AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raut on Navneet Rana Case: तुम्ही नेमकं कुणाच्या बाजूने?; संजय राऊत लोकसभा अध्यक्षांना पत्रं लिहिणार

Raut on Navneet Rana Case: संजय राऊत यांनी यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही सवाल केला.

Raut on Navneet Rana Case: तुम्ही नेमकं कुणाच्या बाजूने?; संजय राऊत लोकसभा अध्यक्षांना पत्रं लिहिणार
तुम्ही नेमकं कुणाच्या बाजूने?; संजय राऊत लोकसभा अध्यक्षांना पत्रं लिहिणारImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 27, 2022 | 11:29 AM

मुंबई: अंडरवर्ल्डचा महोरक्या युसूफ लकडावालाकडून अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी 80 लाख रुपये घेतल्याचं उघड झालं आहे. या प्रकरणावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी राणा दाम्पत्यांवर जोरदार हल्ला चढवला आहे. राणा दाम्पत्यांनी लकडावालाकडून 80 लाख रुपये घेतले आहेत. ही निव्वळ मनी लाँडरिंगची केस (Money Laundering) आहे. राणा दाम्पत्यांनी हा पैसा कशासाठी घेतला होता? त्या पैशाचा वापर कशासाठी करण्यात आला. याची चौकशी झाली पाहिजे. याबाबत मी लवकरच लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांना पत्रं लिहिणार आहे. तुम्ही कुणाच्या बाजूने आहात? असं लोकसभा अध्यक्षांना विचारणार आहे, असं सांगतानाच देश तोडणारे आणि देशात अस्थिरता निर्माण करणाऱ्यांच्या बाजूने कुणीही राहू नये, असं आवाहन शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं आहे. राऊत हे मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली.

संजय राऊत यांनी यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही सवाल केला. माझा फडणवीसांना सवाल आहे, तुम्ही या प्रश्नावर गप्प का बसला आहात? राणा दाम्पत्यांनी पोलिसांवर आरोप केले होते. आता पोलीस आयुक्तांनी व्हिडीओ शेअर केला आहे. त्यावर फडणीस काही बोलले नाही. इतर विषयावर भाजपचे लोक पोपटासारखे बोलतात ना. इतरांच्या बाबतीत आव्हानाची भाषा वापरता, मग याप्रकरणावर का बोलत नाही? या प्रकरणात आव्हानाची भाषा का वापरत नाही? या प्रकरणी ईडीच्या चौकशीची मागणी का करत नाही? असे सवाल राऊत यांनी फडणवीस आणि भाजपला केले.

आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने चौकशी का केली नाही?

लकडवालाने मनी लॉन्ड्रिंग केले आहे. त्याचा पैसा अनेक ठिकाणी फिरवला गेला. त्यातले एक लाभार्थी राणा दाम्पत्य आहेत. त्यांनी लकडावालाकडून 80 लाख रुपये घेतले. का घेतले? कशासाठी घेतले? आंतरराष्ट्रीय गुन्हेगार डि गँगशी संबंधित डॉनच्या पैशाचा वापर कुठे झाला? एवढेच पैसे आहेत की अजून आहेत? याचा तपास मुंबईच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने का केला नाही? कारण हा लकडावाला आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या कस्टडीत होता. त्यावेळी आर्थिक गुन्हे विभागाने चौकशी का केली नाही? असा सवालही त्यांनी केला.

आधीच्या पोलीस आयुक्तांनी भाजपमध्ये प्रवेश केला ना?

मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे निवृत्तीनंतर शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. आधीच्या आयुक्तांनी भाजपमध्ये प्रवेश केला, खासदार झाले. ते चालतं का? ते त्यांच्या पालख्या उचलत आहेत. यातून बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतात. कायदेशीर कारवाई केली तर त्यांच्यावर शिक्का मारता? राजेश्वरसिंग भाजपमध्ये आले. त्याबाबत काय म्हणणं आहे? असा सवालही त्यांनी केला.

अटारी सीमेवर लागल्या रांगा; पाकिस्तानी नागरिकांना घेऊन वाहनांची गर्दी
अटारी सीमेवर लागल्या रांगा; पाकिस्तानी नागरिकांना घेऊन वाहनांची गर्दी.
भेदरलेल्या पाकिस्तानचा भारतावर निर्बंध लादण्याचा पोरकट प्रयत्न
भेदरलेल्या पाकिस्तानचा भारतावर निर्बंध लादण्याचा पोरकट प्रयत्न.
.. मग स्थानिक यंत्रणेकडे कशी नाही? सुप्रिया सुळेंचा सवाल
.. मग स्थानिक यंत्रणेकडे कशी नाही? सुप्रिया सुळेंचा सवाल.
जगात एकच मानव धर्म आहे, त्यालाच हिंदू धर्म म्हणतात - मोहन भागवत
जगात एकच मानव धर्म आहे, त्यालाच हिंदू धर्म म्हणतात - मोहन भागवत.
पहलगाम हल्ल्यात केंद्रीय सरकारने मान्य केली चूक
पहलगाम हल्ल्यात केंद्रीय सरकारने मान्य केली चूक.
पाणी रोखल्यानं पाकची तडफड का? सिंधू पाणी करार स्थगित, नेमकं काय होणार?
पाणी रोखल्यानं पाकची तडफड का? सिंधू पाणी करार स्थगित, नेमकं काय होणार?.
काश्मीरातून रुपाली ठोंबरे पुण्यात,अंधारेंनी मारली मिठी अन् अश्रू अनावर
काश्मीरातून रुपाली ठोंबरे पुण्यात,अंधारेंनी मारली मिठी अन् अश्रू अनावर.
भारताकडून पाकची कोंडी, तब्बल 20 देशांना..आता पाकिस्तान 'चेकमेट' होणार?
भारताकडून पाकची कोंडी, तब्बल 20 देशांना..आता पाकिस्तान 'चेकमेट' होणार?.
पाकसोबतचा सिंधू पाणी करार स्थगित, मोदींचा पाकवर 'कायदेशीर स्ट्राईक'
पाकसोबतचा सिंधू पाणी करार स्थगित, मोदींचा पाकवर 'कायदेशीर स्ट्राईक'.
पहलगाम हल्ल्यानंतर देश हळहळला, आता BSF जवान पाकिस्तानात गेला, घडल काय?
पहलगाम हल्ल्यानंतर देश हळहळला, आता BSF जवान पाकिस्तानात गेला, घडल काय?.