AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Boat Capsized: मुंबई बोट अपघातात १३ जणांचा मृत्यू, एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश

Mumbai Boat Capsized: मुंबईतील गेट ऑफ इंडियावरुन नीलकमल ही बोट एलिफंटाकडे बुधवारी संध्याकाळी निघाली होती. या बोटीची क्षमत ८० प्रवाश्यांची आहे. परंतु त्या बोटीत क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशी होते. एकूण ११० प्रवाशी बोटीत असल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला आहे.

Mumbai Boat Capsized: मुंबई बोट अपघातात १३ जणांचा मृत्यू, एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश
Mumbai Boat Capsized
Follow us
| Updated on: Dec 18, 2024 | 11:29 PM

Mumbai Boat Capsized: मुंबईतील बोट अपघात प्रकरणात नवीन माहिती समोर आली आहे. बोटचालकाचा दावा खोटा ठरवणारी माहिती समोर आली आहे. नीलकमल ही बोट बुधवारी गेट ऑफ इंडियाजवळ समुद्रात बुडाली. या बोटीला नौदलाच्या बोटीने धडक दिल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु नौदलाकडून त्याचा इन्कार करण्यात आला. दरम्यान नीलकमल बोटीत क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी होते. बोटीची क्षमता ८० असताना त्यातून ११० जण प्रवास करत होते. त्यामुळे क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशी वाहतूक करणाऱ्या बोट मालकावर गुन्हा दाखल होणार आहे. दरम्यान या प्रकरणी १३ जणांचा मृत्यू आहे. त्यातील तीन जण नौदलाचे आहे तर दहा नागरिक आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

दरम्यान, या बोट अपघातात एकच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. नाशिक येथील अहिरे कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. त्यात आई, वडील आणि पाच वर्षांचा मुलाचा समावेश आहे. निद्धेश अहिरे असे त्या मुलाचे नाव आहे. हे सर्व जण नाशिकवरून आले होते. परंतु त्यांचे हे शेवटचे पर्यटन ठरले.

नौदल आणि मुंबई पोलीस चौकशी करणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, अपघातात १०१ लोकांना वाचवण्यात आले आहे. संध्याकाळी ७.३० पर्यंतची ही माहिती आहे. अद्याप पूर्ण माहिती मिळाली नाही. या घटनेची नौदल आणि मुंबई पोलीस चौकशी करणार आहे.

हे सुद्धा वाचा

मुंबईतील गेट ऑफ इंडियावरुन नीलकमल ही बोट एलिफंटाकडे बुधवारी संध्याकाळी निघाली होती. या बोटीची क्षमत ८० प्रवाश्यांची आहे. परंतु त्या बोटीत क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशी होते. एकूण ११० प्रवाशी बोटीत असल्याची माहिती समोर आली आहे. आता या प्रकरणी बोट मालकावर गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती देण्यात आली.

मुंबई मनपाकडून माहिती

बोटीवर तब्बल ११० जण होते अशी माहिती मुंबई महानगरपालिकेकडून (बीएमसी) अधिकृतपणे देण्यात आली. विविध रुग्णालयामध्ये दाखल असलेले प्रवाशी ११० होते. त्यामुळे क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशी बोटीत असल्याचे सिद्ध झाले. दरम्यान, नीलकमल बोटीला धडकणाऱ्या नौदलाच्या स्पीड बोटीत तांत्रिक बिघाड झाल्याचा संशय नौदलाकडून व्यक्त करण्यात आला. यासंदर्भात अधिकृत माहिती नौदलाकडून देण्यात येणार आहे.

कोणत्या रुग्णालयात किती रुग्ण

  • जेएनपीटी हॉस्पिटल – ५६
  • नेव्ही डॉकयार्ड हॉस्पिटल – ३२
  • अश्विनी हॉस्पिटल – १
  • सेंट जॉर्ज हॉस्पिटल – ९
  • करंजे हॉस्पिटल- १२

गेट वे ऑफ इंडिया ते एलिफंटा बोटीला झालेल्या अपघातातील जखमींना उपचारासाठी नवी मुंबईतील जेएनपीए रुण्यालयात दाखल केले आहे. त्यातील एका सहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे.

जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव.
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.