त्यामुळे अनेक भागात पाऊस पडेल.

24 तासांत पावसाचा शंखनाद

भारतीय हवामान विभागाने (IMD) बुधवारी 24 तासांत मान्सूनचे चित्र कसे असेल, याचा अंदाज वर्तविला. पुढील 24 तासांत मान्सून केरळच्या दक्षिण-पश्चिम भागात दाखल होईल. त्यासाठीचे अनुकूल वातारवरण दिसत असल्याचे विभागाने जाहीर केले आहे. यापूर्वी आयएमडीने 15 मे रोजी, केरळात मान्सून 31 मेपर्यंत आनंदवार्ता पेरणार असल्याचा दावा केला होता.

हे सुद्धा वाचा

मान्सूनचा सांगावा लवकर कसा?

हवामान तज्ज्ञांनुसार, रविवारी पश्चिम बंगाल आणि बांगलादेशात दाखल झालेल्या रेमल चक्रीवादळाचा हा परिणाम आहे. या वादळाने मान्सूनचा प्रवाह बंगालच्या उपसागराकडे खेचून घेतला. त्यामुळे पूर्वोत्तर राज्यात मान्सून लवकर दाखल होत आहे. हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, केरळमध्ये गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस पडला. परिणामी मे महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली.

पूर्वोत्तर राज्यात आनंदवार्ता कधी?

हवामानातील या बदलामुळे तर चक्रीवादळामुळे पूर्वोत्तर राज्यात लवकरच आबादाणी होणार आहे. पूर्वोत्तरमधील अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, नागालँड, मेघालय, मिजोरम, मणिपूर आणि आसाम या राज्यात पाऊस 5 जून रोजी हजेरी लावण्याची शक्यता आहे.

या भागात सुद्धा साखरपेरणी

याच कालावधीत दक्षिण अरब सागराचा काही भाग, मालदीव, कोमोरिन, लक्षद्वीपचा काही भाग, दक्षिण-पश्चिम आणि मध्य बंगालचा उपसागर, उत्तर-पूर्वी बंगालचा उपसागर, पूर्वोत्तर राज्यातील काही भाग यामध्ये दक्षिण-पश्चिम मान्सून सक्रिय होण्याची चिन्हे दिसत असल्याचे आयएमडीने स्पष्ट केले आहे.

हवामान खाते केव्हा करते मान्सूनची घोषणा ?

केरळमधील 14 केंद्र आणि आजुबाजूच्या परिसरात सलग दोन दिवसांत 2.5 मिमी अथवा त्यापेक्षा अधिक पाऊस पडतो. आऊटगोईंग लाँगवेव रेडिएशन कमी होते. हवा दक्षिण-पश्चिम अशी वाहते तेव्हा हवामानाचा अंदाज वर्तविण्यात येतो. साधारणपणे आयएमडी 10 मे नंतर कोणत्याही वेळी केरळमध्ये मान्सूनची घोषणा या घडामोडींच्या आधारे करते.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.