नारायण राणेंच्या त्या आरोपांना रोखठोक उत्तर! खरंच उद्धव ठाकरे यांनी केला होता फोन? संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
Sanjay Raut on Narayan Rane : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्याला, माझ्या मुलाचे नाव या प्रकरणात घेऊ नका म्हणून फोन केला होता, असा दावा भाजपा नेते नारायण राणे यांनी केला होता. हा दावा खासदार संजय राऊत यांनी खोडला आणि एक मोठा गौप्यस्फोट केला.

औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा तापलेला असतानाच राज्यात दिशा सालियन आणि अभिनेता सुशांत सिंह यांच्या मृत्यूचे प्रकरण पण समोर आले आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्याला, माझ्या मुलाचे नाव या प्रकरणात घेऊ नका म्हणून फोन केला होता, असा दावा भाजपा नेते नारायण राणे यांनी केला होता. हा दावा खासदार संजय राऊत यांनी खोडला आणि एक मोठा गौप्यस्फोट केला. त्यामुळे राणे विरुद्ध ठाकरे हा जुना राग पुन्हा आळवल्या जात असल्याचे चित्र दिसत आहे.
काय म्हणाले होते नारायण राणे ?
काल नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत आरोपांची राळ उडवून दिली होती. दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरे यांचे नाव न घेण्यासाठी त्यांनी फोन केल्याचा दावा राणे यांनी केला. वांद्रेच्या पुढे असताना मिलिंद नार्वेकरांनी फोन केला होता. त्यावेळी उद्धव ठाकरे बोलले. त्यानंतर रुग्णालयाच्या परवानगीवेळी त्यांच्याशी बोलणे झाले. दोन्ही वेळाला उद्धव ठाकरे यांनी आदित्यचं नाव घेऊ नका, असे सांगितल्याचे राणे यांनी दावा केला.




ठाकरे म्हणाले, राणेंना फोन केला नाही
संजय राऊत यांनी आज सकाळी पत्र परिषद घेतली. त्यावेळी त्यांना नारायण राणे यांच्या दाव्याविषयी विचारण्यात आले. आपण उद्धव ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर यांना या दाव्याविषयी विचारणा केली. या दोघांनी राणे यांना फोन केल्याचा इनकार केला आहे असा खुलासा संजय राऊत यांनी केला. नारायण राणे इतक्या वर्षानंतर कशाच्या आधारावर असे वक्तव्य करत आहेत, हे समजून घेणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. त्यांनी आता सत्तरी पार केली आहे. आम्हाला त्यांच्या प्रकृतीची चिंता वाटते, असा खोचक टोलाही राऊतांनी लगावला.
उलट राणेंच्या सुटकेसाठी फोन
त्यावेळी मुख्यमंत्र्यांवरती जे भाष्य केले. त्यामुळे नारायण राणे यांना अटक झाली त्यावेळी त्यांच्या कुटुंबियांकडून उद्धव ठाकरे यांना फोन आला होता. त्यांना सांभाळून घ्या. त्यांची प्रकृती बरी नाही. त्यांना काही त्रास आहे. केंद्रातून सुद्धा फोन आला होता. त्यांच्या सुटकेसाठी अमित शाह यांचा फोन आला होता. त्यानंतर संध्याकाळी उद्धव ठाकरे यांनी पोलिसांना सूचना केल्या आणि त्यांची सूटका झाली असा गौप्यस्फोट खासदार संजय राऊत यांनी केला.