Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम्ही गृहमंत्री होणार का?; जयंत पाटील म्हणतात, या बाजारातल्या गप्पा!

सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना अटक झाल्यापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये गेल्या तीन दिवसांपासून जोर बैठका सुरू आहेत. (no discussion to change maharashtra home minister in meeting, says jayant patil)

तुम्ही गृहमंत्री होणार का?; जयंत पाटील म्हणतात, या बाजारातल्या गप्पा!
jayant patil
Follow us
| Updated on: Mar 17, 2021 | 1:29 PM

मुंबई: सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना अटक झाल्यापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये गेल्या तीन दिवसांपासून जोर बैठका सुरू आहेत. अनिल देशमुख यांना हटवून जयंत पाटील यांच्याकडे गृहखातं देण्यात येणार असल्याच्या जोरदार चर्चाही सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना विचारले असता, या बाजारातल्या गप्पा असल्याचं सांगत त्यांनी या विषयावर बोलणं टाळलं. (no discussion to change maharashtra home minister in meeting, says jayant patil)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आज समन्वय समितीची बैठक झाली. या बैठकीनंतर जयंत पाटील यांना मीडियाशी संवाद साधला. यावेळी तुम्ही गृहमंत्री होणार असल्याच्या चर्चा असल्याचं त्यांना विचारण्यात आलं. तेव्हा, या बाजारातल्या गप्पा आहेत. अशा चर्चांवर विश्वास ठेवू नका, असं जयंत पाटील यांनी सांगितलं. तसेच आमदारांच्या मतदारसंघातील कामं आणि आमदार निधींबाबत आजच्या बैठकीत चर्चा झाली. इतर विषयांवर चर्चा झाली नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

मला माहीत नाही

गेल्या तीन दिवसांपासून गृहमंत्री अनिल देशमुख आणि पोलीस अधिकारी मुख्यमंत्र्यांना भेटत आहेत. या बैठकीत मुंबईच्या पोलीस आयुक्तांना बदलण्यात येणार असल्याची चर्चा झाल्याचं समजतं. त्याबद्दल काय सांगाल, असं पाटील यांना विचारण्यात आलं. तेव्हा, या बैठकांना मी उपस्थित नव्हतो. त्यामुळे मला माहीत नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

मतभेद नाहीत

शिवसेनेची गृहखात्यात ढवळाढवळ वाढल्याबाबतही त्यांना विचारण्यात आलं. अनिल परब हे गृहखात्यात ढवळाढवळ करत असल्याने शरद पवार नाराज आहेत अशी चर्चा आहे, असं त्यांना विचारण्यात आलं. तेव्हा अशी बातमी माझ्यापर्यंत आली नाही. गृहमंत्र्यांनी अशी तक्रार केलेली आहे, याची मला माहिती नाही, असं पाटील म्हणाले. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री एकत्रित काम करत आहेत. काहीच मतभेद नाहीत. प्रशासकीय बदल्यांचे निर्णय दोन्ही नेते घेत असतात. प्रशासकीय कामाबाबत नाराजी असण्याचं कारण नाही, असंही त्यांनी सांगितलं.

जावडेकरांना टोला

यावेळी कोरोना लसीकरणावरून केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलेल्या टीकेलाही त्यांनी प्रत्युत्तर दिलं. कोरोना लसीकरणाचा आकडा माझ्याकडे नाही. आरोग्य मंत्रीच त्याबाबत अधिक माहिती देऊ शकतील. परंतु, भारतीने तयार केलेली ही लस आहे. असं असतानाही ज्यांनी भाजपला निवडून दिलं त्या भारतीयांचं लसीकरण करण्यात आपण स्लो आहोत. परदेशात आपण लस पाठवतो. पाकिस्तानसह परदेशात लस पोहोचवली जात आहे. पाकिस्तानला लस देत असल्याबाबत केंद्र सरकारच्या दानशूरपणाचं कौतुकच आहे. भारतीय लोक लसीकरणात मागे राहिले तरी चालेल, अशीच केंद्राची मानसिकता दिसत आहे, असं सांगतानाच भारतीयांची काळजी घेण्याऐवजी पाकिस्तानी जनतेची काळजी का? याचं आधी उत्तर जावडेकरांनी दिलं पाहिजे, असंही ते म्हणाले. (no discussion to change maharashtra home minister in meeting, says jayant patil)

संबंधित बातम्या:

54 लाख लस दिल्या, मग आतापर्यंत 23 लाख लसच का टोचल्या?; लसीकरणावरून जावडेकरांचा महाराष्ट्र सरकारला ‘डोस’

Video: दिलीप गांधी गेले अन् लोकांना अचानक ‘ते’ भाषण आठवले; काय कंठ दाटला होता गांधींचा, पाहा व्हिडीओ

अनिल परबांचा गृहखात्यात हस्तक्षेप, देशमुखांची थेट तक्रार, शरद पवारांकडून उघड नाराजी

(no discussion to change maharashtra home minister in meeting, says jayant patil)

वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.
साडीवाली दीदी..शिंदेंनंतर भाजपच्या बड्या महिला नेत्यावर कामराचा निशाणा
साडीवाली दीदी..शिंदेंनंतर भाजपच्या बड्या महिला नेत्यावर कामराचा निशाणा.
पत्रकार परिषदेत उज्वल निकम यांचा मोठा दावा
पत्रकार परिषदेत उज्वल निकम यांचा मोठा दावा.
संभाजीराजे 'वाघ्या'बाबत म्हणाले, 'महाराजांना अग्नि दिला त्यावेळी...'
संभाजीराजे 'वाघ्या'बाबत म्हणाले, 'महाराजांना अग्नि दिला त्यावेळी...'.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला.
'तुम्ही मुसलमांनाना का डॉमिनेट करता?,'शिरसाट आणि आव्हाडांमध्ये खडाजंगी
'तुम्ही मुसलमांनाना का डॉमिनेट करता?,'शिरसाट आणि आव्हाडांमध्ये खडाजंगी.
संतोष देशमुख हत्या प्रकरण; काय आहे सुनावणीचे अपडेट्स? इनसाईड स्टोरी
संतोष देशमुख हत्या प्रकरण; काय आहे सुनावणीचे अपडेट्स? इनसाईड स्टोरी.
पवारच आता दादांसोबत जातील... बच्चू कडूंच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण
पवारच आता दादांसोबत जातील... बच्चू कडूंच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण.