AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘भगवा झेंडा उतरवण्यासाठी दिल्लीचे 2 बोके आणि…’, संजय राऊत यांची सर्वात खोचक टीका

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपल्या भाषणात नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर अतिशय खोचक शब्दांमध्ये टीका केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही सडकून टीका केली.

'भगवा झेंडा उतरवण्यासाठी दिल्लीचे 2 बोके आणि...', संजय राऊत यांची सर्वात खोचक टीका
Follow us
| Updated on: Jul 01, 2023 | 9:02 PM

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचा आज मुंबई महापालिकेवर मोठा मोर्चा निघाला. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात खासदार संजय राऊत हे देखील उपस्थित होते. यावेळी त्यांनी शिवसेना आणि भाजपवर सडकून टीका केली. राऊत यांनी आपल्या भाषणात नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर अतिशय खोचक शब्दांमध्ये टीका केली. तसेच मुंबई महापालिका ही शिवसेनेच्या बापाची आहे. त्यामुळे या महापालिकेवर शिवसेनेचाच भगवा फडकत होता आणि फडकत राहील, असं संजय राऊत आपल्या भाषणात म्हणाले.

“सकाळपासून सर्वांना चिंता होती की धो-धो पाऊस पडेल आणि मोर्चाचं काय होईल? पण आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी सूर्यदेवाने प्रकाश दिला आहे. आम्हाला फक्त जनतेचा नाही तर 33 कोटी देवांचा आशीर्वाद मिळाला आहे. इथे शिवसैनिकांचा धो-धो पाऊस पडला आहे”, असं संजय राऊत म्हणाले.

“आदित्य ठाकरे इथे येण्यापूर्वी हनुमानाचं दर्शन घेऊन आले. आदित्य ठाकरे यांना हिंदुत्वांची गधा दिली आहे. ही गधा अशी फिरवायची आहे की हे चोर बिळात गेल्याशिवाय राहायचे नाही. ये तो सिर्फ ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है! अंबादास दानवे त्यांना चांगला चष्मा आणून द्या आणि गर्दी दाखवा”, असं राऊत म्हणाले.

हे सुद्धा वाचा

‘दिल्लीचे दोन 2 आणि महाराष्ट्राची 40 खोके ‘

“ही मुंबई शिवसेनेची आहे आणि मुंबई महापालिका ही देखील शिवसेनेच्या बापाची आहे हे लक्षात ठेवा. गेले 30 ते 35 वर्षे शिवसेनेचा भगवा झेंडा हा बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी फडकवला. हा भगवा झेंडा उतरवण्यासाठी दिल्लीचे 2 बोके आणि महाराष्ट्राची 40 खोके हे जे काही कारस्थानं करत आहेत ती उधळण्यासाठी हा मोर्चा आहे”, असा घणाघात संजय राऊत यांनी केला.

“या महाराष्ट्रावर, या मुंबईवर शिवसेनेचंच राज्य कायम राहील हे सांगणारा हा मोर्चा आहे. हा मोर्चा या मुंबई महापालिकेत जो भ्रष्टाचार सुरु आहे, शिवसेनेचं राज्य, नगरसेवकांचं राज्य जोरजबदस्तीने काढून, इथे जो भ्रष्टाचार सुरु आहे त्याविरोधात हा मोर्चा आहे”, असं राऊत म्हणाले.

‘निवडणुका घ्या, कोण चोर आहे ते…’

“मुंबईकरांना निवडणुका हव्या आहेत. ते चोर मचाए शोर म्हणत आहेत, आता निवडणुका घ्या, कोण चोर आहे ते जनता दाखवून द्या”, असा घणाघात संजय राऊत यांनी केला. “ड्रोनच्या माध्यमातून हा विराट मोर्चा पाहा, नाही तुमच्या डोळ्यांची बुबुळे बाहेर आली तर बोला”, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

‘महापालिकेचा सातबारा हा शिवसेनेच्या नावावर’

“एका तरुण नेत्याने मुंबईकरांना साध घातली आणि लाखो मुंबईकर मोर्चात दाखल झाले. या महाराष्ट्रासाठी 105 हुतात्म्यांनी आहुती दिली. त्यांचं स्मारक बाजूला आहे. काही उंदिर आपल्याकडे बघत असतील की हा मोर्चा किती मोठा आहे. या महापालिकेचा सातबारा हा शिवसेनेच्या नावावर आहे. तो कुणाला पुसता येणार नाही”, असा दावा संजय राऊत यांनी केला.

“मुंबईकर आज आशेने आदित्य ठाकरे आणि शिवसेनेकडे पाहतोय. निवडणुका येऊद्या तुमच्या छाताडावर पाय देवून भगवा झेंडा फडकेल”, असा विश्वास राऊतांनी व्यक्त केला.

गरज पडल्यास आपात्कालीन...केंद्राचं सर्व राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र
गरज पडल्यास आपात्कालीन...केंद्राचं सर्व राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र.
IPL 2025 स्थगित, उर्वरित 16 सामने होणार की नाही? BCCI चा निर्णय काय?
IPL 2025 स्थगित, उर्वरित 16 सामने होणार की नाही? BCCI चा निर्णय काय?.
पाकचा पुंछमध्ये मोठा हल्ला, काळजाचा ठोका चुकणारा व्हिडीओ पाहिला?
पाकचा पुंछमध्ये मोठा हल्ला, काळजाचा ठोका चुकणारा व्हिडीओ पाहिला?.
मुस्लिम सुपरस्टार मित्रासाठी अभिनेत्याची मंदिरात पूजा; वादाला उधाण
मुस्लिम सुपरस्टार मित्रासाठी अभिनेत्याची मंदिरात पूजा; वादाला उधाण.
India-Pakistan War : अटारी-वाघा बॉर्डरवर बीटिंग रिट्रीट बंद, कारण...
India-Pakistan War : अटारी-वाघा बॉर्डरवर बीटिंग रिट्रीट बंद, कारण....
खुदा न खास्ता अगर... तणावादरम्यान मेहबूबा मुफ्तींच्या डोळ्यात पाणी अन्
खुदा न खास्ता अगर... तणावादरम्यान मेहबूबा मुफ्तींच्या डोळ्यात पाणी अन्.
संरक्षण मंत्र्यांची तिन्ही सैन्यांसोबत बैठक,भारताची पुढची रणनिती ठरणार
संरक्षण मंत्र्यांची तिन्ही सैन्यांसोबत बैठक,भारताची पुढची रणनिती ठरणार.
IPL 2025 : आयपीएलचे उर्वरित सामने रद्द होणार? BCCI लवकरच घेणार निर्णय
IPL 2025 : आयपीएलचे उर्वरित सामने रद्द होणार? BCCI लवकरच घेणार निर्णय.
पाकिस्ताननं जगाकडे मागितली भीक, युद्धासाठी कर्ज हवं? पण खरं काय?
पाकिस्ताननं जगाकडे मागितली भीक, युद्धासाठी कर्ज हवं? पण खरं काय?.
पाकला कडकी...भीक मागण्याची वेळ तरी युद्धाची खुमखुमी, जगापुढे पसरले हात
पाकला कडकी...भीक मागण्याची वेळ तरी युद्धाची खुमखुमी, जगापुढे पसरले हात.