AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आदित्य ठाकरे यांचा सर्वात मोठा इशारा, एकनाथ शिंदे यांना खरंच अटक होणार?

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारवर जोरदार निशाणा साधला. मुंबई महापालिकेत अधिकाऱ्यांच्या आडून मोठा भ्रष्टाचार सुरु असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी मोर्चात केला. यावेळी त्यांनी शिंदे सरकारला मोठा इशारा दिला.

आदित्य ठाकरे यांचा सर्वात मोठा इशारा, एकनाथ शिंदे यांना खरंच अटक होणार?
Follow us
| Updated on: Jul 01, 2023 | 6:24 PM

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचा आज मुंबई महापालिकेवर मोर्चा निघाला. या मोर्चात शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले. या मोर्चात आदित्य ठाकरे यांनी धडाकेबाज भाषण केलं. विशेष म्हणजे या मोर्चात आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा इशारा दिला आहे. ज्यादिवशी ठाकरे गटाचं सरकार येईल त्यादिवशी सर्व भ्रष्टाचारांचा हिशोब होईल. आमचं सरकार ज्यादिवशी येईल त्यादिवशी सर्वांना अटक करु, असा मोठा इशारा आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिला. यावेळी आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर चार मोठ्या घोटाळ्यांचा आरोप केला.

“तुम्ही मला पप्पू म्हणतात ना, मी पप्पू चॅलेंज देणार. या अंगावर. छातीवर वार करायला या. मी त्यांना हेच सांगितलं की, मी चॅलेंज देतोय, ५० रस्तेही तुम्ही पूर्ण करु शकत नाहीत. आम्ही गेले 10 वर्ष फिरतोय. महापौरांना घेऊन शहरातील वेगवेगळ्या रस्त्यांवर गेलोय. अधिकाऱ्यांना रस्त्यांचं काल लवकर का होत नाही म्हणून जाब विचारला आहे. रस्त्यांची कामे कशी आणि कधी होतात ते मला माहिती आहे. मी जे बोललो ते खरं ठरलं आहे”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

“मुंबई महापालिकेच्या १०० वर्षांच्या इतिहासात हे ५० रस्त्यांचं कमीत कमी टार्गेट घेतलं. पण एकही रस्ता ही महापालिका पूर्ण करु शकलेली नाही. महापालिकेत काय चाललं आहे? तुम्ही मुंबईसाठी काम करत आहात की खोके सरकारसाठी काम करत आहात?”, असे सवाल आदित्य ठाकरे यांनी केले.

हे सुद्धा वाचा

‘मुंबईच्या लुटारुंना जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही’

“मी आजही सांगून ठेवतो, ज्यादिवशी आमचं सरकार येईल, ते येणार म्हणजे येणार आहे, त्या दिवशी पहिलं काम हेच असणार मुंबईच्या लुटारुंना जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही. हा रस्त्यांचा घोटाळा भयानक आहे”, असा मोठा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला.

“पहिला घोटाळा हा रस्त्यांचा घोटाळा आहे. मी इथे यायला निघालो तेव्हा मला विचारलं होतं की, तुम्ही निवेदन देणार का? मी म्हटलं, चोरांना काय निवेदन देणार? मी फाईल बनवली आहे. ज्या दिवशी आमचं सरकार आलं त्यादिवशी आम्ही आणि पोलीस आत येणार आणि तुम्हाला अटक करणार”, असा मोठा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला.

‘भूतांना दूर करायचं आहे’

“येताना हनुमानजींचं दर्शन घेऊन आलो. मनात एकच ओढ होती की, भूत पिशाच निकट नहीं आवे महावीर जब नाम सुनावे, तेच करायचं आहेत. आपल्या आजूबाजूला जी भूतं आहेत त्यांना दूर करायचं आहे”, असा घणाघात आदित्य ठाकरे यांनी केला.

पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?
पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?.
पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?
पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?.
युद्धाची चाहूल? राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश
युद्धाची चाहूल? राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश.
राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?
राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?.
'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं
'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं.
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन.
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट.
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड.
पाकसोबतचा वाद, पुतीन यांचा मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत काय घडतय?
पाकसोबतचा वाद, पुतीन यांचा मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत काय घडतय?.
कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन
कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन.