Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मान्सूनचं मुंबईत 6 जूनला आगमन! राज्यातील 9 जिल्ह्यांना यलो अलर्ट, पुढचे 4 दिवस पावसाचे

Maharashtra Monsoon Update weather News : राज्यातील 9 जिल्हयांचा यलो अलर्ट जारी करण्यात आलाय. येत्या चार ते पाच दिवसात मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे

मान्सूनचं मुंबईत 6 जूनला आगमन! राज्यातील 9 जिल्ह्यांना यलो अलर्ट, पुढचे 4 दिवस पावसाचे
पावसाची खबरबातImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: May 18, 2022 | 6:55 AM

मुंबई : घामाघूम झालेल्या मुंबईकरांना (Mumbai Rain Update)पावसाचे वेध लागले आहे. मुंबईत वातावरण तापल्यानं सगळ्यांना उकाडा असह्य झालाय. अशातच आता मुंबई मान्सूनचा (Monsoon Rain in Mumbai) पाऊस कधी बरसणार, याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. येत्या 6 जून रोजी मुंबई मान्सूनच्या पावसाचं आगमन होण्याची शक्यता आहे. हवामान विभागानं याबाबतचा अंदाज वर्तवला आहे. अंदमानमध्ये दाखल झालेल्या मान्सूनचा प्रवास असाच सुरु राहिला तर 6 जूनपासून मुंबईकरांना मान्सूनचा दिलासा मिळेल, अशी शक्यताय. तर येत्या चार दिवसात राज्यात विजांच्या कडकडाटसह पाऊस होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर उत्तर आणि मध्य महाराष्ट्रासह (Maharashtra Weather Update News) विदर्भात मात्र उष्णतेच्या लाटेचा अंदाज आहे.

विदर्भाला दिलासा नाहीच!

येत्या चार ते पाच दिवसांत दक्षिण महाराष्ट्र, दक्षिण कोकण, मराठवाड्यात पाऊस होण्याची शक्यता आहे. तर उत्तर आणि मध्य महाराष्ट्रात तापमान कमी होण्याची कोणतीही शक्यता नाही. तसंच विदर्भातही उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आलाय.

हे सुद्धा वाचा

पाहा व्हिडीओ : दहा मोठ्या बातम्या

27 तारखेला केरळमध्ये

मान्सूनचं अंदमानात आगमन 48 तासांपूर्वीच झालंय. त्यानंतर आता मान्सून 27 मे रोजी केरळमध्ये दाखल होईल, असं सांगितलं जातंय. मान्सूनचा पुढचा प्रवास असाच सुरु राहिला, तर मुंबईतही मान्सूनचा प्रवेश 6 जून रोजी होईल, अशा विश्वास व्यक्त करण्यात आलाय.

9 जिल्ह्यांना यलो अलर्ट

राज्यातील 9 जिल्हयांचा यलो अलर्ट जारी करण्यात आलाय. येत्या चार ते पाच दिवसात मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. तर पुढचे दोन दिवस केरळ किनारपट्टीच मुसळधार पावसाचा अंदाज आहे. कोल्हापूर, सातारा सांगली, तसंच परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूरला पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.

उकाड्याने हैराण

दरम्यान, वाढलेल्या तापमानानं विदर्भातील जनता हैराण झाली आहे. विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांत पारा 40 च्या वर आहे. दरम्यान, उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता असल्यानं नागरिकांनाही काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय.

बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप.
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य.
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत.
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य.
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.