AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कसा आहे नेरुळ – खारकोपर रेल्वेमार्ग?

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या नेरुळ – उरण रेल्वेमार्गावरील नेरुळ – खारकोपर या पहिल्या टप्प्यातील रेल्वे मार्गाचे  लोकार्पण केलं.  रेल्वेमंत्री पियुष गोयल हे यावेळी उपस्थित होते. खारकोपर रेल्वे स्टेशन इथे हा कार्यक्रम पार पडला. सिडकोने या मार्गावरील रेल्वे स्थानक बांधले असून, रेल्वे मार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर काही  तांत्रिक बाबीसाठी मार्ग खुला करण्यात […]

कसा आहे नेरुळ - खारकोपर रेल्वेमार्ग?
| Updated on: Jul 05, 2019 | 5:02 PM
Share

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या नेरुळ – उरण रेल्वेमार्गावरील नेरुळ – खारकोपर या पहिल्या टप्प्यातील रेल्वे मार्गाचे  लोकार्पण केलं.  रेल्वेमंत्री पियुष गोयल हे यावेळी उपस्थित होते. खारकोपर रेल्वे स्टेशन इथे हा कार्यक्रम पार पडला. सिडकोने या मार्गावरील रेल्वे स्थानक बांधले असून, रेल्वे मार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर काही  तांत्रिक बाबीसाठी मार्ग खुला करण्यात आला नव्हता. पण ऑक्टोबर महिन्यात याची चाचणी होऊन, हा मार्ग खुला करण्याचे निर्देश रेल्वेने दिले.

नेरुळ ते खारकोपर हा 12 किलोमीटरचा मार्ग असून, या मार्गावर पाच रेल्वे स्थानकं आहेत. नेरुळ- खारकोपर 20 फेऱ्या आणि बेलापूर  – खारकोपर 20 अशा 40 फेऱ्या या मार्गावर सध्या धावणार आहेत. गर्दीच्यावेळी सकाळी आणि सायंकाळी  या फेऱ्या होणार असून, एका लोकल फेरीमध्ये 45 मिनिटांचे अंतर असेल.

ही रेल्वे सुरु झाल्याने उलवा, बामन डोगरी, खारकोपर इथे राहणाऱ्या चाकरमान्यांना याचा फायदा होणार आहे. मुंबईहून येणाऱ्या इथल्या रहिवाशांना आतापर्यंत नेरुळ किंवा बेलापूर येथून बस किंवा रिक्षाने घरी यावं लागत होतं. मात्र आता रेल्वे सेवा सुरु झाल्याने त्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.

नेरुळ ते खारकोपरदरम्यानच्या तरघर  रेल्वे स्टेशनचे काम सध्या सुरु आहे. हे रेल्वे स्टेशन भविष्यात आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ असून, दोन वर्षात ते पूर्ण होणार आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.