Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

औरंगाबाद की संभाजीनगर? : शिवसेना बाजूने, काँग्रेस विरोधात, आता राष्ट्रवादीची भूमिका जाहीर

औरंगाबाद शहराच्या नामकरणाबाबत आतापर्यंत फक्त शिवसेना आणि काँग्रेसची भूमिका समोर आली होती. मात्र, आता राष्ट्रवादीचीदेखील भूमिका समोर आली आहे (Nawab Malik on Aurangabad rename).

औरंगाबाद की संभाजीनगर? : शिवसेना बाजूने, काँग्रेस विरोधात, आता राष्ट्रवादीची भूमिका जाहीर
nawab malik
Follow us
| Updated on: Jan 04, 2021 | 5:42 PM

मुंबई : औरंगाबाद महापालिका निवडणुकीचं (Aurangabad Municipal Election 2021) बिगूल वाजण्याआधीच शहरातील राजकारण प्रचंड तापायला लागलं आहे. औरंगाबाद शहराचं संभाजीनगर असं नामकरण करण्यात यावं, अशी भूमिका शिवसेनेची आहे. मात्र, या नामकरणाला सत्ताधारी पक्षातील काँग्रेसचा विरोध आहे. औरंगाबाद शहरातील शिवसेनेचे दिग्गज नेते चंद्रकांत खैरे यांनी नामकरणावरुन आक्रमक पवित्रा घेतला आहे. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचा नामकरणाला विरोध आहे. त्यामुळे औरंगाबाद शहराच्या नामकरणावर मंत्रिमंडळातील नेत्यांचं एकमत नसल्याचं स्पष्ट झालं आहे. नामकरणाबाबत आतापर्यंत फक्त शिवसेना आणि काँग्रेसची भूमिका समोर आली होती. मात्र, आता राष्ट्रवादीचीदेखील भूमिका समोर आली आहे (Nawab Malik on Aurangabad rename).

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला दिलेल्या प्रतिक्रियेत याबाबत भाष्य केलं. “औरंगाबाद शहराचं नामकरण हा महाविकास आघाडी सरकारच्या अजेंडावरील विषय नाही. त्यामुळे प्रश्नच येत नाही”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली (Nawab Malik on Aurangabad rename).

नामकरणावर काँग्रेसची नेमकी भूमिका काय?

बाळासाहेब थोरात यांनी दोन दिवसांपूर्वी औरंगाबाद शहराच्या नामकरणावर प्रतिक्रिया दिली होती. “नाव बदल हा आमचा कार्यक्रम नाही. नाव बदल आणि अशा प्रकारच्या गोष्टींना आमचा विरोध राहील”, असं थोरात म्हणाले होते.

“राज्यातील महाविकास आघाडी सरकार किमान समान कार्यक्रमावर आलेले आहे. औरंगाबाद विभागाच्या विभागीय आयुक्तांनी अहवाल दिलेला असला तरी काँग्रेसची ही भूमिका नाही. विकास करण्याला आमच्याकडून प्राधान्य राहील. महाविकास आघाडी सरकार किमान समान कार्यक्रमावर स्थापन झालं आहे. औंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याचा विषय किमान समान कार्यक्रमात नाही. नाव बदलण्याचा विषयावर आमचा विश्वास नाही”, असंही बाळासाहेब थोरात म्हणाले.

“औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठी मी इकडे आलोय. शेतकऱ्यांना आम्ही मोठी मदत केली, चक्रीवादळात आणि अतिवृष्टीत आम्ही मोठी मदत केली. आम्ही स्वबळाची तयारी करत आहोत. पण, भाजपला रोखण्यासाठी काही तडजोड करावी लागली तर विचार केला जाईल”, असं बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केलं होतं.

ईडीचा वापर करुन दबाव आणण्याचा प्रयत्न यशस्वी होणार नाही : नवाब मलिक

दरम्यान, नवाब मलिक यांनी यावेळी शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे, शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना ईडीने नोटीस देण्यावरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. केंद्र सरकारचा ईडीचा वापर करुन दबाव आणण्याचा प्रयत्न यशस्वी होणार नाही, अशी रोखठोक भूमिका त्यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला दिलेल्या प्रतिक्रियेत मांडली आहे.

“वर्षा राऊत किंवा इतर राजकीय व्यक्ती असतील त्यांना समन्स आले असतील तर चौकशीलसा सामोरं जावं लागेल. समोर जाणं म्हणजे काही चूक केली असं होत नाही. ते त्यांची भूमिका स्पष्ट करतील”, असं मलिक म्हणाले.

“ईडीचा वापर केंद्र सरकार करते हे आता लपून राहिलेलं नाही. ही पद्धत योग्य नाही. केंद्र सरकार अशा यंत्रणांचा वापर करून दबाव आणण्याचा प्रयत्न करत असेल तर तो यशस्वी होणार नाही”, असं नवाब मलिक म्हणाले.

संबंधित बातमी :

नाव बदल हा काँग्रेसचा कार्यक्रम नाही, अशा गोष्टींना विरोध राहील : बाळासाहेब थोरात

आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती.
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना.
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला.
माझी सही सोप्पी आहे, कोणीही करतं; आशिष विशाळ प्रकरणात धसांच स्पष्टीकरण
माझी सही सोप्पी आहे, कोणीही करतं; आशिष विशाळ प्रकरणात धसांच स्पष्टीकरण.
निवडणुकीत मतं विकत घेण्यासाठी 1500चं दुकान लावलं; राऊतां टोला
निवडणुकीत मतं विकत घेण्यासाठी 1500चं दुकान लावलं; राऊतां टोला.
काय विचारावं याचं तारतम्य तर ठेवा; शरद पवार चिडले
काय विचारावं याचं तारतम्य तर ठेवा; शरद पवार चिडले.
जयंत पाटील मुरलेले नेते आहेत, त्यांचा अंदाज लावणं कठीण - एकनाथ शिंदे
जयंत पाटील मुरलेले नेते आहेत, त्यांचा अंदाज लावणं कठीण - एकनाथ शिंदे.
'राज ठाकरे भांग पिऊन बोलतात', माजी मंत्र्यांची टीका, मनसेकडूनही पलटवार
'राज ठाकरे भांग पिऊन बोलतात', माजी मंत्र्यांची टीका, मनसेकडूनही पलटवार.
संतोष देशमुखांसाठी गाव एकवटलं, मस्साजोगच्या ग्रामस्थांचा मोठा निर्णय
संतोष देशमुखांसाठी गाव एकवटलं, मस्साजोगच्या ग्रामस्थांचा मोठा निर्णय.
जजसोबत सक्तीच्या रजेवरच्या पोलिसांची होळी? दमानियांकडून थेट फोटो ट्विट
जजसोबत सक्तीच्या रजेवरच्या पोलिसांची होळी? दमानियांकडून थेट फोटो ट्विट.