AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाळासाहेबांच्या शिवसेनेचे इतके सरपंच, नवनियुक्त सरपंचांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

आमच्या तीन महिन्यांच्या कामावर मतदारांनी विश्वास दाखवला आहे.

बाळासाहेबांच्या शिवसेनेचे इतके सरपंच, नवनियुक्त सरपंचांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट
नवनियुक्त सरपंचांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Oct 19, 2022 | 9:18 PM

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ग्रामपंचायत निकालाची वस्तुस्थिती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. त्या मतदारांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेला सरपंच निवडून आणले, हे राज्यातल्या जनतेला कळलं पाहिजे. त्यासाठी काल दीडशे आणि आज 51 आणि उद्या सुद्धा काय उर्वरित सरपंच इथे येतील. टोटल 243 सरपंच बाळासाहेबांच्या शिवसेनेचे निवडून आले आहेत, हा आकडा आणखी वाढणार आहे. या सगळ्या सरपंचांचं मी स्वागत केलं आहे.

आमच्या तीन महिन्यांच्या कामावर मतदारांनी विश्वास दाखवला आहे. हे सरकार झटपट निर्णय घेणारे सरकार आहे. ग्रामीण भागात सुद्धा एक विश्वास निर्माण झाला आहे. येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये शिवसेना-भाजप युतीला मोठे यश मिळणार आहे. आमचे 243 सरपंच असताना आमची चुकीची आकडेवारी दाखवत होते.

भास्कर जाधव यांच्या घरावरील हल्ला प्रकरणी मला उत्तर देण्याची गरज नाही. गृह विभाग त्याचे उत्तर देईल, कोणी हल्ला केला काय ते ? परतीच्या पावसामुळे जे नुकसान झालेले आहे त्याचे पंचनामे करा, अशा सूचना मी दिलेल्या आहेत. निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा आम्ही मदत केली आहे.

विविध पातळीवर पंचनामे करण्याचा आम्ही सांगितला आहे. त्यानुसार त्यांना मदत मिळेल शेतकऱ्यांना वाऱ्यावर हे सरकार सोडणार नाही. दिवाळी सुद्धा उत्साहात झाली पाहिजे. यासाठी राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला. त्यामध्ये रवा, साखर, तेल, चण्याची डाळ अशी चार वस्तू 100 रुपयांमध्ये देण्याचा निर्णय हा ऐतिहासिक आहे, असंही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

26-11 च्या हल्ल्यानंतर सुरक्षा व्यवस्था अपग्रेड केलेली आहे. अशा धमक्या जरी आल्या तरी आमचा गृह विभाग पोलीस यंत्रणा सक्षम आहे त्यांना करारा जबाब देण्यासाठी. फक्त नागरिकांनी सतर्क राहण्याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. पोलीस यंत्रणेमध्ये अत्याधुनिक सर्वसामग्री आहेत ते सगळं केलेला आहे.

पाकिस्तानचे 35 ते 40 सैनिक, अधिकारी मारले; लेफ्टनंट जनरल घईंची माहिती
पाकिस्तानचे 35 ते 40 सैनिक, अधिकारी मारले; लेफ्टनंट जनरल घईंची माहिती.
पाकिस्तानी ऑफिशियल भिखमंगे; ओवेसींनी पुन्हा पाकिस्तानची लक्तरं काढली
पाकिस्तानी ऑफिशियल भिखमंगे; ओवेसींनी पुन्हा पाकिस्तानची लक्तरं काढली.
लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण
लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण.
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली.
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना.
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग.
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!.
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ.
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती.
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?.