AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईच्या समुद्रात पुन्हा बोट अपघात, मोठ्या जहाजाची बोटीला धडक, मध्यरात्री खोल समुद्रात बचावाचा थरार

काल रात्री १२.०० ते १२.३० च्या सुमारास मढ कोळीवाड्यातील तिसाई बोटीचा दुर्देवी अपघात झाला. या बोटीला एका मालवाहू जहाजाने धडक दिली. त्यामुळे ही बोट उलटली.

मुंबईच्या समुद्रात पुन्हा बोट अपघात, मोठ्या जहाजाची बोटीला धडक, मध्यरात्री खोल समुद्रात बचावाचा थरार
mumbai boat accident
| Updated on: Dec 29, 2024 | 3:44 PM
Share

Mumbai Boat Accident : मुंबईच्या गेट वे ऑफ इंडियाकडून एलिफंटाकडे जाणाऱ्या एका प्रवासी बोटीचा भीषण अपघात झाला होता. भारतीय नौदलच्या वेगवान स्पीड बोटीने जोरदार धडक दिल्याने ही बोट उलटली. या दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू झाला. त्यात नौदलाच्या तीन कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. या दुर्घटनेतून अद्याप मुंबईत सावरलेली नाही. त्यातच आता मुंबईच्या मढ समुद्रकिनारी एक मासेमारी करणारी बोट बुडाल्याची घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील मालाड परिसरात असलेली मढ कोळीवाड्यात मासेमारी करण्यासाठी गेलेली बोट बुडाल्याची दुर्घटना घडली आहे. काल रात्री १२.०० ते १२.३० च्या सुमारास मढ कोळीवाड्यातील तिसाई बोटीचा दुर्देवी अपघात झाला. या बोटीला एका मालवाहू जहाजाने धडक दिली. त्यामुळे ही बोट उलटली. सुदैवाने त्यावेळी आजूबाजूला काही बोटी असल्याने मासेमारी करण्यासाठी गेलेल्या कोळी लोकांचा जीव वाचला.

मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या नौकेला धडक 

मालाडमधील मढ परिसरातील हेमदीप हरिश्चंद्र टिपरी हे नेहमीप्रमाणे मढ कोळीवाडा या ठिकाणी मासेमारी करण्यासाठी गेले होते. त्याचदरम्यान चायनाच्या एका मालवाहू जहाजाने त्यांच्या मासेमारी करणाऱ्या नौकेला धडक दिली. त्यामुळे ही नौका बुडाली. या नौकेवर असणारे तांडेल/खलाशी यांना बाजूला असलेल्या सवटी ग्रुपच्या नौकांनी सुखरुप बाहेर काढले. तसेच याच ग्रुपच्या आठ बोटीने नौका बांधून आणली. आज ही नौका मढ, तलपशा बंदरात पोहोचण्याचा अंदाज आहे. यावेळी नेव्ही/कोस्ट गार्डचे जहाज बरोबर आहे. तसेच दोन अधिकारी रात्रीपासून नौकांवर मदत करत आहेत.

गेट वे ऑफ इंडियाला बोटीला अपघात, १३ जणांचा मृत्यू

दरम्यान मुंबईत बुधवारी (18 डिसेंबर) दुपारी ४ च्या सुमारास बोटीला अपघात घडला. मुंबईतून एलिफंटाच्या दिशेने जाणाऱ्या नीलकमल या प्रवाशी बोटीला भारतीय नौदल (Indian Navy) च्या वेगवान स्पीड बोटीने जोरदार धडक दिली. या स्पीड बोटीने आधी एक मोठा राऊंड मारला. यानंतर ती बोट नीलकमल या बोटीला समोरून धडक दिली.

ही धडक इतर जबरदस्त होती की आधी या बोटीला मोठे भगदाड पडले आणि त्यानंतर काही क्षणात ही बोट बुडाली. या अपघातावेळी बोटीमध्ये 100 पेक्षा अधिक प्रवासी होते. नेव्हीच्या स्पीड बोटीचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातात आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ९८ जणांना वाचवण्यात यश आले आहे.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.