AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धर्मसंसदेतील वक्तव्य हिंदुत्वाला अभिप्रेत नसणारी, मोहन भागवत यांचं वक्तव्य, सावरकरांचांही दिला दाखला

राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे (RSS) प्रमुख मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी धर्म संसदेच्या बॅनर खाली आयोजित होणाऱ्या कार्यक्रमातील वक्तव्य आणि हिंदुत्वाशी संबंधित गोष्टींबाबत असहमती दर्शवली आहे.

धर्मसंसदेतील वक्तव्य हिंदुत्वाला अभिप्रेत नसणारी, मोहन भागवत यांचं वक्तव्य, सावरकरांचांही दिला दाखला
mohan bhagwat
Follow us
| Updated on: Feb 07, 2022 | 11:07 AM

मुंबई :राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे (RSS) प्रमुख मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी धर्म संसदेच्या बॅनर खाली आयोजित होणाऱ्या कार्यक्रमातील वक्तव्य आणि हिंदुत्वाशी संबंधित गोष्टींबाबत असहमती दर्शवली आहे. भागवत यांनी धर्मसंसदेत बोलली गेलेली भाषा ही हिंदुत्वाच्या भाषेला अनुरुप नव्हती, असं म्हटलंय. ज्या गोष्टी रागाच्या भरात केल्या जातात त्यात हिंदुत्वाला अनसुरुन नसतात, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. मुंबईतील (Mumbai) एका कार्यक्रमात मोहन भागवत यांनी आरएसस आणि हिंदुत्वावर विश्वास असणारी माणसं अशा गोष्टी बोलत नाहीत, असं म्हटलंय. डिसेंबर महिन्यात हरिद्वारमध्ये आयोजित धर्मसंसदेत मुस्लीम धर्मीय व्यक्तींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आलं होतं. तर, रायपूरमध्ये आयोजित धर्मसंसदेत महात्मा गांधी यांच्यांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केली गेली होती.

सावरकरांनी हिंदुंना संघटित करण्याविषयी सांगितलं

मोहन भागवत यांनी वीर सावरकर यांनी हिंदू समुदायाला संघटित आणि एकत्रित करण्यासंदर्भात भाष्य केलं होतं. मात्र, त्यांनी हे वाक्य भगवतगीतेच्या संदर्भात सांगितलं होतं. ते वाक्य कुणाला संपवणं किंवा नुकसान पोहोचवणं नव्हतं, असं भागवत म्हणाले. भारताची वाटचाल हिंदू राष्ट्र होण्याकडे सुरु आहे का असं विचारलं असता भागवत यांनी आपल्या संविधानाची प्रकृती हिंदुत्व सांगणारी आहे, असं म्हटलंय. देशाच्या एकतेची आणि अखंडतेची भावना महत्वाची आहे. विविधतेचा अर्थ विघटन असा होत नसल्याचं ते म्हणाले. संघाचं काम लोकांमध्ये फुट पाडणं हे नसून त्यांच्यातील मतभेद दूर करणं हा असल्याचं मोहन भागवत म्हणाले.

वीर सावरकरांनी हिंदू समुदाय एकत्रित आणि संघटित झाल्यास तो भगवतगीतेबद्दल बोलू लागेल. तो कुणाला संपवणं किंवा कुणाचा नुकसान करणं याविषयी बोलणार नाही असं मोहन भागवत यांनी सांगितलं.

धर्मसंसदेत वादग्रस्त वक्तव्य

डिसेंबर महिन्यात हरिद्वारमध्ये आयोजित धर्मसंसदेत मुस्लीम धर्मीय व्यक्तींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आलं होतं. तर, रायपूरमध्ये आयोजित धर्मसंसदेत महात्मा गांधी यांच्यांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केली गेली होती. महात्मा गांधी यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळं कालीचरण महाराज याला अटक करण्यात आली होती.

इतर बातम्या:

Hrishikesh Kanitkar: अंडर 19 वर्ल्डकप विजेत्या संघाचे पुणेकर कोच ऋषीकेश कानिटकरांबद्दल जाणून घ्या…

कायद्याचे तीन तेरा, गजानन महाराजांच्या शेगावात थेट पोलीस ठाण्यावरच हल्ला, नेमकं काय घडलं?

पंतप्रधान मोदींची हवाई दल प्रमुखांसोबत बैठक; काय झाली चर्चा?
पंतप्रधान मोदींची हवाई दल प्रमुखांसोबत बैठक; काय झाली चर्चा?.
कोस्टल रोडवर भीषण अपघात, चार ते पाच वाहनं एकमेकांना धडकली
कोस्टल रोडवर भीषण अपघात, चार ते पाच वाहनं एकमेकांना धडकली.
बारावीचा निकाल उद्या, राज्य शिक्षण मंडळ निकाल जाहीर करणार
बारावीचा निकाल उद्या, राज्य शिक्षण मंडळ निकाल जाहीर करणार.
संजय राऊत आणि शरद पवारांमध्ये रंगल्या गप्पा
संजय राऊत आणि शरद पवारांमध्ये रंगल्या गप्पा.
पेट्रोल पंपावर डिजीटल पेमेंट बंद, ग्राहक चिंतेत
पेट्रोल पंपावर डिजीटल पेमेंट बंद, ग्राहक चिंतेत.
हवा, पाणी, जमिनीवरून पाकिस्तानला घेरणार; भारत करणार क्षेपणास्त्र चाचणी
हवा, पाणी, जमिनीवरून पाकिस्तानला घेरणार; भारत करणार क्षेपणास्त्र चाचणी.
श्रीगंगागनगरमध्ये बॉर्डवर बीएसएफकडून पाकिस्तानी जवानाला अटक
श्रीगंगागनगरमध्ये बॉर्डवर बीएसएफकडून पाकिस्तानी जवानाला अटक.
लाडक्या बहिणींना 500 रुपये देणं ही फसवणूक; राऊतांची महायुतीवर टीका
लाडक्या बहिणींना 500 रुपये देणं ही फसवणूक; राऊतांची महायुतीवर टीका.
पीएम मुद्रा योजनेनं पालटलं कोट्यवधी भारतीयांचं नशीब; कसा करायचा अर्ज?
पीएम मुद्रा योजनेनं पालटलं कोट्यवधी भारतीयांचं नशीब; कसा करायचा अर्ज?.
शेतकरी ओळखपत्र नसेल तर मिळणार नाहीत लाभ; अशी करा नोंदणी..
शेतकरी ओळखपत्र नसेल तर मिळणार नाहीत लाभ; अशी करा नोंदणी...